Posts

Showing posts from May, 2023

या मुलांनो

स्वस्थ बसेल तोचि फसेल  येईल तो नक्की हसेल  साहित्याची पाहण्या दुनिया  लवकर भरभर सारे या कथा, कादंबरी आणि कविता मनोरंजनातून ज्ञान घेऊ आता सारस्वतांना भेटण्या तुम्ही या लवकर भरभर सारे या  मुलांनो तुम्ही आम्ही मजा करूया मजा  आम्हा तुम्हाला मिळेल हसण्याची ती सजा  हसण्याची ती सजा

शाळेत जायचंय

धावत जाऊन मला  माझ्या बाकावर बसायचंय रोज सकाळी खड्या  आवाजात राष्ट्रगीत म्हणायचंय  नव्या वहीचा वास घेत  पहिल्या पानावर नाव लिहायचंय  भिंतीवर खडूनं रेघा मारून  खोडरबर आणि पाटीनं खेळायचंय  पाऊस पडून उद्या  मला चिखलात खेळायचंय  सुट्टी मिळेल का?  या विचारात रात्री झोपायचंय  गप्पा मारत मित्रांशी  खूप खूप बोलायचंय  घंटा होताच मला  आठवणीसह घरी परतायचे

भाग्यवान

भाग्यवान  अनेक जण म्हणतात  आपल्या पत्नीला भाग्यवान  प्रश्न पडतो मलाच  की कोण भाग्यवान?  तू माझी आहेस भाग्यवान  की मीच तुझ्यामुळे भाग्यवान  फुलतात अनेक प्रेमाच्या कविता  प्रेमी युगुलांनी गाणी गाता  तूच माझी भाग्यविधाता  खरंच तूच माझी सविता

ज्ञानमाऊली

प्रयोगाच्या तीरावर औदुंबराच्या छायेत  ज्ञानमाऊली विसावली साहित्याच्या मायेत  ग्रंथ चळवळ येथे जणू जोमाने फोफावली नवोदित लेखक कवींना मिळाली सावली  उत्तमरावांचे कार्य उत्तम धूळ झटकली परशरामाने साहित्याची लाज राखली मित्रांच्या सहकार्याने गाव तिथे ग्रंथालय ज्ञानात इथे सांगा काय कमी  रोज नवे पुस्तक चाळावे लिखाणाला नवी उर्मी अशीच वाढू साहित्यसंपदा इथेच नांदो सरस्वती किती कथा आणि कादंबऱ्या कोणी करावी गणती संभाजी केशव चौगले

आयुष्य

आयुष्य म्हणजे काय असतं?  भोगणाऱ्यांनी भोगायचं असतं  शोषितांनी सोसायचं असतं  तुमचं आमचं सेम असतं.  राबणाऱ्यांनी राबायचं असतं  उणंधुणं कुणाचं काढायचं नसतं  पण लक्षात ठेवा की  खाणाऱ्यांनी मात्र  मढ्यावरचं लोणी खायचं असतं.  आयुष्य म्हणजे  दुसरं तिसरं काही नसतं.  मरण येत नाही म्हणून जगायचं असतं. 

काव्यांजली

नाव त्यांचे मुकुंदराव निगवेकर  कार्याची नच येणार त्यांच्या सर  जंगलचे होते ते अधिकारी  मोठाच होता त्यांचा दरारा भारी  बनले घटनेचे ते शिल्पकार  कोल्हापूर साहित्य सभा बालकुमार  बंटी आणि बिंबा पुस्तक तर पात्र झाले आहे राज्य पुरस्कार  स्वभाव होता कठीण वज्राहुनी  वागणे मात्र होते मऊ मेणाहुनी  दाटून येतात उरी आठवणी  वाहतो ही काव्यांजली स्मृति

मला हवेत आजी- आजोबा

आजीशिवाय घर म्हणजे  नुसता कोंडवाडा  साखरेशिवाय चहा जसा काळा कडू काढा  आजीशिवाय घर म्हणजे  भासते नुसती धर्मशाळा  आवजाव मन की मर्जी  नसतो तिथे प्रेम जिव्हाळा आजीशिवाय घर म्हणजे  देवाशिवाय देऊळ आपल्याच नादात धडपडणाऱ्या  मुंग्यांचं वारूळ  आजीशिवाय जगणं म्हणजे विझलेले दिवे खरंच देवा आजीसवे  आजोबाही मला हवेत

