बाबा आमटे
मी आज तुम्हांला एका महामानवाची ओळख करून येणार आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे 'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले | तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा ||' या उक्तीप्रमाणे वागणारे आणि 'आचारातून विचाराचा प्रचार' करणारे महामानव म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके 'बाबा.' होय. बाबा आमटे. बाबांचे पूर्ण नाव 'मुरलीधर देविदास आमटे.' त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट गावामध्ये २६ डिसेंबर १९१४ रोजी एका श्रीमंत जहागीरदार कुटुंबात झाला. १९३४ मध्ये त्यांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १९३६ मध्ये कायद्याची एल. एल. बी. परीक्षा उत्तीर्ण झाले. लगेच मध्यप्रदेशातील दुर्ग येथे वकिली सुरू केली. १९४० मध्ये वडिलोपार्जित इस्टेट सांभाळण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे वकिली सुरू केली. त्याबरोबर महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या साथीने १९४२ साली सुरू झालेल्या 'छोडो भारत' चळवळीमध्ये सहभाग घेतला. त्यांनी एका विवाहित महिलेला इंग्रजी सैनिकांच्या तावडीतून सोडविले. महात्मा गांधीजींनी त्यांना 'अभय...