राजर्षी छत्रपती शाहू महाराज
*राजर्षी छत्रपती शाहू महाराज* महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची दिशा देणारे आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते म्हणून ज्यांना ओळखले जाते ते महाराष्ट्रातील लोकोत्तर पुरुषांपैकी एक असलेले छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज दि. २६ जून २०२६ रोजी १५२ वी जयंती.त्यानिमित्ताने त्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा वेध घेत मी त्यांना मानाचा मुजरा करतो. पारतंत्र्याच्या काळात या स्वयंभू राजपुरुषाने इंग्रजी सत्तेचे जोखड मानेवर असतानाही स्वतःचे सत्व अबाधित राखत मानवतेच्या भूमिकेतून प्रजाजनांचे कल्याण आणि हित रक्षण करीत राज्य कारभार केला. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात जी ध्येय धोरणे राबविली, प्रजेच्या हिताचे जे क्रांतिकारक निर्णय घेऊन अंमलात आणले ते स्वातंत्र्योत्तर काळात केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशातील राज्यकर्त्यांसाठी पथदर्शक ठरले. १ मे १९६० रोजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तेव्हा त्यांनी "या राज...