Posts

Showing posts from November, 2022

लॉकडाऊन - नाट्यछटा १

लॉकडाऊन         नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललंय आपलं? बरं आहे ना! असं मी का विचारतोय? आपण सगळेच लॉकडाऊन आहोत ना! म्हणून म्हटलं कसं वाटतंय? काय म्हणताय...बांधून घातल्यासारखं वाटतंय. खूप दिवस झाले घरातून बाहेर जाता आलं नाही किती दिवस.  मॉर्निंग वॉक नाही, बाजारात जायला मिळालं नाही, नोकरीवर जायला मिळालं नाही. पाहुण्यांच्या घरी जाता येत नाही. असं तर सगळ्या मोठ्या लोकांचं रडगाणं सुरू झालं आहे. हॅलो हॅलो बोल की गोट्या, काय सांगायला लागलायस ते कळू दे तरी. अरे मोठ्याने बोल की. ऐकू येत नाही. काय म्हणतोयस? मी काय करतोय? काय करणार! 'आलिया भोगासी असावे सादर, ओढून घ्यावी चादर, खालवर' असं मी का म्हणतोय? मग ऐक तर...अरे बाबा! तुला माहिती नाही? असं काय करतोयस? अरे बाबा, आपण लॉकडाऊनमध्ये आहे. काय करणार मी? खायचं आणि झोपायचं याशिवाय दुसरं काय काम आहे? बरं. तुझं काय चाललंय? अरे, व्वा! मस्त. सुट्टीत चांगलं काम सुरू आहे म्हणायचं. काय काय केले आहेस? पिंपळाच्या पानावर सुंदर नक्षीकाम केलेस. वा मर्दा वा! काय म्हणतोयस? छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू मह...

आई तुझा आशीर्वाद - नाट्यछटा २

आई तुझा आशीर्वाद             (स्वगत) हां आज कोणता अभ्यास करावा? मला तर काही सूचंना झालंय. (प्रकट) मराठी वाचावं आता. मराठी शिकवणारे कोण बरे ते...हां. धोतर आणि टोपीवाले....बरोबर. तेच ते कुलकर्णीसर. काय बरे म्हणतात ते मराठीबाबत... मराठी म्हणजे आपली मातृभाषा. आपल्या आईची भाषा. मग कशाला याचा अभ्यास करायचा. पुस्तक बाजूला ठेवतो. हे कोण? वा गणितवाले जाड आणि मिशीवाले पाटीलसर. फारच मारतात बुवा ते. लक्षात राहण्यासाठी यांचा अभ्यास सकाळीच करावा. ये आई, मला सकाळी लवकर उठव ग.( चूक लक्षात येऊन) अरेच्चा! आई तर बाहेर गेली आणि मी कुणाला सांगत आहे. गणितवाले बाबा, तुम्ही आता बसा सकाळपर्यंत इथं असंच. अरे हो, या आमच्या इंग्रजीवाल्या मॅडम बरं का! आमच्याच वर्गशिक्षिका आहेत. तशा त्या माझ्या फार आवडत्या आहेत.  माझा आवडता विषय आहे ना इंग्रजी. हो. आहेच मुळी माझा आवडता विषय इंग्रजी. कारण त्यांचे इंग्रजी शिकवणे म्हणजे नुसतं गाणं. हं. त्यांचं नाव सांगायचं विसरून गेले बघा. काय बरं त्यांचं नाव.... हां आठवलं. गुणे मॅडम. आहेतच माझ्या मॅडम गुणाच्या. आणि बरं का त्यांनी शिकवलेलं गाणं मला ये...

