Posts

अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती व्याख्यान

समाज चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अण्णाभाऊ साठे यांची मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे समाज सुधारक लोककवी लेखक कादंबरीकार नाटककार म्हणून परिचित दलित साहित्याचे संस्थापक म्हणून ओळखले जातात संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे ते अग्रणी होते खरेदर ते दीड दिवस शाळेत गेले होते पण अनुभवांची शाळा त्यांची फार मोठी होती कृष्णाकडच्या कथा गजाड नवती निखारा जिवंत काढतोस फरारी बरबाद या कंजारी रानबोका इत्या दि कथासंग्रह प्रसिद्ध फकीरा गुलाम चंदन चिखलातील कमळ पाझर मथुरा माकडीचा माळ वारणेचा वाघ रानगंगा वैजंयता 

प्रस्तावना - वास्तव कथासंग्रह - फातिमा मुल्ला

*प्रस्तावना* *समाजातील सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक परिस्थितीवर आणि दांभिकपणावर ओढलेले आसूड म्हणजे वास्तव कथासंग्रह*            आज आपण एकविसाव्या शतकात वावरत असताना आपल्यासमोर अनेक समस्या आहेत. आपले जीवन जगताना आयुष्यामध्ये चाललेली आपली कुतरओढ पाहायला मिळते. आज माणसाचं जीवन व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, ऑडिओ कथांचा खजाना यांनी व्यापून टाकलेलं आहे. जन्माला आलेल्या लहान बाळापासून ते वृद्ध आजी-आजोबापर्यंत सर्वजण मोबाईल फोनच्या माध्यमाकडे आकृष्ट होत आहेत. मोबाईल हे माणसाचं मनोरंजनाचं साधन न राहता ते आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. स्पष्ट शब्दांत सांगायचे झाले तर आपल्यासमोर ज्ञानाचा विस्फोट झाला आहे; पण त्यातून आपणाला नेमके तेवढे ज्ञान निवडून घेता आले पाहिजे. आपल्यासमोर सर्व प्रकारचा मोहजाल पसरलेला  दिसून येतो. तरीही  आपणाला पुस्तक रूपात मिळालेला खजिना वाचताना निश्चितच आनंद होत असतो. प्रसार माध्यमांच्या या कालखंडात आजही अनेक पुस्तकांची निर्मिती होत आहे. कथा, कविता, नाटक, एकांकिका, संकीर्ण स्वरूपात वाचनासाठी खूप मोठा खजिना आपल्या हाती मिळत आहे. प्र...

भुईपाश कादंबरी - अशोक कोकाटे - पुस्तक परीक्षण

        'कुणी घर देता का घर, कुणी घर देता का घर'  हे वाक्य नटसम्राट नाटकातील असले तरी याची आठवण झाली. कारण म्हणजे माझे मित्र आणि ग्रामीण कथाकथनकार श्री. अशोक कोकाटे यांनी लिहिलेली *भुईपाश* नावाची कादंबरी नुकतीच माझ्या वाचनात आली. त्यांनी लिहिलेल्या या कादंबरीचा परामर्श घेताना नटसम्राट नाटकातील ही वाक्ये सहज माझ्या ओठावरती आलीत. कारण धरण की मरण, जगणं की मरण, माणूस की माणुसकी, कष्ट की नष्ट, दुःखग्रस्त की धरणग्रस्त अशा अनेक विषयांना स्पर्श करणारी श्री. अशोक कोकाटे यांची नवीन कादंबरी म्हणजे भुईपाश. या कादंबरीचा विषय खूप बोलका आहे. वाचकांनी ही कादंबरी वाचलीच पाहिजे. कारण वास्तववादी कथानक हे या कादंबरीचे मूल स्त्रोत आहे. कारण लेखक आणि त्याच्या कुटुंबाने भोगलेला धरणग्रस्तांचा वणवा त्यांनी या कादंबरीत मांडलेला आहे. वारणाकाठची बोली, निवडक व मोजकेच प्रसंग, संकट काळात दाखवलेली माणुसकी आणि उरावर दगड ठेवून गावठाणातून पुनर्वसनाच्या ठिकाणी जाताना त्या लोकांची झालेली दयनीय अवस्था या कादंबरीत लेखक श्री. अशोक कोकाटे यांनी अतिशय उत्तम रीतीने लिहिले आहे. म्हणजे त्यांनी भोगलेला संघर...

