कडेलूट पुस्तक परीक्षण - दत्तात्रय मानुगडे
..... कडेलूट..।
.... पुस्तक परीक्षण...।
.. साहित्यिक क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळात पुष्कळ नवीन नवीन पुस्तके लेखकांचे साहित्य वाचाव्यास मिळते हे नाकारता येत नाही. आतापर्यंत बरीच काही पुस्तक परीक्षणे केली परंतु हे पुस्तक मात्र पूर्णपणे आगळे वेगळे असे आहे. आतापर्यंत काही लेखक ग्रामीण कथा लिहितात कादंबरी लिहितात परंतु साहित्यिक क्षेत्राच्या ठराविक चौकटीमध्ये त्यांचे साहित्य शब्दबद्ध केलेली असते. परंतु ही कादंबरी एक आगळावेगळा विषय घेऊन आली आहे. तो विषय आहे निसर्गाचे संतुलन, पर्यावरण यावर विशेष भर दिला आहे. डॉ. श्रीकांत पाटील यांनी एक या पुस्तकाला वेगळी दिशा देण्याचे कार्य अतिशय उत्कृष्टपणे केले आहे. या निसर्गामध्ये भरपूर झाडे लावावीत तरच पाऊस काळ भरपूर होणार आहे. झाडे लावा झाडे वाचवा असे फक्त सरकार म्हणते. परंतु प्रत्यक्षात निसर्गातील उभी असणारी हिरवीगार निसर्ग झाडी. आणि डोंगर पोखरून आज रोजी जमिनीची वाट लावण्याचे काम सध्या चालू आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. त्याच्यासाठी डॉ. श्रीकांत पाटील लिखित,, कडेलूट,, ही कादंबरी सरकारने एकदा वाचून काढावी म्हणजे निसर्ग आमचा काय आहे हे समजल्याशिवाय राहणार नाही. या कादंबरीमध्ये प्रवचनकारानं निसर्ग बद्दल झाडाझुडपाबद्दल, प्राणी पक्षाबद्दल आणि माणसाच्या वृत्ती प्रवृत्ती बद्दल सांगितलेले सार लेखकाला आठवायला लागतात. यांत्रिकीकरण आधुनिकीकरणाच्या नावाखाली. राजरोसपणे सुरू असणारी कडेलुट लेखकाच्या अवस्थेत भर पडत गेली. अशी ही ग्रामीण कादंबरी पुन्हा पुन्हा वाचावी असे वाटते. हा उघडा समाज आहे यात समाजाबरोबर निसर्ग फिरत आहे. समाज फिरतो पण निसर्ग एका जाग्याला सारे पाहत असतो. निसर्गाची दिवसेंदिवस हानी होत आहे हे फक्त सर्वजण पाहतात. भले भले डोंगर फोडून रस्ता करतात इमारती बांधतात हे सारे चित्र कशासाठी त्याला कोण वाली आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. निसर्गाचे संतुलन राखायचे असेल तर निसर्गावर कधी अन्याय करू नये हा विषय लेखकाने उत्कृष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. साहित्य क्षेत्रामध्ये हा नवीन विषय आहे या विषयाचे स्वागत निश्चित होणार आहे यातील मात्र शंका नाही. दिवसांनी दिवस माणसे वाढत आहे जागा वाढत नाही जागा तेवढीच आहे जागा कमी पडायला लागली म्हणून डोंगर पोखरून वसाहती उभारणे हे कोणत्या विषयाला धरून आहे असा प्रश्न निर्माण होतो. माणसा माणसावर अन्याय झाला तर अन्यायाविरुद्ध माणसे पेटून उठतात. पण निसर्गाने कुणावर पेटून उठायचे आपल्या भारत देशामध्ये सुंदर हवा आहे सुंदर निसर्ग आहे या निसर्गामध्ये न रमता निसर्गावर अन्याय करणे हे चुकीचे वाटत नाही का. कादंबरीतील पात्रे ग्रामीण असून त्यांचे संवाद कथा नका ला धरून असे लिहिले आहेत. डॉ. श्रीकांत पाटील यांनी लॉकडाऊन, ऊस कोंडी, पाणीफेरा या तीन कादंबरी नंतर एक वेगळा विषय घेऊन आलेली कादंबरी म्हणजे वाचकांसाठी ही चौथी कादंबरी होय. या कादंबरीला डॉ. रवींद्र शोभणे नागपूर यांची प्रस्तावना लाभली आहे कादंबरीचा विषय कसा आहे हे लेखकाने स्वतःच्या मनोगतामध्ये लिहिले आहे. निसर्ग हा मानवाचा गुरु आहे तो माणसांना जगवतो मुबलक प्रमाणात प्राणवायूची खैरात करतो. पाने फळे फुले या खेरीज मानवाला अन्नधान्य सुद्धा देतो असे सुद्धा लेखकाने स्वतःच्या मनोगतामध्ये लिहिले आहे. ही कादंबरी अतिशय सखोल विचार करून साकार केली आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. या कादंबरी च्या निमित्ताने लेखकाने ग्रामीण संवाद अतिशय चांगले लिहिले आहेत उदाहरणार्थ हे किती दिवस सुरू हाय खरं सांगा नाहीतर आम्ही गावात सरपंचांना, ग्रामसेवक आणि तलाठ्याला सांगणार तसा तायाप्पा चटपटला आणि माफी मागू लागला. अतिसुंदर ग्रामीण वारणा काठी बोलीभाषा पात्रांच्या तोंडून आलेली आहे. या कादंबरीतील पात्रे लेखकाने जिवंत अशी रेखाटली आहे यात वाद नाही. डॉ.श्रीकांत पाटील या कादंबरीच्या निमित्ताने एक नवीन विषय समाजापुढे ठेवला आहे. आणि वाचक या कादंबरीची निश्चितपणे कौतुक करतील अशी मला आशा वाटते. साहित्य क्षेत्रामध्ये उज्वल भविष्य डॉ. श्रीकांत पाटील निर्माण करतील व त्यांच्या हातून इथून पुढे नवीन नवीन विषय समाजापुढे पुस्तक रूपाने घेऊन येतील अशी सुद्धा मला अशा वाटते. डॉ.श्रीकांत पाटील यांच्या लेखन कार्यास मी शुभेच्छा देतो..।
,, कडेलूट,,
लेखक, डॉ. श्रीकांत पाटील
संस्कृती प्रकाशन
एकूण पष्टे,200
किंमत,300 रुपये.
दत्तात्रय पांडुरंग मानुगडे..।
Comments
Post a Comment