युद्ध हवे की बुद्ध हवा

युद्ध हवे की बुद्ध हवा  म्हणत होते सारेच,  ब्रिटिशांच्या साम्राज्यावर  सूर्य कधीच मावळत नाही.  पण.... काळाने दाखवून दिले,  महायुद्धाच्या रूपाने कुणाचेच काही चालत नाही.  इंग्लंडची जागा घेतली अमेरिकेने जन्माला घातलं मानवाऐवजी क्षेपणास्त्रांना तिने.  जगावरती वर्चस्व ठेवण्या  पोसले पाक आणि अफगाण खुराक खावून माजणाऱ्यांनीच  जन्माला घातलं तालीबान.  सत्य शांती-अहिंसेचा  संदेश देणारा बुद्ध  त्याची मूर्ती फोडताना  कुठे गेली होती शुद्ध?  त्याचेच भोगा आता फळ तिसऱ्या महायुद्धाच्या रूपाने मलाही माहिती आहे ओलंही जळतं वाळल्याबरोबर पण लक्षात असू द्या हे की, दहशतवाद-अराजकता  संपविण्यासाठी झगडू नये धर्माच्या नावाखाली आणि फसव्या मानसन्मानासाठी विचार हवाय  बुद्ध, येशू , पैगंबराचा  आचार हवाय सत्य, अहिंसा प्रणालीचा  तेव्हाच नांदेड जगात  सुख, समाधान आणि  मिळेल अतिरेकांना  इथेच मूठमाती. 

देश झाले प्राणी

इंग्लंड झाला सिंह अमेरिका तर वाघ वाघ म्हणे सिंहाला मी आहे राजा जगाला भारत झाला बिचारा ससा विहार करतो कसाबसा पाक म्हणजे धूर्त कोल्हा खोबरं तिकडं चांगभला अफगाण तर लबाड लांडगा म्हणे मीच होणार दांडगा  सिंह झाला म्हातारा अन्   घेणार मी वाघाची जागा  डरकाळी फोडली वाघाने  विचार करता लांडग्याचा  सशाने केलेले ऐक्य पाहून  निरोप घेई तो जंगलाचा  आलं का तुमच्या लक्षात दिसतो फार ससा छोटा  लांडगांना पिटाळण्यात   त्याचाच होता हात मोठ्ठा

भिकारी

भिकारी मी या जगातील  फिरतो दारोदारी लोकशाहीचा भारतवासी आहे मी भिक्षेकरी गेलो असाच मी  काँग्रेसनामे पक्षाच्या द्वारी आढळला मज नेतृत्वाचा  अभाव त्यांच्या घरी भाजपाने फोडला कितीही  टाहो जरी तरी त्यांचे अंग आहे धर्मांधापरी प्रत्येक जण उठतो आणि मांडतो वेगळी चूल आई-बाबापासूनच जसं  वेगळं राहतं मुलं  प्रादेशिक पक्षांचा झाला  आता सुकाळ सोडून दिला आहे कसा  साऱ्यांनीच ताळ राजकीय पक्षांच्या  अखंड भांडणात केली  आहे अपक्षांनी मात  युती आली आणि गेली  आघाडीही घडली   अजूनही सामान्यांची   कुतर ओढ मात्र चालली

माहेरी बोलवा

चार दिवसावर आला ओला श्रावण झुलवा  न्याया पाठवा भावाला  मला माहेरी बोलवा.  दिवस आठवुनी जुने जीव मिरवू येईल माझे काळीज हर्षाने  सूपाएवढे गे होईल.  सण गौराईचा हा  माझ्या अंगणी येईल गणरायाचं आगमन  सर्वा आधी होईल झिम्मा फुगडीचा खेळ बाई रंगत चढेल  माहेराच्या सुखाची ही  मला बरसात होईल  रक्त चंदनाचा गारवा  मला माहेरी मिळेल  वैशाख वणवा सासरी  भोगण्यास हा असेल
चार दिसावर आला ओला श्रावण झुलवा  न्याया पाठवा भावाला  मला माहेरी बोलवा.  दिवस जुने आठवुनी जीव मिरवू येईल माझे काळीज हर्षाने सुपाएवढे हे होईल.   सण गौराईचा हा  माझ्या अंगणी येईल  गणरायाचंक्ष आगमन सर्वा आधी होईल.  झिम्मा फुगडीचा खेळ  बाई रंगत चढेल  माहेरा सारखा सुखाची  मला बरसात घडेल.  रक्त चंदनाचा गारवा  मला माहेरी मिळेल  वैशाख वणवा सासरी  भोगण्यास हा असेल

