शिरीषकुमार कथा
बाळांनो, ही कथा आहे एका शूरवीर बालकाची. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीची. तो मुलगा तुमच्यापेक्षा थोडासा मोठा असेल. शाळेला जाणारा विद्यार्थी. आज शाळेला सुट्टी होती. तरीही तो लवकर उठून शाळेला निघाला होता. कारण सर्व मुलांनी शाळेत जमा व्हायचं ठरवलं होतं. तो गडबडीने घराच्या बाहेर पडत होता. तोच त्याच्या कानावर आजीचे शब्द आले. "बाळ शिरीष, आज तू लाडू वळायला येत नाहीस?" त्यावर शिरीष म्हणाला, "ते कसे शक्य आहे? तूच सांग ना गं आजी. अगं सारा देश गुलामगिरीच्या खाईत लोळत असताना मी लाडू वळायला कसा येऊ? ते आता शक्य नाही. कारण सारी मुले माझी वाट बघत बसली असतील तिकडे शाळेत. आणि मी इकडे लाडू वळत बसू! नाही. नाही. नाही. एकदा नव्हे हजारदा सांगेन की मी लाडू वळायला बसणार नाही. आजीनं त्याला विचारले, "अरे बाळ, आज शाळेला सुट्टी आहे ना? "
मला शाळेत गेलंच पाहिजे कारण शाळेत प्रभात फेरी आयोजित केले आणि आम्ही सगळी मुलं या प्रभात फेरीमध्ये सामील होणार आहे. मी जर शाळेत गेलो नाही; तर सारी मित्र मला भित्रा म्हणून चिडवतील. आणि बरं का आजी, या माझ्या भारतभूमीला जुलमी इंग्रजांच्या तावडीतून कोण सोडवणार? म्हणून मी जात आहे. असं बोलू नकोस गं तू." शिरीष म्हणाला.
"तुझ्यासारखी शेंबडी पोरं काय करणार आहेत? इंग्रजांचे पोलीस पिटाळून लावतील तुम्हाला." आजी म्हणाली. "अगं आजी, तुला बापूजी माहित नाहीत? बापूजी म्हणजे आपले गांधीबाबा बरं का?"
"बोलो भारत माता की जय, वंदे मातरम" आजीने घोषणा दिल्या. वा! आजी वा! तूही माझ्या पाठीशी उभी आहेस. मग मला भीतीचं काहीही कारण नाही. पण आजी तुझ्याशी बोलत बसलो मी इथं. त्यामुळे मला उशीर झाला बघ. घड्याळात किती वाजले बघ तरी. येतो गं आजी. भारत माता की जय, वंदे मातरम अशी घोषणा देत तो घरातून बाहेर पडला. तो शाळेच्या मैदानावर कधी पोहोचला हे त्याला कळलेही नाही. तो मित्रांना म्हणाला, "हो हो माझ्या मित्रांनो, मला माफ करा. मला यायला थोडा उशीर झाला. आपली सर्व मित्रमंडळी आली ना! मग करू या सुरुवात प्रभातफेरीला. शाळेपासून प्रभात फेरीला सुरुवात केली. ग्रामपंचायत ऑफिससमोर मोर्चा आला. सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने हा मोर्चा पुढे चालला होता. 'बोलो भारत माता की जय', 'वंदे मातरम' अशा घोषणा देत देत मोर्चा पुढे चालला होता. पोलिसांनी मुलांना अडवले आणि म्हणाले, "मुलांनो, थांबा पुढे येऊ नका, आपापल्या घरी जा. नाहीतर तुम्हांवर गोळीबार करावा लागेल. पोलिसांनी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण मुलांनी काहीच ऐकले नाही. काही झालेतरी मागे हटायचे नाही असा निर्धार त्यांनी केला होता. पोलिसांनी लाठी हल्ला केला. तरीही कोणी मागे झाले नाही. गोळीबार केला तरी कोणी भ्याले नाहीत. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपला प्राण गेला तरी बेहत्तर या निश्चयाने ते लढत होते. मागे हटले नाहीत. मुले म्हणाली, "आम्हाला आमचा जीव प्यारा नाही. आम्ही लहान असलो म्हणून काय झाले? देशासाठी प्राण द्यायला मागे पाहणार नाही. आम्ही मागे हटणे आता शक्य नाही. आम्हाला मरण आले तरी मागे हटणार नाही. 'जिंकू किंवा मरू' हाच आमचा ध्यास आहे. आणि तुम्हाला गोळ्या घालायच्या असतील तर जरूर घाला. हा मोर्चा यशस्वी करून भारतमातेला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करूच. पोलिसांनी बेचूट गोळीबार केला. त्यातील एक गोळी शिरीषला लागली. तो खाली कोसळला पण हातातील तिरंगा ध्वज खाली पडू दिला नाही. तो घोषणा देत होता 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्'.
Comments
Post a Comment