शिरीषकुमार कथा

बाळांनो, ही कथा आहे एका शूरवीर बालकाची. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीची. तो मुलगा तुमच्यापेक्षा थोडासा मोठा असेल. शाळेला जाणारा विद्यार्थी. आज शाळेला सुट्टी होती. तरीही तो लवकर उठून शाळेला निघाला होता. कारण  सर्व मुलांनी शाळेत जमा व्हायचं ठरवलं होतं. तो गडबडीने घराच्या बाहेर पडत होता. तोच त्याच्या कानावर आजीचे शब्द आले. "बाळ शिरीष, आज तू लाडू वळायला येत नाहीस?" त्यावर शिरीष म्हणाला, "ते कसे शक्य आहे? तूच सांग ना गं आजी. अगं सारा देश गुलामगिरीच्या खाईत लोळत असताना मी लाडू वळायला कसा येऊ? ते आता शक्य नाही. कारण सारी मुले माझी वाट बघत बसली असतील तिकडे शाळेत. आणि मी इकडे लाडू वळत बसू! नाही. नाही. नाही. एकदा नव्हे हजारदा सांगेन की मी लाडू वळायला बसणार नाही. आजीनं त्याला विचारले, "अरे बाळ, आज शाळेला सुट्टी आहे ना? "
मला शाळेत गेलंच पाहिजे कारण शाळेत प्रभात फेरी आयोजित केले आणि आम्ही सगळी मुलं या प्रभात फेरीमध्ये सामील होणार आहे. मी जर शाळेत गेलो नाही; तर सारी मित्र मला भित्रा म्हणून चिडवतील. आणि बरं का आजी, या माझ्या भारतभूमीला जुलमी इंग्रजांच्या तावडीतून कोण सोडवणार? म्हणून मी जात आहे. असं बोलू नकोस गं तू." शिरीष म्हणाला. 
"तुझ्यासारखी शेंबडी पोरं काय करणार आहेत? इंग्रजांचे पोलीस पिटाळून लावतील तुम्हाला." आजी म्हणाली. "अगं आजी, तुला बापूजी माहित नाहीत? बापूजी म्हणजे आपले गांधीबाबा बरं का?"
 "बोलो भारत माता की जय, वंदे मातरम" आजीने घोषणा दिल्या. वा! आजी वा! तूही माझ्या पाठीशी उभी आहेस. मग मला भीतीचं काहीही कारण नाही. पण आजी तुझ्याशी बोलत बसलो मी इथं. त्यामुळे मला उशीर झाला बघ. घड्याळात किती वाजले बघ तरी. येतो गं आजी. भारत माता की जय, वंदे मातरम अशी घोषणा देत तो घरातून बाहेर पडला. तो शाळेच्या मैदानावर कधी पोहोचला हे त्याला कळलेही नाही. तो मित्रांना म्हणाला, "हो हो माझ्या मित्रांनो, मला माफ करा. मला यायला थोडा उशीर झाला. आपली सर्व मित्रमंडळी आली ना! मग करू या सुरुवात प्रभातफेरीला. शाळेपासून प्रभात फेरीला सुरुवात केली. ग्रामपंचायत ऑफिससमोर मोर्चा आला. सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने हा मोर्चा पुढे चालला होता. 'बोलो भारत माता की जय', 'वंदे मातरम' अशा घोषणा देत देत मोर्चा पुढे चालला होता. पोलिसांनी मुलांना अडवले आणि म्हणाले, "मुलांनो, थांबा पुढे येऊ नका, आपापल्या घरी जा. नाहीतर तुम्हांवर गोळीबार करावा लागेल. पोलिसांनी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण मुलांनी काहीच ऐकले नाही. काही झालेतरी मागे हटायचे नाही असा निर्धार त्यांनी केला होता. पोलिसांनी लाठी हल्ला केला. तरीही कोणी मागे झाले नाही. गोळीबार केला तरी कोणी भ्याले नाहीत. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपला प्राण गेला तरी बेहत्तर या निश्चयाने ते लढत होते. मागे हटले नाहीत. मुले म्हणाली, "आम्हाला आमचा जीव प्यारा नाही. आम्ही लहान असलो म्हणून काय झाले? देशासाठी प्राण द्यायला मागे पाहणार नाही. आम्ही मागे हटणे आता शक्य नाही. आम्हाला मरण आले तरी मागे हटणार नाही. 'जिंकू किंवा मरू' हाच आमचा ध्यास आहे. आणि तुम्हाला गोळ्या घालायच्या असतील तर जरूर घाला. हा मोर्चा यशस्वी करून भारतमातेला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करूच. पोलिसांनी बेचूट गोळीबार केला. त्यातील एक गोळी शिरीषला लागली. तो खाली कोसळला पण हातातील तिरंगा ध्वज खाली पडू दिला नाही. तो घोषणा देत होता 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्'.

