Posts

Showing posts from January, 2022

१) *वाट ही पुनवेची (पुनर्लेखन)*

*वाट ही पुनवेची*          नृसिंहवाडीत श्री दत्ताचे दर्शन घेतले आणि  मदन गावाकडे परत जाण्यासाठी निघाला. एस.टी.ला खूप गर्दी होती. कारण पौर्णिमा होती. तीही मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा. म्हणजे दत्त जयंती होती. हजारो भाविक दत्त दर्शन घेण्यासाठी नृसिंहवाडीत आले होते. सूर्य मावळतीकडे झुकला होता. गाव ओढीने लोक परत चालले होते. नृसिंहवाडीपासून जयसिंगपूरपर्यंत सारख्या गाड्या होत्या. तिथून वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या गाड्या सुटत होत्या. त्यातील एक गाडी पकडून मदन जयसिंगपुरात आला.           कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाडीची वाट पाहू लागला. एक आराम गाडी आली. त्या गाडीत चढला. परत खाली उतरला. कारण त्या गाडीला तिकीट दर नेहमीपेक्षा अधिक होता. पण त्याचे काही वाटले नसते त्याला. पण कोल्हापूरपर्यंत उभे राहून जावे लागले असते. त्याने जनता गाडीनं जायचा विचार केला. जनता गाडी येण्यास अजून थोडा अवधी होता. म्हणून तो चहा घेण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेला.          जनता गाडी आली. गाडीत चढायला झुंबड उडाली.  उतरणार्‍या प्रवाशांना वाट मि...

१२.चूक एकदाच होते---कथा

                         १२. *चूक एकदाच होते*            सूर्योदय झाला. सखूच्या आनंदाला पारावर उरला नाही. कारण त्या दिवशी पौर्णिमा होती. तीही वटपोर्णिमा. सकाळपासून ती लगबगीने वावरत होती. एक वेगळाच उत्साह तिच्या चेहर्‍यावर झळकत होता. कामाच्या घाईत सूर्य केव्हा डोईवर आला हे तिला कळलंच नाही. शेजारच्या बायका वडाची पूजा करायला निघाल्या होत्या. सखूचं काम संपता संपेना. भांडीकुंडी, कपडे धुणे, जेवण करणे इत्यादी अशी एक भंकी दोन कामं! त्यात पौर्णिमा म्हटले की पोळ्या कराव्या बंद बळलागल्या. नवरा काहीतरी काम करायचा; पण आज त्याला सुट्टी नसल्यामुळे तो घरी नव्हता. त्याचं नाव सर्जेराव. बँकेत कर्मचारी म्हणून काम करीत होता.               सखूचं मन समुद्राच्या लाटांवर हेलकावणारी  सारखंच हेलकावत होतं. गल्लीतल्या सगळ्या बायका वडाची पूजा करून परत आल्या. 'माझं मलाच कळंना झालंया की पूजा करायला जावं की जाऊ नये. जायचं ठरवलं तर काम काही संपना. काम बाजूला ठेवून जायचं तर मन तयार ह...

११. असे घडले साहित्य संमेलन

         ११. *असे घडले साहित्य संमेलन*          नवं वर्ष उजाडलं की नवं वारं व्हायला सुरुवात होते. अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हटलं की, त्याचं स्थळ, अध्यक्षपद, स्वागताध्यक्ष यांची रणधुमाळी सुरू होते. त्याचबरोबर विद्रोही साहित्य संमेलन, परिवर्तन साहित्य संमेलन, अखिल विश्व मराठी साहित्य संमेलन अशी कितीतरी साहित्य संमेलने होतात. काही ठिकाणी प्रादेशिक साहित्य संमेलने भरविली जाऊ लागली आहेत. याचाच परिपाक म्हणजे आज खेड्यापाड्यांतसुद्धा साहित्य संमेलने भरवली जाऊ लागली आहेत. साहित्य चळवळीला उर्जितावस्था प्राप्त झाली. साहित्य संमेलने ही सार्वत्रिक झाली आहेत.               मग याला आमचं गावही कसं अपवाद राहील. तसं आमच्या गावचं नाव थोडं विचित्रच  आहे. अवघडवाडी. या अवघडवाडीतील किसन्या, पक्या, बाळा आणि झेंगाट. होय झेंगाट म्हणतात त्याला. तसं त्याचं खरं नाव उत्तम तांगमारे. पण साऱ्या गावात झेंगाट लावायला एक नंबर. याचं त्याला सांग, त्याचं याला सांग. कोणाला कसं पालथं घालावं हे त्याच्याकडूनच शिकावं. एकही दिवस असा ज...

