कडेलूट पुस्तक परीक्षण - दत्तात्रय मानुगडे

..... कडेलूट..।
.... पुस्तक परीक्षण...।
.. साहित्यिक क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळात पुष्कळ नवीन नवीन पुस्तके लेखकांचे साहित्य वाचाव्यास मिळते हे नाकारता येत नाही. आतापर्यंत बरीच काही पुस्तक परीक्षणे केली परंतु हे पुस्तक मात्र पूर्णपणे आगळे वेगळे असे आहे. आतापर्यंत काही लेखक ग्रामीण कथा लिहितात कादंबरी लिहितात परंतु साहित्यिक क्षेत्राच्या ठराविक चौकटीमध्ये त्यांचे साहित्य शब्दबद्ध केलेली असते. परंतु ही कादंबरी एक आगळावेगळा विषय घेऊन आली आहे. तो विषय आहे निसर्गाचे संतुलन, पर्यावरण यावर विशेष भर दिला आहे. डॉ. श्रीकांत पाटील यांनी एक या पुस्तकाला वेगळी दिशा देण्याचे कार्य अतिशय उत्कृष्टपणे केले आहे. या निसर्गामध्ये भरपूर झाडे लावावीत तरच पाऊस काळ भरपूर होणार आहे. झाडे लावा झाडे वाचवा असे फक्त सरकार म्हणते. परंतु प्रत्यक्षात निसर्गातील उभी असणारी हिरवीगार निसर्ग झाडी. आणि डोंगर पोखरून आज रोजी जमिनीची वाट लावण्याचे काम सध्या चालू आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. त्याच्यासाठी डॉ. श्रीकांत पाटील लिखित,, कडेलूट,, ही कादंबरी सरकारने एकदा वाचून काढावी म्हणजे निसर्ग आमचा काय आहे हे समजल्याशिवाय राहणार नाही. या कादंबरीमध्ये प्रवचनकारानं निसर्ग बद्दल झाडाझुडपाबद्दल, प्राणी पक्षाबद्दल आणि माणसाच्या वृत्ती प्रवृत्ती बद्दल सांगितलेले सार लेखकाला आठवायला लागतात. यांत्रिकीकरण आधुनिकीकरणाच्या नावाखाली. राजरोसपणे सुरू असणारी कडेलुट लेखकाच्या अवस्थेत भर पडत गेली. अशी ही ग्रामीण कादंबरी पुन्हा पुन्हा वाचावी असे वाटते. हा उघडा समाज आहे यात समाजाबरोबर निसर्ग फिरत आहे. समाज फिरतो पण निसर्ग एका जाग्याला सारे पाहत असतो. निसर्गाची दिवसेंदिवस हानी होत आहे हे फक्त सर्वजण पाहतात. भले भले डोंगर फोडून रस्ता करतात इमारती बांधतात हे सारे चित्र कशासाठी त्याला कोण वाली आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. निसर्गाचे संतुलन राखायचे असेल तर निसर्गावर कधी अन्याय करू नये हा विषय लेखकाने उत्कृष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. साहित्य क्षेत्रामध्ये हा नवीन विषय आहे या विषयाचे स्वागत निश्चित होणार आहे यातील मात्र शंका नाही. दिवसांनी दिवस माणसे वाढत आहे जागा वाढत नाही जागा तेवढीच आहे जागा कमी पडायला लागली म्हणून डोंगर पोखरून वसाहती उभारणे हे कोणत्या विषयाला धरून आहे असा प्रश्न निर्माण होतो. माणसा माणसावर अन्याय झाला तर अन्यायाविरुद्ध माणसे पेटून उठतात. पण निसर्गाने कुणावर पेटून उठायचे आपल्या भारत देशामध्ये सुंदर हवा आहे सुंदर निसर्ग आहे या निसर्गामध्ये न रमता निसर्गावर अन्याय करणे हे चुकीचे वाटत नाही का. कादंबरीतील पात्रे ग्रामीण असून त्यांचे संवाद कथा नका ला धरून असे लिहिले आहेत. डॉ. श्रीकांत पाटील यांनी लॉकडाऊन, ऊस कोंडी, पाणीफेरा या तीन कादंबरी नंतर एक वेगळा विषय घेऊन आलेली कादंबरी म्हणजे वाचकांसाठी ही चौथी कादंबरी होय. या कादंबरीला डॉ. रवींद्र शोभणे नागपूर यांची प्रस्तावना लाभली आहे कादंबरीचा विषय कसा आहे हे लेखकाने स्वतःच्या मनोगतामध्ये लिहिले आहे. निसर्ग हा मानवाचा गुरु आहे तो माणसांना जगवतो मुबलक प्रमाणात प्राणवायूची खैरात करतो. पाने फळे फुले या खेरीज मानवाला अन्नधान्य सुद्धा देतो असे सुद्धा लेखकाने स्वतःच्या मनोगतामध्ये लिहिले आहे. ही कादंबरी अतिशय सखोल विचार करून साकार केली आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. या कादंबरी च्या निमित्ताने लेखकाने ग्रामीण संवाद अतिशय चांगले लिहिले आहेत उदाहरणार्थ हे किती दिवस सुरू हाय खरं सांगा नाहीतर आम्ही गावात सरपंचांना, ग्रामसेवक आणि तलाठ्याला सांगणार तसा तायाप्पा चटपटला आणि माफी मागू लागला. अतिसुंदर ग्रामीण वारणा काठी बोलीभाषा पात्रांच्या तोंडून आलेली आहे.  या कादंबरीतील पात्रे लेखकाने जिवंत अशी रेखाटली आहे यात वाद नाही. डॉ.श्रीकांत पाटील या कादंबरीच्या निमित्ताने एक नवीन विषय समाजापुढे ठेवला आहे. आणि वाचक या कादंबरीची निश्चितपणे कौतुक करतील अशी मला आशा वाटते. साहित्य क्षेत्रामध्ये उज्वल भविष्य डॉ. श्रीकांत पाटील निर्माण करतील व त्यांच्या हातून इथून पुढे नवीन नवीन विषय समाजापुढे पुस्तक रूपाने घेऊन येतील अशी सुद्धा मला अशा वाटते. डॉ.श्रीकांत पाटील यांच्या लेखन कार्यास मी शुभेच्छा देतो..।
,, कडेलूट,,
लेखक, डॉ. श्रीकांत पाटील
संस्कृती प्रकाशन
एकूण पष्टे,200
किंमत,300 रुपये.
दत्तात्रय पांडुरंग मानुगडे..।