Comments

Popular posts from this blog

माझी मराठी माझी जबाबदारी

सारांश लेखन

'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' डॉ. श्रीकांत पाटील डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांची कोरोना महामारीचा विषय घेऊन प्राण्यांच्या सहलीचे काल्पनिक कथानक मांडून लिहिलेली 'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' ही कादंबरी त्यांच्या उत्तुंग भरारी मारणाऱ्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची साक्ष देणारी कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकातून लेखकाच्या अंगी असणारी सूक्ष्म दृष्टी दिसून येते. सामाजिक व चिंतनशील विषय घेतला आहे. माणसाने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःवर ओढवून घेतलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून घेतला आहे. मानवी जीवनातील चित्रण शिक्षक , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करून स्वानुभवाचा आनंद देणे. हाच आनंद रुपकाच्या माध्यमातून प्राणी जगतात देण्याचा लेखकाने केलेला प्रयत्न अतुलनीय असा आहे. लेखकाच्या मनातून अवतरलेला हा आहे. विचार आहे तो मुळात शाळा. हा विषय मानवी जीवनातील वैविध्यपूर्ण आहे. तो एक शिक्षकी शाळा , दोन शिक्षकी शाळा, आदिवासी शाळा, मुलांची शाळा, मुलींची शाळा, ग्रामीण शाळा, शहरी शाळा , रात्रशाळा, साक्षरता शाळा, आश्रमशाळा, रवींद्रनाथ टागोरांची निसर्गातील शाळा. पण या लेखकांच्या मनातून अवतरलेली शाळा ही वेगळीच आहे. मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका , शिपाई यांचा परिवार आलाच . पण ही शाळा प्राण्यांची शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक आहेत - सुजय हत्तीसर. शिक्षकांच्या मध्ये आहेत बाजीराव वानर, विश्वजीत वाघ तर शिक्षिकांच्यामध्ये नलिनी चित्ते, शोभा काळे बेटे या मॅडम. शाळेचा शिपाई म्हणजे गाढव. पण या साऱ्यांनी आपापली जबाबदारी पिण्याचं आणि नियोजन करण्याचं काम अतिशय सुंदरपणे स्वीकारलेले आहे . आणि पार पाडलेला आहे. ही कादंबरी वाचताना खरोखरच खऱ्या शाळेचा परिपाठच आपण पाहतोय असे वाटते. मुलांच्या मध्ये असणारे सर्वगुण आणि अवगुणही या शाळेमध्ये आहेत. खरं म्हणजे मुलांना शाळेत जाणं आवडत नाही. इतर उचापती करण्यात त्यांना रस असतो. तसेच या शाळेतील विद्यार्थीही म्हणजे वानरसेना खऱ्या जीवनातील मुलाप्रमाणेच आहेत. त्यांना शाळेपेक्षा बाहेर फिरणे आवडते. काही दिवस वानर विद्यार्थी शाळेत न आल्यामुळे त्यांचे प्राणी- शिक्षक चौकशी करतात. तेव्हा त्यात त्यांना समजून येते की, ही मुलं शाळा सोडून त्यांच्या पालकांबरोबरच शेजारच्या गावात गेलेली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर शेजारच्या गावात कोरोनामुळे बंदिस्तपणा आला होता. त्याचाच फायदा घेऊन ही वानरसेना मौज मजा करत होती. तीच गोष्ट त्याने आपल्या शाळेत सांगितली. इतर प्राण्यांना ती पटली नाही. त्याची खातरजमा करून आतील माणसाच्या जगातील जीवन पाहण्यासाठी या प्राणी शाळेची सहल काढण्याचे नियोजन केलं जातं . खरं म्हणजे माणसाच्या सहलीच्या नियोजनाची जसे कार्य चालते तसेच या प्राणी जीवनाच्या सहलीचे नियोजन केले होते. सहल केव्हा, कुठे, कशी न्यायची याचे नियोजन करण्यात आले होते. अगदी शिस्तबद्ध सहल पार पडलेली आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हे पुस्तक वाचलेच पाहिजे. हे पुस्तक वाचताना लेखकाची कल्पकता दिसून येते. प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणाची माहिती , संस्थापक अर्थात सिंह राजाची परवानगी घेणे. शासनाची परवानगी मिळवणे, सहलीला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, सोबत घ्यावयाच्या वस्तूंच्या सूचना देणे, सहलीत पाळावयाचे नियम, पालकांची परवानगी आणि इतरांना त्रास न होता सहलीचा मुक्तपणे आनंद घेणे या साऱ्या गोष्टींचा उल्लेख लेखकाने मार्मिकपणे केला आहे . मनुष्यप्राणी कोरोणाच्या भीतीने घरामध्ये कैद झाला. लॉकडाऊनचा फायदा प्राण्यांनी आपल्या सहलीचा आनंद घेण्यामध्ये लुटला. सहल म्हणजे फक्त फिरणे नव्हे, मौजमजा करणे नव्हे , तर सहलीचा खरा अनुभव घेणे तो म्हणजे तो मनोगतातून मांडणे , निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे. योग्य पारितोषिके देणे. घटनांची सूत्रबद्धपणे मांडणी करणे होय. मुलांना चित्रांची आवड असते हे लक्षात घेऊन या कादंबरीत प्राण्यांची चित्रे रेखाटलेली आहेत. त्यामुळे बाल वर्गाला मोहित करणारी अशीच कादंबरी झालेली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि रसिक वाचकांना करमणुकीच्या बरोबरच ज्ञानाचे अमृत पाजून डोळे उघडण्याचे कामही ही कादंबरी करते. ही कादंबरी इसापनीतीच्या कथांची आणि वि. स. खांडेकर यांच्या रूपक कथांची आठवण करून देणारी आहे असे मला वाटते. ही कादंबरी वाचताना शाळेतील प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहतात. स्वतः सहलीचा घटक बनून सवारी केल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हेच तर लेखकाचे खरे यश आहे असे म्हणता येईल. हृदय प्रकाशनप्रकाशनने प्रकाशित केलेली ही कादंबरी रंगीत चित्रांनी सजलेली आहे. कादंबरीचा संपूर्ण आशय असणारे देखणे मुखपृष्ठ चित्रकार श्रीरंग मोरे यांचे आहे. तर आतील चित्रे चंद्रकांत सोनवणे आणि बाळ पोतदार यांची आहेत. वाचक रसिक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील याची मला खात्री आहे. डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांना पुढील लेखन काेर्यासाठी हार्दिक शुभेच्छा. परशराम रामा आंबी वरणगे पाडळी