Posts

Showing posts from October, 2021

वाचन एक छंद

                             वाचन एक छंद            मला चांगलंच आठवतं की माझ्या लहानपणी गावात काही घरामध्येच लाईट आलेली होती. अनेक घरात दिवा, कंदील यांच्या प्रकाशातच वाचन, लेखन करावं लागायचं. आमच्याच घरी नव्हे, तर आमच्या गल्लीतही लाईट नव्हती. मी अभ्यासासाठी समोरच्या यशवंत बाबू पाटील (वकील) यांच्या घरी जात असे. त्यांच्या घरी दिवा घेऊन वाचन करत असलेला मी अजूनही माझ्या स्मरणात आहे. वाचताना खाली वाकल्यानंतर माझ्या डोक्यावरील केसांना धग लागून चर चर आवाज झाल्याचे अजूनही आठवते.                 मी माझ्या मित्राबरोबर शाळेला प्रथमतः गेलो तो दिवस मला आठवतो. गावात बालपणी श्रावण महिन्यात पोथी-पुराणांचे वाचन व्हायचं. त्यावेळी आम्ही ते ऐकायला जात होतो. प्रसाद खायला मिळतो या आशेने अधिक जात होतो. त्यावेळी पांडवप्रताप, श्री विजय, ज्ञानेश्वरी असे ग्रंथ वाचले जात होते. ग्रंथाचा अर्थ सांगितला जात होता. त्यावेळी मला फारसे कळत नव्हते. पण मला वाचनाची गोडी लागण्या...

इच्छा असेल तर मार्ग दिसेल

               एक छोटंसं गाव होतं. त्या गावात एक छोटंसं कुटुंब राहत होतं.  त्या कुटुंबात वडील, मुलगा व त्याच्या तीन बहिणी असा परिवार राहत होता. लहान मुलाची खूप मोठी स्वप्न होती. पण आपली परिस्थिती नसल्यामुळे आपण काही करू शकणार नाही असे त्याला वाटत होते. तो उदास उदास वाटत होता. त्याच्या वडिलांना कळलं की हा उदास आहे. त्याच्या वडिलांनी मनोमन विचार केला  'हे असंच चालू राहिलं तर संपवून टाकेल सगळं. पुढं काहीच नाही घडणार.' त्याच्या या उदासपणातून त्याला बाहेर काढायचं असं त्यांनी ठरवलं.                      एके दिवशी त्याच्या वडिलांनी एक अत्यंत फाटकं व जीर्ण झालेलं  कापड घेतलं. त्या कापडाचा एक रुमालाएवढा तुकडा फाडला.  ते म्हणाले, "बाळा हा तुकडा कोणी दहा रुपयाला विकत घेतं का बघ? "  अत्यंत जीर्ण झालेलं ते कापड होतं,              " किती जुनं कापड आहे हे बाबा? कोणी घेईल का? "             " प्रयत्न तरी करून बघ."...

आत्माराम - नाट्यछटा - ११

            नाट्यछटा ---            'आमुचा रामराम घ्यावा' नमस्कार मंडळी. कसे आहात? बरे आहात ना? बरे असायलाच पाहिजे. अहो, इकडे तिकडे काय बघताय? मी तुमचा आत्माराम बोलतोय. होय मी आत्मारामच आहे. अहो, तुमच्यासमोर असलेल्या फोटोतील आत्माराम बोलतोय. अहो राम तर कधीचा गेला. मी फक्त त्याचा आत्मा बोलतोय. काय म्हणताय? तुमचा विश्वास बसत नाही. कसा बसणार? फोटोतील व्यक्ती कधी बोलते का? नाही ना! अहो सही रे सहीवाला भरत जाधव यांच्या 'श्रीमंत दामोदर पंत' या चित्रपटामधील फोटोतील माणसं बोलतात ना!  हे तुम्ही पाहिलेच आहे ना! काय म्हणताय? हा चित्रपट आहे! चित्रपटात तसं काहीबी चालतंय! अहो, तसाच मीसुद्धा आज तुमच्याशी बोलतोय. हे मात्र चित्रपट किंवा नाटक समजू नका बरं का? खरंच मी या फोटोतील आत्मारामचा आत्मा बोलतोय. अहो मंडळी, आज तुम्ही माझ्या वर्षश्रद्धाच्या निमित्ताने येथे जमलेला आहात ना! होय रं माझ्या लेकरा. आज बरोबर एक वर्ष झालं मला जाऊन. म्हणूनच तुम्ही या ठिकाणी जमलेला आहात. माझ्या आठवणी जागृत करण्यासाठी. हां बरोबर आहे. माझ्या वर्षश्रद्धाच्या निमित्त...

