*देणाऱ्याने देत जावे......* ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांनी एक छानशी कविता लिहिली आहे. ती म्हणजे 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे| घेता घेता एक दिवस, देणार्याचे हात घ्यावेत||' ही कविता मला आठवण्याचं कारणही तसंच आहे. रांजणवाडी नावाचं छोटेसं गाव होतं. त्या गावात राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्था सुरू केलेली होती. गावातील लोकांना सावकारीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी या पतसंस्थेची स्थापना झाली होती. या संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्याचे ठरविण्यात आलेले होते. यानिमित्ताने होतकरू विद्यार्थी, प्रामाणिकपणे कर्जफेड करणारे सभासद आणि या संस्थेमुळे ज्यांचे जीवन घडले, फुलले अशा थोर व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बगळेसाहेबांना आमंत्रित केले होते. तर अध्यक्ष म्हणून गावातीलच ज्येष्ठ नागरिक कावळेदादांची निव...
१२. *चूक एकदाच होते* सूर्योदय झाला. सखूच्या आनंदाला पारावर उरला नाही. कारण त्या दिवशी पौर्णिमा होती. तीही वटपोर्णिमा. सकाळपासून ती लगबगीने वावरत होती. एक वेगळाच उत्साह तिच्या चेहर्यावर झळकत होता. कामाच्या घाईत सूर्य केव्हा डोईवर आला हे तिला कळलंच नाही. शेजारच्या बायका वडाची पूजा करायला निघाल्या होत्या. सखूचं काम संपता संपेना. भांडीकुंडी, कपडे धुणे, जेवण करणे इत्यादी अशी एक भंकी दोन कामं! त्यात पौर्णिमा म्हटले की पोळ्या कराव्या बंद बळलागल्या. नवरा काहीतरी काम करायचा; पण आज त्याला सुट्टी नसल्यामुळे तो घरी नव्हता. त्याचं नाव सर्जेराव. बँकेत कर्मचारी म्हणून काम करीत होता. सखूचं मन समुद्राच्या लाटांवर हेलकावणारी सारखंच हेलकावत होतं. गल्लीतल्या सगळ्या बायका वडाची पूजा करून परत आल्या. 'माझं मलाच कळंना झालंया की पूजा करायला जावं की जाऊ नये. जायचं ठरवलं तर काम काही संपना. काम बाजूला ठेवून जायचं तर मन तयार ह...
Comments
Post a Comment