१० . कुलदीपिका

                          *कुलदीपिका*              कमळा वहिनीला पुन्हा एकदा मुलगीच झाली. हौसा सुईनींनं तिची यापूर्वी चार बाळंतपणं केली होती.  तिचं हे पाचवं बाळंतपण होतं. नाक मुरडत, पदर पचत बाहेरच्या बाजूला आवाज देत हौसा म्हणाली, "बायजाक्का नात झाली बघ तुला." असं ऐकताच देवघरात जपमाळ करत बसलेल्या बायजाक्कानं आपल्या तोंडाचा पट्टा चालू केला, "देवा, देवा,  देवा. कुठल्या जन्माचे पाप भोगायल लावलंस रं बाबा तू. वळिनं चार पोरी दिल्यास, पण काय म्हटलं नाही तुला. आता पोरगा देशील असं वाटलं होतं. पण पाचव्यांदाही पोरगी दिलीस. किती आशेनं पाहत होते मी. बाजीरावाला सांगत होते की, अरे बाबा! कोल्हापुरातल्या डॉक्टरकडून तपासून घे. पण त्यांना नकार दिला होता. तो म्हणायचा की, अगं आई तपासणी करून घ्यायला बंदी आहे. डॉक्टर तयार होत नाहीत. पोरीचं लगीन करायचं म्हटलं तर  हुंडा द्यावा लागतो. ओळीने पाच पोरीची लग्नं करावी लागणार. त्यासाठी राब राब राबावं लागणार."              ...

९. सपान

                    ९. *सपान*             रामपूरवाडी तसं हजारभर लोकवस्तीचं गाव. गावाजवळून एक भली मोठी नदी वेडीवाकडी वळणे घेत वाहत होती. गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं होतं. या गावाचा इतर गावाशी येण्या-जाण्यासाठी कोणताच मार्ग नव्हता. गावातल्या माणसांना परगावी जायचे असेल किंवा परगावच्या लोकांना या गावात यायचं असेल; तर नावेतून ये-जा करावी लागत होती.             फेब्रुवारी ते मे या उन्हाळी महिन्यात नदीतून चालत जाण्यासाठी वाट होती. कारण नदीचे पाणी कमी व्हायचे. पण मृगाचा पाऊस सुरू झाला की नदीला पाणी येई. त्यावेळी अल्याड पल्याड करायला नावेशिवाय पर्याय नव्हता. नाव चालवायला त्याच गावातील एक कुटुंब होते.  लोक त्यांना 'आंबी' असे म्हणत होते. नाव चालवायचा मक्ता महादेव आंबी यांच्याकडे होता. सारा गाव त्यांना म्हादू मामा म्हणायचं. नदीकडे जाण्यासाठी एक पाणंद होती. ती अरुंद होती. अगदी पायवाटेसारखीच होती. तिला 'नावंची वाट' असे म्हणत होते. दोन्ही बाजूंनी शेती होती. शेतकऱ्यांनी शेतीच्या भ...