हाच विश्वास - नाट्यछटा ४

            *हाच विश्वास*  ए आई, मला बाहेर जाऊ दे ना. बाहेर काय काय चालू आहे ते पाहू दे ना. मला सारखंसारखं असं का अडवतेस? काय म्हणतेस तू? कोण आले? कोरोना. तो आणि कुठून आलाय ग? चीनमधून! मग येईना की, मला काय त्याचं? काय म्हणालीस? म्हणून तर साऱ्या जगातली माणसं अशी कोंडून घेऊन बसल्यात! कोरोना म्हणजे काय ग? तो वायरस आहे होय. अगं पण वायरस म्हणजे तरी काय ग? हां बरोबर. तू सांगितलंस ते शंभर टक्के खरं आहे. आमच्या सरांनी सांगितलेलं मला आठवलं बघ. व्हायरस म्हणजे विषाणू. या विषाणूमुळेच आम्ही आजारी पडतो ना! ते कसं? काय काळजी घ्यावी? परवा नाही का मी बर्फाचा गोळा खाल्ला आणि मला सर्दी झाली होती. खेळल्यावर ताप आला होता. मग मला बाबांनी डॉक्टरमामाकडे नेलं होतं. तेव्हा डॉक्टरमामा म्हणाले होते, की मी विषाणूमुळेच आजारी पडलो होतो. आणि हे असं इंजेक्शन टोचलं गेलं होतं! (ॲक्शन करून) काय म्हणतेस गं आजी? आजारी पाडणारे विषाणू आहेत तसेच उपयोगी पडणारेही विषाणू आहेत. ते कोणते गं आजी? हो. बरोबर आहे तुझं. दुधाचे दही बनवणारे. आमच्या विज्ञानच्या शिक्षकांनी सांगितलं होतं आम्हाला. त्याची आठव...

पूरग्रस्त मी (२०२१) ५

पूरग्रस्त मी २०२१        कोणी घर देता का घर, या पूरग्रस्तांना घर देता का घर. अहो मंडळी, थांबा ना थोडं. अहो, सांगतो मी सारं. काय म्हणताय? मदत मागायला आलोय मी? नाही. मला काहीही मदत नकोय. जी मिळाली ती भरपूर झाली. यातून मी माझा संसार सावरला आहे. अहो, ही दानत आपल्याला महाराष्ट्रातच पाहायला मिळते. या महापुरानं सगळीकडे हाहाकार उडवला होता. उभ्या आयुष्यात असा महापूर मी कधी पाहिला नव्हता. अहो, माझे आजोबा आज ८० वर्षाचे आहेत. ते सांगतात की त्यांनीसुद्धा त्यांच्या आयुष्यात असा महापूर कधी पाहिला नव्हता. हा महापूर का आला? त्याची कारणं काय आहेत? याबाबत मी काही बोलणार नाही. कारण ते काही माझ्या हातात नाही. पण या महापुराने मला भरपूर काही दिले. होय. खरं आहे ते. या महापुरात माणसाने तांदूळ, डाळ, तेल, पिण्याचे पाणी असं सारं काही आणून दिलं. किती किती आणि काय काय दिलं म्हणून सांगावं. ही महाराष्ट्र भूमी आहे. ही भूमी शिवरायांची आहे. भिमरायाची आहे. आणि साधुसंतांची आहे. अजूनही गावोगावी मदतीचा महापूर येतच आहे. काय म्हणताय? हां बरोबर आहे. पण मला जे सांगायचं आहे ते विसरूनच गेलो बघा. मला तर खरे आभार...

होय मीच सुजाता बोलतेय(२०१९) नाट्यछटा ६

होय मीच सुजाता बोलतेय(२०१९)  माझ्या संसाराची राख रांगोळी झाली सारं होत्याचं नव्हतं झालं माझ्या उभ्या आयुष्यात असला पाऊस आणि असला महापौर मी पाहिला नाही काय करायचं मी कसं करायचं मला काही सुचत नाही सारा संसार उध्वस्त झालाय प्रपंचा उघड्यावर पडलाय घरादाराची पार वाट लावली या या पावसानं गोटा जनावराविना सुना सुना झालाय शेताचा सारा चिखल करून टाकलाय या महापुराण माझा संसार उघडा करून टाकलाय रडते काय म्हणतेस अर्ज रडू नको तर काय करू ग अगं ज्याचं जळतं त्याला कळतं या फोनला तर सांदाच नाही सारखा आपला वाजत असतो आणि सारखा सारखा एकच प्रश्न हॅलो हॅलो कोण बोलतोय हा होय होय मीच सुजाता बोलते होय होय तीच सुजाता आंबी अहो मग व्हिडिओ कॉल करायला लावायचा ना म्हणजे नुसता आवाज आला नसता तर मी सुद्धा दिसले असते त्या व्हिडिओतील सुजाता सारखीच बरं आता ठीक आहे थँक्यू थँक्यू फोन करून कौतुक केल्याबद्दल फोन ठेवते अगं सारजा असा सारखा फोन येतोय बघ अख्या महाराष्ट्रातून फोन यायला लागल्यात बघ सगळी कौतुक करतात पण किती जणांचा फोन घ्यायचा कुणाकुणाशी बोलायचं आणि तुला सांगतो सारजा काय म्हणून काय विचारतेस अगं फोनवरून विचार त्यात की क...