सैनिक आम्ही

सैनिक आम्ही शिवरायांचे  सैन्य आमुचे खडे  हाकेसरशी युद्ध गर्जना  आस्मानाला भिडे||धृ||  महाराष्ट्राची अजिंक्य माती  सैनिक आम्ही निधडी छाती  तळपे आमुच्या भगवा हाती  साक्ष द्यावया चहुबाजूला  सह्याद्रीचे कडे||१||  संदेश येई तुफान वेगाने गीत तयांचे गर्जुनी सांगे  मायेचे हे तुटले धागे  धरु वाटही रणांगणाची  गनिमा चारू खडे||२|| करू प्रतिज्ञा एकदिलाने  आता गुलामी नच भोगणे   देशासाठी प्राण अर्पिणे  स्वराज्यातून सुराज्य हे  विचारांतून घडे ||३|| भाषा आमची मायमराठी  विकास घडवू आपल्या हाती  शत्रूपाठी घालू लाठी  घेता शपथा शिवरायांच्या  पावित्र्याचे सडे ||४||

चारोळी

येता आम्ही तुमच्या द्वारी  देता हाकलून फार दूरवरी  पिंडदानास तिकडं का-वळा  म्हणे असे तो पाहा कावळा.   घरटे देखता बांधता चिमणी  ठेवता तुम्ही का हो तेचि-मनी  वेचिते ती कशी काडी काडी  तुमची मात्र राहते मनीच माडी.   आगमना वसंत गाते कोकीळ  घेतात तिच्यावरी सारे आळ  कावळ्या घरी ठेवतेस अंडे  बाकी वर्षभर जातेस कोठे?  पोपटा रंग तुझा हिरवा  नयनाला मिळेल गारवा  विठू विठू बोले बंदिस्त होता  विसरून जातोस सोडून देता. 

गांधीजी

गांधीजी  तुम्ही जमविला होता  बाळगोपाळांचा मेळा  एकत्र केलं होतं  साऱ्यांना गोळा.  दाखवलात मार्ग  श्रीकृष्ण बनून  नव्हता त्यात  एकही अर्जुन. सारेच होते त्यात  दु:शासन आणि दुर्योधन  असंच असतं का हो  सारंच राजकारण.  सत्य आणि अहिंसा  होती तुमची तत्त्वं  अन्याय, अत्याचार  झाली आजची सत्त्वं.  माय मरो अगर  मरो मावशी  नातं असतं त्यांचं  फक्त खुर्चीशी. 

नवांकुर

आले देवाजीच्या मना  तिथे कोणाचं चालंना  विस्कटता प्रभातीचे रंग  मना आधार लागंना ||१||  प्रजासत्ताकाचा दिन हा  गेला लाल किल्ला रंगून  गुजरातला कसा दिला  धक्का पहा भूकंपानं ||२||  झालं होत्याचं नव्हतं  आला बघा वणवा सरणही नुरलं आता  अग्नी कसा पेटवावा ||३||  दाही दिशांतून लागला येऊ मदतीचा पूर  नव्या जोमाने उगवतो  पहा हा नवांकुर