कष्टाचे फळ

                 आटपाटनगर नावाचं एक गाव होतं. त्या गावातील सारे लोक सुखी, समाधानी, आनंदी होते. त्या गावाच्या विकासाचे खरे वैशिष्ट्य म्हणजे त्या गावातील शाळा. त्या शाळेचे नाव होते विद्यामंदिर आटपाटनगर.                                           एके दिवशी त्या गावात शामराव नावाचा एक माणूस आपल्या परिवारासह बकरी घेऊन आला होता. तो दररोज आपली बकरी घेऊन एका शेतकऱ्याच्या रानामध्ये बसवत होता. एकदा त्या शाळेच्या समोरील रानात त्याने आपली बकरी बसवली होती. ते रान त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे होते. शामरावचा मुलगा राम. त्याला या भटक्या जीवनामुळे शाळा शिकता येत नव्हती. पण तो बुद्धीने तल्लख होता. दुसऱ्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक पाटीलसर आपल्या रानात आले होते. तेव्हा शामराव त्यांना म्हणाला, "काय सर, कशी आहे तुमची शाळा ?" त्यावर पाटीलसर म्हणाले, "चांगली आहे शाळा. शाळेमध्ये मुले येतात. त्यांना आम्ही मन लावून शिकवतो. मुले चांगली शिकतात. त्यामुळे आमच्या ...

वाचन प्रेरणा दिन

वाचन प्रेरणा दिन : अहवाल लेखन  वार :   शुक्रवार                      दि. १५/१०/२०२१              विद्यार्थी नाव :                                    इ.  र. नं.                                                प. नं.  १) समूह वाचन : ------ पुस्तकाचे नाव :               लेखकाचे नाव : ऐकलेल्या पुस्तकाचा सारांश :  ७/८ ओळी पुस्तकाबाबत अभिप्राय : ४/५ ओळी २) वैयक्तिक वाचन :----  वाचलेल्या पुस्तकाचे नाव : लेखकाचे नाव : वाचलेल्या पुस्तकाचा सारांश :  ७/८ ओळी पुस्तकाबाबत अभिप्राय : ४/५ ओळी   ३) व्याख्यान :-----   व्याख्यात्याचे नाव :   व्याख्यानाचा विषय :    व्याख्यानाचा सारांश : ७/८ ओळी ४) संपूर्...

शाळेला जाऊया

    शाळेला जाऊ या शाळेला आपण जाऊ या  नवी गाणी गाऊ या  अभ्यास खूप करू या मोठे आपण होऊ या  मैदानावर खेळ खेळूया  गंमत आपण करूया  डबे आपण घेऊ या  पोटभर जेवण करूया   आनंदाने आपण शिकू या  परीक्षा पास होऊ या सरांचा आशीर्वाद घेऊ या  कोरोनाला आपण पळवू या  पाटील मयुरेश भिवाजी इ. ८ वी  श्री नवनाथ हायस्कूल  पोहाळे तर्फ आळते ता. पन्हाळा जि. कोल्हापूर

कठीण प्रसंग

                         *कठीण प्रसंग*              माणिकपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात सुख समृद्धी नांदत होती. अशा छोट्याशा गावात बारा-तेरा वर्षाचा एक शाळकरी राजू नावाचा मुलगा होता. तो त्याच्या आईसोबत राहत होता. राजू शाळेत खूपच हुशार आणि इतर कामात चतुर होता. तो प्रामाणिक होता. राजूची आई ही साधी, सरळ आणि नाकासमोर चालणारी बाई. राजू लहान असताना राजूच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राजूची आई दुसऱ्यांच्या शेतात जाऊन शेतमजुरी करायची. आपल्या घरचा खर्च ती बघत होती. अशा गरीब परिस्थितीमध्येही राजू आणि त्याची आई सुखाने जगत होती. राजूची आई राजूचा शाळेचा खर्च बघत होती.                एके दिवशी राजूची आई शेतात काम करत असताना अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळली. शेतातल्या लोकांनी राजूच्या आईला घरी नेले. राजूला हे कळताच तो घाबरला. त्याच्याकडे आईला दवाखान्यात घेऊन जाण्यापुरतेही पैसे नव्हते. अगदी थोड्याशा पैशाने त्याच्या आईचा पूर्ण इलाज होणार होता. पण उपचारा...