शेतकरी (मुले) २०१७ नाट्यछटा ७

 शेतकरी (मुले)           अहो, कोणी पाणी देता का पाणी ? माझ्या शेताला पाणी देता का? अहो, खूप वेळच नाही तर खूप दिवस झाले आहेत. माझ्या शेताला पाणी पाजून. पाण्याची पाळी अजून आलेली नाही. अहो, जीव कसा नकोसाच होतोय बघा. पार सुकून गेलाय माझे जीव. माझंच मला बघूसुद्धा वाटंना त्याच्याकडं. जीव अगदी कासावीस होतोया. तासभर आपल्याला पाणी मिळालं नाही तर घसा कोरडा पडतोया आपला. आणि इथं माझ्या शेताला एक महिना होत आलाय पाणी पाजून. काय म्हणत असेल हो ते?  माझं शेत वाळवून घट्ट झालंया. बिचाऱ्याला बोलतापण येत नाही. नाहीतर माझ्यासारखंच ओरडून सांगितलं असतं त्यांनं. पण काय करणार बिचारं? टाचा घासून घासून गप्प पडलंया. काय म्हणतोस रे लेखा गणप्या? नदीला पाणीच नाही तर देणार कोण? आणि कुठलं? होय रे बाबा, तू म्हणतोयस त्यात तथ्य आहे. आवंदा पाऊस पडला नाही, त्यामुळे दुष्काळच पडलाय. माहिती मला, त्येला तू तरी काय करणार आणि मी तरी काय करणार? पण कायतरी मार्ग काढायला पाहिजे का नको? तू सांग मर्दा. होय रे बाबा, तुझं खरं हाय. मायबाप सरकार मदत करणार हाय, तसं आसवासनबी दिलंया सरकारनं. समद्या शेतकरी बां...

मोबाईल नाट्यछटा ९

 ' मोबाईल ' नाट्यछटा काय म्हणायची ही कटकट? किती आलेत हे मेसेज? आणि कसले कसले मेसेज हे? काय म्हणे तर गुड मॉर्निंग, गुड नाईट. नुसता वैताग आला या मेसेजचा. त्यात आणखी इतके मेसेज. कोणताही ग्रुप घ्या. प्रत्येक ग्रुपवर हेच आणि असलेच मेसेज. बरं किती वेळा सांगायचे यांना, ऐकतील ते कसले सदस्य? कितीही सांगा यांना. यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. म्हणतात ना की, 'गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता.' अहो, थांबा थांबा. असा तुम्हीबी गोंधळ घालू नका. तुम्हाला बोलत नाही मी. अहो, मी बोलतोय ते मोबाईलवर येणाऱ्या व्हाट्सअपच्या मेसेजबाबत. तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका. अहो मंडळी, काय म्हणताय? याचा तुम्हालाही चांगलाच अनुभव आलाय.  अहो येणारच. जिथे मला अनुभव आलाय, तिथं तुम्हालाबी आला असणारच. एकेकाला कितीही वेळा सांगा. पण ऐकतोय कोण? काय बरं म्हणतात ते ..... हं आठवलं आता. 'दोन हाणा पण मला दादा म्हणा' तसं झालंय बघा सगळ्यांचं. यांना कितीही सांगा.  पण फरक मात्र काहीच पडत नाही. गुड मॉर्निंग आणि गुड नाईट असले मेसेज पाठवणारच. लोकमान्य टिळकांनी म्हटले होते, की 'स्वराज्य हा माझा जन्मस...