Comments

Popular posts from this blog

माझी मराठी माझी जबाबदारी

सारांश लेखन

'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' डॉ. श्रीकांत पाटील डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांची कोरोना महामारीचा विषय घेऊन प्राण्यांच्या सहलीचे काल्पनिक कथानक मांडून लिहिलेली 'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' ही कादंबरी त्यांच्या उत्तुंग भरारी मारणाऱ्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची साक्ष देणारी कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकातून लेखकाच्या अंगी असणारी सूक्ष्म दृष्टी दिसून येते. सामाजिक व चिंतनशील विषय घेतला आहे. माणसाने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःवर ओढवून घेतलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून घेतला आहे. मानवी जीवनातील चित्रण शिक्षक , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करून स्वानुभवाचा आनंद देणे. हाच आनंद रुपकाच्या माध्यमातून प्राणी जगतात देण्याचा लेखकाने केलेला प्रयत्न अतुलनीय असा आहे. लेखकाच्या मनातून अवतरलेला हा आहे. विचार आहे तो मुळात शाळा. हा विषय मानवी जीवनातील वैविध्यपूर्ण आहे. तो एक शिक्षकी शाळा , दोन शिक्षकी शाळा, आदिवासी शाळा, मुलांची शाळा, मुलींची शाळा, ग्रामीण शाळा, शहरी शाळा , रात्रशाळा, साक्षरता शाळा, आश्रमशाळा, रवींद्रनाथ टागोरांची निसर्गातील शाळा. पण या लेखकांच्या मनातून अवतरलेली शाळा ही वेगळीच आहे. मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका , शिपाई यांचा परिवार आलाच . पण ही शाळा प्राण्यांची शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक आहेत - सुजय हत्तीसर. शिक्षकांच्या मध्ये आहेत बाजीराव वानर, विश्वजीत वाघ तर शिक्षिकांच्यामध्ये नलिनी चित्ते, शोभा काळे बेटे या मॅडम. शाळेचा शिपाई म्हणजे गाढव. पण या साऱ्यांनी आपापली जबाबदारी पिण्याचं आणि नियोजन करण्याचं काम अतिशय सुंदरपणे स्वीकारलेले आहे . आणि पार पाडलेला आहे. ही कादंबरी वाचताना खरोखरच खऱ्या शाळेचा परिपाठच आपण पाहतोय असे वाटते. मुलांच्या मध्ये असणारे सर्वगुण आणि अवगुणही या शाळेमध्ये आहेत. खरं म्हणजे मुलांना शाळेत जाणं आवडत नाही. इतर उचापती करण्यात त्यांना रस असतो. तसेच या शाळेतील विद्यार्थीही म्हणजे वानरसेना खऱ्या जीवनातील मुलाप्रमाणेच आहेत. त्यांना शाळेपेक्षा बाहेर फिरणे आवडते. काही दिवस वानर विद्यार्थी शाळेत न आल्यामुळे त्यांचे प्राणी- शिक्षक चौकशी करतात. तेव्हा त्यात त्यांना समजून येते की, ही मुलं शाळा सोडून त्यांच्या पालकांबरोबरच शेजारच्या गावात गेलेली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर शेजारच्या गावात कोरोनामुळे बंदिस्तपणा