*देणाऱ्याने देत जावे......* ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांनी एक छानशी कविता लिहिली आहे. ती म्हणजे 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे| घेता घेता एक दिवस, देणार्याचे हात घ्यावेत||' ही कविता मला आठवण्याचं कारणही तसंच आहे. रांजणवाडी नावाचं छोटेसं गाव होतं. त्या गावात राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्था सुरू केलेली होती. गावातील लोकांना सावकारीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी या पतसंस्थेची स्थापना झाली होती. या संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्याचे ठरविण्यात आलेले होते. यानिमित्ताने होतकरू विद्यार्थी, प्रामाणिकपणे कर्जफेड करणारे सभासद आणि या संस्थेमुळे ज्यांचे जीवन घडले, फुलले अशा थोर व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बगळेसाहेबांना आमंत्रित केले होते. तर अध्यक्ष म्हणून गावातीलच ज्येष्ठ नागरिक कावळेदादांची निव...
'भाकरचोर' कथासंग्रह मनोगत....... मनुष्य हा गोष्टी वेल्हाळ प्राणी आहे. प्रत्येक व्यक्तीला गोष्टी ऐकायला, वाचायला खूप आवडतात. अगदी प्राचीन काळापासून कथांचा उगम झालेला आपणास पहावयास मिळतो. अगदी सुरुवातीच्या काळात पद्य हा वाड़मय प्रकार होता. या पद्यामध्येही कथाबीज होते. गद्य स्वरूपातील साहित्य प्रकार महानुभाव पंथ काळापासून अस्तित्वात असलेला आपणास पहावयास मिळतो. तो चक्रधर स्वामींच्या आठवणींच्या लीळाचरित्राच्या स्वरूपात होता. प्राचीन कथा, मध्ययुगीन कथा, लघुकथा पूर्वकथा, लघुकथा, नवकथा असा कथांचा प्रवास झालेला आपणांस पाहायला मिळतो. पूर्वीच्या कथा मौखिक पद्धतीच्या होत्या. परंतु इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी मुद्रण कला भारतात आणली. ह. ना. आपटे यांनी लघुकथेचा पाया घातला असे मानले जाते. त्यानंतर दिवाकर कृष्णांनी मराठी कथेला नवे वळण दिले आहे. ना.सी.फडके वि. स. खांडेकर यांनी कथेला उच्च शिखरावर नेले आहे. य.गो.जोशी, श्री. म. माटे, चिं. वि. जोशी यांनी कथेची भाषाशैली, तंत्र, अनुभव, दृष्टीकोन याबाबत बदल करत आपली वेगळी कथा निर्मिती केलेली दिसून येते. ...
Comments
Post a Comment