रस विचार नाट्यछटा ८

              रसविचार नाट्यछटा            नमस्कार मंडळी, नमस्कार. बरेच दिवस झाले तुमची गाठभेट होऊन. म्हणून यावं लागलं भेटायला तुम्हाला. नाहीतरी वर्ष गेलं असेल आपल्याला भेटून. अहो, असं काय बघताय माझ्याकडे? अहो, मीच तुमची मैत्रीण आहे. अगं चिंगे, थांब, थांब. मी सगळं सांगते तुम्हाला. एक नवा अनुभव देणार आहे मी तुम्हाला. तो आणि कसला अनुभव, म्हणतेस तू सोनू? अगंबाई, मी तुम्हाला रसाबद्दल सांगणार आहे. काय गं राणी? तुला माहिती आहे! मग सांग ना तूच. काय? उसाचा रस. अगं बाई, पण ऊस फार गोड लागला म्हणून तो मुळासकट खाऊ नये. त्या रसाबद्दल मला सांगायचं नाही. अगं हिरा, नावसुद्धा घेऊ नकोस त्याचं. नुसत्या नावानंसुद्धा माझं तोंड कडू झालं बघ. अगं मी त्या रसाबाबत बोलत नाही. हं हे आणि कोण म्हणालं, की लोखंडाचा रस? चिंगे, तुझंच काम आहे हे. तुझे बाबा आहेत ना कारखान्यात, फाउंड्री उद्योगात. मग तुला या रसाशिवाय दुसरा रस कसा माहिती असणार? अगं बायांनो, मला या रसावर सांगायचं नाही. तर साहित्यातील रसाबद्दल सांगायचं आहे. ही कोण बोलली म्हणायची कोकिळा? खोरं, पाटी...

आरक्षण - नाट्यछटा ३

आरक्षण अबब! केवढी मोठी गर्दी झालीया म्हणायची ही! कशाबद्दल जमलेत लोक म्हणायचे एवढे? मोर्चा निघालाय हा? आणि कशासाठी? आरक्षणासाठी! पण आरक्षण म्हणजे काय बुवा? हा शब्द मी आजपर्यंत ऐकलाच नाही....काय म्हणालात बाबा? आरक्षण म्हणजे राखीव जागा. हां बरोबर आहे. राखीव जागाबाबत मला माहिती आहे. निवडणुकीच्या वेळेला राखीव मतदार संघ असतात. त्या जागेवर मागासवर्गीय समाजातील माणसांनी निवडणुकीला उभे राहायचे असते. तिथं दुसऱ्या समाजातील माणसांना उभे राहता येत नाही. होय होय चिंगी, तू म्हणतेस तेही बरोबर आहे. स्त्रियांसाठीपण राखीव मतदारसंघ असतात.  सॉरी सॉरी स्त्रियांसाठी नाही, महिलांसाठी. अगं चिंगे, स्त्रिया म्हणजे महिलाच. मतपत्रिकेवर महिला असे लिहिलेले असते. म्हणूनच आज अनेक ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज आलेले आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्येही महिलाराज आलेले आहे. त्यांच्यासाठी पन्नास टक्के जागा राखीव आहेत ना! आहेत पण....दादा, या मोर्चामध्ये पुरुषाप्रमाणे महिलाही दिसत आहेत. मग कशाबद्दल मोर्चा आहे म्हणायचा हा? आणि सगळीकडे भगवेच भगवे झालेले आहे ना. काय म्हणतोयस दाद्या? मराठा मोर्चा आहे हा! मराठी माणसं आहेत...