नो मॅन्स लॅंड एकांकिका - सौ. नसीम जमादार

परवा एका लग्न समारंभासाठी जाण्याचा योग आला. त्या ठिकाणी हळदीचा भरगच्च कार्यक्रम पाहताना मनाला खूप अस्वस्थ वाटत होतं. पाण्याचा होणारा अपव्यय, वेळेचा होणारा अपव्यय आणि असंस्कृतीचे दर्शन घडवणारा नाच पाहून खूप वाईट वाटत होतं. ही परिस्थिती साधारण: सर्वत्र आढळते. काही अपवाद वगळता. मानव कुठे चालला आहे असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. कारण आज अनेक समस्या असताना, मनुष्य बाटलीबंद पाणी पीत असताना ही पाण्याची चाललेली उधळपट्टी पाहून क्षणभर मी स्तब्ध झालो......          आणि मला मराठी बालकुमार साहित्य सभेच्या कार्याध्यक्षा सौ. नसीम जमादार यांनी लिहिलेल्या *नो मॅन्स लॅंड* या एकांकिका संग्रहाची आठवण झाली. खरंच आज पर्यावरणाची वाट बिकट होत चाललेली आहे. कोरोना हा शाप की वरदान हा संशोधनाचा विषय आहे. कारण यामध्ये मानवाची प्रचंड हानी झाली पण मानव सोडून इतर प्राण्यांसाठी खूप चांगल्या गोष्टी झाल्या. समुद्रकिनारी अनेक जलचरांचं मुक्त वावरणं झालेलं होतं. यामुळे मानवाला नसेना पण इतर प्राण्यांना कोरोनाचा कालावधी हा वरदानच वाटत होता असे माझे वैयक्तिक मत आहे.         ...

या मुलांनो

स्वस्थ बसेल तोचि फसेल  येईल तो नक्की हसेल  साहित्याची पाहण्या दुनिया  लवकर भरभर सारे या कथा, कादंबरी आणि कविता मनोरंजनातून ज्ञान घेऊ आता सारस्वतांना भेटण्या तुम्ही या लवकर भरभर सारे या  मुलांनो तुम्ही आम्ही मजा करूया मजा  आम्हा तुम्हाला मिळेल हसण्याची ती सजा  हसण्याची ती सजा

शाळेत जायचंय

धावत जाऊन मला  माझ्या बाकावर बसायचंय रोज सकाळी खड्या  आवाजात राष्ट्रगीत म्हणायचंय  नव्या वहीचा वास घेत  पहिल्या पानावर नाव लिहायचंय  भिंतीवर खडूनं रेघा मारून  खोडरबर आणि पाटीनं खेळायचंय  पाऊस पडून उद्या  मला चिखलात खेळायचंय  सुट्टी मिळेल का?  या विचारात रात्री झोपायचंय  गप्पा मारत मित्रांशी  खूप खूप बोलायचंय  घंटा होताच मला  आठवणीसह घरी परतायचे

भाग्यवान

भाग्यवान  अनेक जण म्हणतात  आपल्या पत्नीला भाग्यवान  प्रश्न पडतो मलाच  की कोण भाग्यवान?  तू माझी आहेस भाग्यवान  की मीच तुझ्यामुळे भाग्यवान  फुलतात अनेक प्रेमाच्या कविता  प्रेमी युगुलांनी गाणी गाता  तूच माझी भाग्यविधाता  खरंच तूच माझी सविता