८. *हा दोष कोणाचा?*

* हा दोष कोणाचा?* (या कथेतील पात्रे, स्थळ, प्रसंग काल्पनिक आहेत. जर कोठे संबंध आल्यास तो केवळ योगायोग समजावा.)             सकाळी सातची वेळ. पूर्व दिशेला लाली पसरलेली होती. शहरातील मुख्य रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. याच रस्त्यावर महानगरपालिकेचा दवाखाना. अचानक दवाखान्याच्या दुसऱ्या मजल्यावरील पश्चिमेकडील एका खोलीतून 'माझा बाळ, माझा बाळ...माझा बाळ बोलंना झालाय अशा आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. दवाखान्यात एकच गडबड सुरू झाली. डॉक्टर, नर्स यांची तारांबळ उडाली होती. कुणीतरी १०० हा नंबर फिरवला. थोड्याच वेळात पोलीस गाडी दवाखान्याच्या दारात आली. या गाडीतून शिंदे साहेब दोन पोलीस शिपायांबरोबर आले होते. ड्युटीवर असलेले डॉक्टर माळी त्यांना सामोरे आले. ते शिंदे साहेबांना घेऊन स्त्री वार्डमध्ये त्या काॅटजवळ गेले. पोलीस अधिकारी असूनही ते काही क्षण थरारले. समोरचा प्रसंग पाहून त्यांची मती गुंग झाली. आपण पाहत आहोत ते सत्य आहे की स्वप्न? असा क्षणभर भास झाला. त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तरीही ते सत्य होते.          तेथे असलेल्या त्या कोपऱ...

कथा ----' छोटी चूक ' गौरी तानाजी कुंभार

छोटी चूक माणिकपूर नावाचे एक गाव होते त्या गावांमध्ये एक छोटेसे कुटुंब राहत होते त्या कुटुंबात सुनील त्याची आई व पत्नी सोबत राहत होता सुनीलला शहरामध्ये एक चांगली नोकरी होती सुनील ची पत्नी शामल ही खूप हळवी व प्रेमळ होती तसेच तिच्या मनात मोठ्या विषयी खूप आदर होता याच कारणामुळे सुनील ची आई कौशल्या आणि शामल यांच्यामध्ये सासू-सुनेचं नातं अगदी घट्ट झालं होतं एके दिवशी कौशल्याने सुनीला सुनील ला बोलावून सांगितले आज आपल्या घरी खास पाहुणे येणार आहेत त्यांच्या साठी एक छानशी काचेची भेटवस्तू आन त्याप्रमाणे त्याने एका दुकानातून एक काचेची छान पैकी वस्तू आणली एका कपाटात ठेवली दुसऱ्या दिवशी पाहुणे आले त्यांच्या पाहुणचारात सामने जरासुद्धा काटकसर केली नाही पाहुणे मंडळी शामल वर खूपच खुश होते तुमचा मुलगा व सून खूपच संस्कारक्षम आहेत असे ते म्हणत होते तेवढ्यात कौशल्याने पावण्यासाठी अंजली काचेची भेटवस्तू सुनीला आणायला सांगितली त्याप्रमाणे श्यामने ती वस्तू कपाटातून हाणली पळ पाहुण्यांच्या कडे येता येता तिचा पाय घसरला आणि तिच्या हातून काचेची वस्तू खाली पडली ती जमिनीवर पडताच तिचे तुकडे तुकडे झाले हे पाहून पाहुणेमं...

कथा सिद्धी साळोखे

            रामपूर नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावांमध्ये एक शेतकरी राहत होता. त्याची परिस्थिती अतिशय गरीब होती, पण तो खूप कष्टाळू होता. त्याला चार मुले होती. त्या चारही भावांचे आपापसात पटत नव्हते. ते सतत एकमेकांबरोबर छोट्या-मोठ्या कारणांवरून भांडायचे. त्यांचे भांडण लागू नये; म्हणून त्यांचे आई-वडील त्यांना कोणत्याही गोष्टीची समान वाटणी करून द्यायचे. त्यांचे आई-वडील त्यांना उपदेश करून थकले होते. परंतु त्यांच्या वर्तवणुकीत कोणताही बदल घडून येत नव्हता. या सर्व मुलांची वागणूक पाहून त्यांचे शेजारी त्या मुलांना  फार नावं ठेवायची. हे सर्व पाहून त्या म्हाताऱ्या आई-वडिलांना मुलांची फार काळजी वाटत होती.                   एके दिवशी त्याने आपल्या मुलांना वेगळ्या पद्धतीने समजावून सांगायचे ठरवले. त्याने आपल्या सर्व मुलांना बोलावले व रानात जाऊन लाकडी काट्या आणायला सांगितले त्या चार हि भावांनी रानात जाऊन लाकडी काटक्या गोळा करून आणल्या त्यांचे वडील म्हणाले, प्रत्येकाने एक एक काठी उचला व तोडून दाखवा मुलांनी क्षणार्धा...