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

                   *शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ*    वनात एक सिंह राहत होता. त्याच्या अंगात शक्ती फार होती. त्यामुळे तो गर्वाने फुगून गेला होता. त्याने त्या वनातील, वाटेतील हरणे, ससे वगैरे प्राणी मारून आपली उपजीविका करावी असा त्याचा क्रम चालू होता. हा असाच प्रकार चालू राहिला तर वनात एकही प्राणी जिवंत राहणार नाही असा त्या वनातील सर्व प्राण्यांना मोठा धोका वाटत होता. म्हणून सर्व प्राणी मिळून सिंहाकडे गेले. त्यांनी मोठ्या नम्रतेने सिंहाला विनंती केली, "महाराज, खरे पाहिले तर आपली भूक शमविण्यासाठी रोज एक प्राणी पुरा होतो. असे असताना आपण आम्हा गरीबांचा का बरे प्राण घेता? आजपासून तुम्ही आपले येथे बसूनच रहा. दररोज पाळी लावून आम्ही आमच्यापैकी कोणीतरी एक जण आपल्या भोजनाकरिता पाठवून देत जाऊ." हे त्या पशूंचे शहाणपणाचे बोलणे ऐकून सिंह त्यांना म्हणाला, "तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. बसल्या जागेवरून मला जर एक पशू खावयास मिळाला तर आणखी काय पाहिजे? पण लक्षात ठेवा, की एक दिवस जरी यात चूक झाली, तरी सगळ्यांचाच मी बार उडविन. सर्वांना एकदम मारून टाकीन....

प्रकाश साखरेसर

प्र काश तू नवलेखकांचा का  निर्णय घेशी जाण्याचा श त जन्माचा घेऊनि वसा सा थ सोडूनि सर्वांची कसा ख रोखरी चटका लावी जिवा रे षा नात्यांची विणूनी भावा स र शब्दांची उंची वाढवूनी र व न होताच जाशी निघुनी प्रकाश साखरेसर, न येण्याच्या परतीच्या मार्गावर आपण निघून गेलात. अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळास पोरके करून गेलात. आपणास भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

२. *सत्त्वपरीक्षा*

                            २.   *सत्त्वपरीक्षा*                                                        'टाॅऊन हाॅल' कंडक्टरचा आवाज झाला. मी हातात सुटकेस घेऊन एस.टी.तून खाली उतरलो. मनगटाकडे  पाहिले, तर तीन वाजून पंचवीस मिनिटे झाली होती. कशाचाही विचार न करता मी नाकासमोर चालू लागलो. कारण मला सोन्या मारुती ते वरणगे ही साडेतीनची बस पकडायची होती. त्यामुळे मला कशाचंच भान नव्हतं. 'मधू मधू' असा मागून आवाज आला. पण लक्ष न देता मी तसाच चालत राहिलो. रिक्षाचा हॉर्न वाजता वाजता अचानक कचकन ब्रेक लावल्याचा आवाज आला. मागे वळून पाहिले तर रिक्षा जवळ उभी होती. रिक्षातून बाजूला केशव उभा होता.               "अरं मधू, तुला किती हाका मारायच्या. तू आपल्या स्वतःच्या तंद्रीतच होतास. बरं मला सांग की मी ऐकलं ते खरं आहे का?" त्याचं आपलं बडबडणं सुरू हो...

कथा-- नेत्रदान

                              *नेत्रदान*           आज श्रीकांत  रडत होता. पण ते दु:खाश्रू नव्हते, तर आनंदाश्रू होते. त्याच्या कुशीमध्ये त्याची मुलगी सपना होती. तीही रडत होती. त्याला कारणही तसेच घडलेले होते.  ते म्हणजे श्रीकांतने आपल्या मुलीला म्हणजेच सपनाला आपले दोन्ही डोळे दान केले होते.  म्हणून सपना आज सारे जग पाहत होती, पण श्रीकांत मात्र काहीच पाहू शकत नव्हता.  कारण त्याचे दोन्ही डोळे त्याने आपल्या मुलीला सपनाला दान दिले होते. सपनाला दृष्टी आली होती. ती सारखी सारखी न्याहाळून पाहू शकत होती , पण जेव्हा तिला कळले होते , की मी जे पाहू शकते ते माझ्या बाबांच्या डोळ्यांनी पाहू शकतेय, मात्र माझ्यामुळेच माझ्या बाबांना दृष्टिहीन व्हावे लागत आहे .  म्हणून तिला खूप खूप वाईट वाटत होते. तिचाच तिला राग येत होता. म्हणून ती हमसून हमसून रडत होती.  श्रीकांतही रडत होता. मात्र ते त्याचे दुःखाश्रू नव्हते, तर ते सुखाश्रू होते . कारण आज आपली मुलगी सपना सारे जग पाहत होती, म्ह...