पुस्तक परीक्षण - गावकुसाची कहाणी - संभाजी चौगले

*गावकुसाची कहाणी*         *संभाजी केशव चौगले*             प्रत्येक पुस्तकाला काहीतरी मूल्य असतं हे निश्चित. त्या दृष्टीने माजगावचे कवी-लेखक, अभिनेते, नाटककार असे अष्टपैलू संभाजी केशव चौगले हे *कवित्व* या नावाने कविता लेखन करतात. त्यांनी अभ्यासपूर्ण, संशोधकवृतीने आपल्या गावाची, गावपांढरीची यशोगाथा आपल्या शब्दांतून उतरण्याचा केलेला प्रयत्न हा खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. ही केवळ माजगावची कहाणी नाही, तर प्रत्येक गावाची ही कहाणी आहे. कारण प्रत्येक गावाची निर्मिती ही कोणत्या ना कोणत्या हेतूने, ध्येयाने, अगर प्रेरणेतून झालेली असते.          अगदी पौराणिक, ऐतिहासिक गावांची माहिती घेतानासुद्धा याचा प्रत्यय आपणास येतो. अगदी पूर्वीच्या काळी द्रविड लोक हे मूळ भारतवासीय लोक. त्याचा इतिहासही आहे. पण उत्तरेतून खैबरखिंडीतून आर्यांचे आगमन झाले आणि त्यांनी नद्यांच्या काठावरती गावांची वस्ती निर्माण केली हेही आपण इतिहासातून पाहिले आहे.           माजगाव हे कासारी नदीच्या किनारी वसलेले गाव. या गाव...

गावकुसाची कहाणी पुस्तक परीक्षण

*गावकुसाची कहाणी*        *संभाजी केशव चौगले*            प्रत्येक पुस्तकाला काहीतरी मूल्य असतं हे निश्चित. त्या दृष्टीने माजगावचे कवी-लेखक, अभिनेते, नाटककार असे अष्टपैलू संभाजी केशव चौगले हे *कवित्व* या नावाने कविता लेखन करतात. त्यांनी अभ्यासपूर्ण, संशोधकवृतीने आपल्या गावाची, गावपांढरीची यशोगाथा आपल्या शब्दांतून उतरण्याचा केलेला प्रयत्न हा खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. ही केवळ माजगावची कहाणी नाही, तर प्रत्येक गावाची ही कहाणी आहे. कारण प्रत्येक गावाची निर्मिती ही कोणत्या ना कोणत्या हेतूने, ध्येयाने, अगर प्रेरणेतून झालेली असते.         अगदी पौराणिक, ऐतिहासिक गावांची माहिती घेतानासुद्धा याचा प्रत्यय आपणास येतो. अगदी पूर्वीच्या काळी द्रविड लोक हे मूळ भारतवासीय लोक. त्याचा इतिहासही आहे. पण उत्तरेतून खैबरखिंडीतून आर्यांचे आगमन झाले आणि त्यांनी नद्यांच्या काठावरती गावांची वस्ती निर्माण केली हेही आपण इतिहासातून पाहिले आहे.          माजगाव हे कासारी नदीच्या किनारी वसलेले गाव. या गावाची इथंभूत माहिती घ...

पुस्तक परीक्षण - पाणीफेरा - डॉ. श्रीकांत पाटील

*२०२१च्या पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापूराचा 'ऑंखो देखा हाल' मांडणारी वास्तववादी कादंबरी-पाणीफेरा*            डॉ. श्रीकांत पाटील            डॉ. श्रीकांत पाटील यांची लाॅकडाऊन, ऊसकोंडी या यशस्वी कादंबरीनंतर तिसरी कादंबरी म्हणजे *पाणीफेरा* आपल्या महाराष्ट्रात १९८९ पासून २०२१ पर्यंत अनेक वेळा महापूर आले आहेत. अलीकडेच २०१९ आणि २०२१ मध्ये महापूर आले होते. या महापुरांचा अनेक गावांना वेढा पडला होता. आणि महापूर काय असतो हे प्रत्यक्ष अनुभवण्याचा, साक्षीदार होण्याचा योग अनेकांना मिळाला. पण ज्यांचं मन संवेदनशील असते त्यांच्या हातून काहीतरी चांगले कार्य होत असते. समस्येलाच संधी मानून त्याचा योग्य वापर करून घेत असतो तोच यशस्वी होतो. त्याप्रमाणे डॉ. श्रीकांत पाटील यांनी २०१९ आणि २०२१ या दोन वर्षी आलेल्या महापुराचा अनुभव, त्यावेळी होणारी माणसांची घुसमट, पर्यायी शोधलेले मार्ग, वेगवेगळी परिस्थिती. या साऱ्यावर समर्पक शोधलेले उत्तर याचे विवेचन डॉ. श्रीकांत पाटील यांनी आपल्या पाणीफेरा या कादंबरीमध्ये केलेले आहे. घटना, प्रसंग व पात्रांच्या माध्यम...