आला होता. त्याचाच फायदा घेऊन ही वानरसेना मौज मजा करत होती. तीच गोष्ट त्याने आपल्या शाळेत सांगितली. इतर प्राण्यांना ती पटली नाही. त्याची खातरजमा करून आतील माणसाच्या जगातील जीवन पाहण्यासाठी या प्राणी शाळेची सहल काढण्याचे नियोजन केलं जातं . खरं म्हणजे माणसाच्या सहलीच्या नियोजनाची जसे कार्य चालते तसेच या प्राणी जीवनाच्या सहलीचे नियोजन केले होते. सहल केव्हा, कुठे, कशी न्यायची याचे नियोजन करण्यात आले होते. अगदी शिस्तबद्ध सहल पार पडलेली आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हे पुस्तक वाचलेच पाहिजे. हे पुस्तक वाचताना लेखकाची कल्पकता दिसून येते. प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणाची माहिती , संस्थापक अर्थात सिंह राजाची परवानगी घेणे. शासनाची परवानगी मिळवणे, सहलीला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, सोबत घ्यावयाच्या वस्तूंच्या सूचना देणे, सहलीत पाळावयाचे नियम, पालकांची परवानगी आणि इतरांना त्रास न होता सहलीचा मुक्तपणे आनंद घेणे या साऱ्या गोष्टींचा उल्लेख लेखकाने मार्मिकपणे केला आहे . मनुष्यप्राणी कोरोणाच्या भीतीने घरामध्ये कैद झाला. लॉकडाऊनचा फायदा प्राण्यांनी आपल्या सहलीचा आनंद घेण्यामध्ये लुटला. सहल म्हणजे फक्त फिरणे नव्हे, मौजमजा करणे नव्हे , तर सहलीचा खरा अनुभव घेणे तो म्हणजे तो मनोगतातून मांडणे , निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे. योग्य पारितोषिके देणे. घटनांची सूत्रबद्धपणे मांडणी करणे होय. मुलांना चित्रांची आवड असते हे लक्षात घेऊन या कादंबरीत प्राण्यांची चित्रे रेखाटलेली आहेत. त्यामुळे बाल वर्गाला मोहित करणारी अशीच कादंबरी झालेली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि रसिक वाचकांना करमणुकीच्या बरोबरच ज्ञानाचे अमृत पाजून डोळे उघडण्याचे कामही ही कादंबरी करते. ही कादंबरी इसापनीतीच्या कथांची आणि वि. स. खांडेकर यांच्या रूपक कथांची आठवण करून देणारी आहे असे मला वाटते. ही कादंबरी वाचताना शाळेतील प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहतात. स्वतः सहलीचा घटक बनून सवारी केल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हेच तर लेखकाचे खरे यश आहे असे म्हणता येईल. हृदय प्रकाशनप्रकाशनने प्रकाशित केलेली ही कादंबरी रंगीत चित्रांनी सजलेली आहे. कादंबरीचा संपूर्ण आशय असणारे देखणे मुखपृष्ठ चित्रकार श्रीरंग मोरे यांचे आहे. तर आतील चित्रे चंद्रकांत सोनवणे आणि बाळ पोतदार यांची आहेत. वाचक रसिक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील याची मला खात्री आहे. डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांना पुढील लेखन काेर्यासाठी हार्दिक शुभेच्छा. परशराम रामा आंबी वरणगे पाडळी