१० . कुलदीपिका

                          *कुलदीपिका*
             कमळा वहिनीला पुन्हा एकदा मुलगीच झाली. हौसा सुईनींनं तिची यापूर्वी चार बाळंतपणं केली होती.  तिचं हे पाचवं बाळंतपण होतं. नाक मुरडत, पदर पचत बाहेरच्या बाजूला आवाज देत हौसा म्हणाली, "बायजाक्का नात झाली बघ तुला." असं ऐकताच देवघरात जपमाळ करत बसलेल्या बायजाक्कानं आपल्या तोंडाचा पट्टा चालू केला, "देवा, देवा,  देवा. कुठल्या जन्माचे पाप भोगायल लावलंस रं बाबा तू. वळिनं चार पोरी दिल्यास, पण काय म्हटलं नाही तुला. आता पोरगा देशील असं वाटलं होतं. पण पाचव्यांदाही पोरगी दिलीस. किती आशेनं पाहत होते मी. बाजीरावाला सांगत होते की, अरे बाबा! कोल्हापुरातल्या डॉक्टरकडून तपासून घे. पण त्यांना नकार दिला होता. तो म्हणायचा की, अगं आई तपासणी करून घ्यायला बंदी आहे. डॉक्टर तयार होत नाहीत. पोरीचं लगीन करायचं म्हटलं तर  हुंडा द्यावा लागतो. ओळीने पाच पोरीची लग्नं करावी लागणार. त्यासाठी राब राब राबावं लागणार."
              असेच काही महिने निघून गेले. परमेश्वराच्या दरबारात येणार आहे. 'देर है लेकिन अंधेर नहीं है.' असं म्हणतात. त्याप्रमाणे बायजाक्काला परमेश्वर पावला. पंचकानंतर म्हणजे पाच मुलींच्या पाठीवर कमळा वहिनीला सहावा मुलगा झाला. घरात आनंदी वातावरण निर्माण झाले. बायजाक्काला तर स्वर्ग दोन बोटे उरला होता. तिला नातू झाला होता. घराला वंशाचा दिवा मिळाला होता. बायजाक्कानं साऱ्या गावात साखर वाटली होती. बारसं तर मोठ्या थाटामाटात घातलं होतं. तिनं नातवाचं नाव दीपक असं ठेवलं होतं. ती दीपकला हातावरच्या फोडाप्रमाणे जपायची. दीपकचे खूप लाड झाले होते. 
             दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने आणि वर्षामागून वर्षे निघून गेली. बायजाक्काच्या केसांनी केव्हाच रुपेरी चांदणं धारण केलं होतं. पण आज ती एका वेगळ्याच काळजीत पडली होती. पंधरा वर्षापूर्वी वंशाचा दिवा नाही म्हणून तळमळत होती. त्याच वंशाच्या दिव्याने तिच्या घराण्याला काळीमा फसायला सुरुवात केली होती. तिचा नातू दीपक शाळेच्या पायर्‍या काही चढू शकला नाही. पण दारुच्या दुकानाच्या पायर्‍या मात्र दररोज झिजवत होता. रात्री दारू पिऊन यायचा. आपल्या आजीच्या साऱ्या खाणदानाचा उद्धार करायचा. लाडक्या नातवाचा पराक्रम पाहून बायजाक्काला जगावसं वाटत नव्हतं. तरी ती जगत होती. आपल्या एका नातीसाठी. तशी तिला कुठल्याही नातीची काही काळजी करायचं कारण नव्हतं. पहिल्या चार नातींची लग्नं होऊन त्या सासरी सुखात राहत होत्या. आनंदाने नांदत होत्या. तिची पाचवी नात मात्र हिरा होती. तिच्यासाठी ती जगत होती. या दुनियेची रीतच न्यारी असते. नातवासाठी आतुर असलेली बायजाक्का आत्ता मात्र नातवाच्या त्रासाने वैतागून गेली होती.  नात नको म्हणणारी बायजाक्का त्याच नातीसाठी जगत होती. तिच्या पाचव्या नातीचं नाव होतं दीपा. सगळी तिला 'नकोशी'च म्हणायचे. कारण नको असताना ती जन्माला आली होती. पण खरोखरच तिने नावाप्रमाणे आपला प्रकाश पडला होता.
          राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये तिने आपल्या भारत देशासाठी पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.  ती आपला आदर्श कविता राऊत हिला मानत होती. तिने मिळविलेल्या सुवर्णपदकासाठी तिचा सत्कार होणार होता. तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते.  या सत्काराच्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हाधिकारी अशी मोठी माणसे येणार होती. असंख्य प्रेक्षकांसमोर हा कार्यक्रम होणार होता. 
                सत्काराच्या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "आजपर्यंत आपण गावातल्या मुलीबाबत संकुचित दृष्टी ठेवून वागत होतो. त्यांनी चूल आणि मूल एवढेच पहावे असा विचार करत होतो. पण सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या महान कार्यामुळे मुली शिकू लागल्या. वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करून यश मिळू लागल्या. आजचेच उदाहरण पाहा ना! पोहाळेसारख्या एका छोट्याशा खेड्यातून आलेल्या दीपाने पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले आहे. म्हणून आपण तिचा सत्कार करीत आहोत. आपले जुने विचार सोडून दिले पाहिजेत. केशवसुतांंनी म्हटलेले आहे की, 'जुने जाऊ द्या मरणालागुनि जाळुनि किंवा पुरुनी टाका.' म्हणून आपण मुलगा किंवा मुलगी असा भेद न करता त्यांच्याकडे समानतेने पाहिले पाहिजे. स्त्रीभ्रूण हत्या करू नका. तिला जन्मू द्या, जगू द्या, वाढू द्या, हे जग पाहू द्या. मी दीपाला मुख्यमंत्री फंडातून एक लाख रुपयाचा धनादेश देत आहे. 
               मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपाचा सत्कार करण्यात आला. तिच्या गळ्यात हार, हातात सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयांचा धनादेश पाहून आजीचं काळीज भरून आलं. ती काही काळ भूतकाळात गेली. ती सारं सारं आठवू लागलं.......
            दीपाचा सत्कार झाला. टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. एकच जयघोष सुरू होता ----'दीपा मानेचा विजय असो. दीपा मानेचा विजय असो. दीपा मानेचा विजय असो.'
 या जयघोषात बायजाक्काचं मन चिंब भिजून गेलं होतं. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. भरल्या मनानं ती दीपाकडं पाहत होती. 

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.