रोबो नाट्यछटा १०

रोबो अहो वैताग आलाय या जीवनाचा. किती आवरायचं म्हटलं तरी काही आवरता येत नाही. बाबांना कितीही सांगितलं तरी तेही ऐकत नाहीत. अहो, कशाबद्दल काय म्हणतोय मी? आणि का वैतागलोय मी? अहो, सकाळी उठल्यापासून सारा पसारा आटपायला लागलोय तरी ते काम काय संपत नाही. बाबांना किती सांगितलं की तुमचं ऑफिसचं काम घरात आणू नका. माझं ऐकतील ते बाबा कसले? त्याची पण एक गंमत आहे. अहो ते दुसरीकडे कोणाकडे नोकरीला नाहीत, तर त्यांची स्वतःची एक प्रयोगशाळा आहे. ती आणि कसली? म्हणून काय विचारताय. ते एक शास्त्रज्ञ आहेत. काय? तुम्हाला माहिती नाही. तसे ते फार मोठे शास्त्रज्ञ नाहीत, जगाला सांगण्यासारखे मोठे नाहीत, पण मला खात्री आहे की एक ना एक दिवस ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ झाल्याशिवाय राहणार नाहीत. होय. होय. त्यांच्या करामतीवरून तरी मला तर तसेच वाटते बघा. अहो, हेच बघा ना. त्यांचा मांडून ठेवलेला पसारा. ते मला नेहमी म्हणतात की, हे बघ रामू, आपण काही साधीसुधी माणसं नाही आहोत. आपण या जगातली लय भारी माणसं आहोत. एक ना एक दिवस माझी नोंद या जगाला घ्यावीच लागेल. कारण मी असा नवा शोध लावून दाखवीन तरच मी खरा शास्त्रज्ञ म्हणून नाव सांगीन. हां,...

काळ्या दगडावरची रेघ डॉ. श्रीकांत पाटील

*"काळ्या दगडावरची रेघ"*  कवी - डॉ. श्रीकांत पाटील त्रिकालाबाधित सत्य ज्या काव्यसंग्रहातून डॉ. श्रीकांत पाटीलसरांनी मांडले आहे तो काव्यसंग्रह म्हणजे काळ्या दगडावरील रेघ.          डॉ. श्रीकांत पाटील यांनी लाॅकडाॅऊन, ऊसकोंडी, पाणीफेरा या यशस्वी कादंबरी लेखन आणि महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त "सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल" या बालकादंबरीनंतर  काव्य लेखनाच्या सागरात मनसोक्त विहार केला तो *काळ्या दगडावरील रेघ* काव्यसंग्रहाने.       या काव्यसंग्रहातून  शिक्षण, शाळा, समाज, दुष्काळ, पूर अशा नैसर्गिक आपत्ती, नातेसंबंध असे नानाविध विषय डॉ. श्रीकांत पाटील यांनी हाताळलेले दिसून येतात. कविता कशावर लिहावी असा प्रश्न आपणास पडावा इतके असंख्य विषय भोवताली आहेत.... म्हणूनच कवी आपल्या कवितेतून लिहितात ....      कशाकशावर लिहावी कविता,   माणसांमुळे बदललेल्या निसर्गावर की, माणसांच्याच बदललेल्या नेचरवर...     ‌ कार्टून्स, कुठे हरवली शाळा, कोरी पाटी, जीवनाचा वाटसरु  या कवितातून आजच्या परिस्थितीवर कविता...

बंद रेशमाचे काव्यसंग्रह श्री रामदास कोरडे बुलढाणा

'बंध रेशमाचे' ह काव्यसंग्रह श्री. रामदास कोरडे साखरखेर्डा तालुका सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा  यांनी लिहिलेला आहे. विविध विषयांनी नटलेला वास्तववादी कवितांचा संग्रह म्हणजे 'बंध रेशमाचे'.           आपल्या मनात आलेले विचार, भावना, अभिव्यक्ती करण्यासाठी कवी कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतो. मनातील भावभावना, सुखदुःख आणि अनुभव यांचा खजिना कवी श्री. रामदास कोरडे हे कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतात. कवीने आपल्या जीवन प्रवासात पाहिलेले, अनुभवलेले, जोखिलेले आणि साहिलेले अनुभवांचे संचित कवितेच्या माध्यमातून साकारलेले आहे. बंध रेशमाचे या कवितासंग्रहात समाज, संस्कृती, अध्यात्म, भक्ती, प्रीती अशा विविध विषयातून कवितेची मांडणी केलेली आहे. कवितासंग्रहाची सुरुवात - 'अजूनही भेट तिची...' या प्रेम कवितेतून होते.  'अजूनही भेट तिची घडते कधीकधी  नकळत आसवे ती गाळते कधीकधी  झुरते ती झुरतो मी मनात कधीकधी  हृदयात आठवणी मी पचवितो कधीकधी' यासारख्याच तुझ्यासाठी, मंगळसूत्र, बंध रेशमाचे, जीवनसाथी, तुझ्यात जीव गुंतला, जन्म हाच खरा, एक नकार यासारख्या प्रेम विषयक कवित...