Posts

Showing posts from May, 2022

मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर लेखन कार्यशाळा न्यू हायस्कूल बुधवार पेठ पन्हाळा

बुधवार दि. २५ मे २०२२ व गुरूवार दि. २६ मे २०२२ रोजी न्यू हायस्कूल बुधवार पेठ, पन्हाळा येथे लेखन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे संयोजन न्यू हायस्कूल बुधवार पेठेच्या    मुख्याध्यापिका सौ. पोवार मॅडम आणि म. बा. कु. साहित्य सभेच्या कार्याध्यक्षा सौ. नसीम जमादार मॅडम यांनी केले होते.              बुधवार दि. २५ मे, २०२२ रोजी पहिल्या सत्रात मराठी बालकुमार साहित्य सभेचे सचिव श्री. परशराम आंबी यांनी नाट्यछटा लेखन कसे करावे हे त्यांनी आपल्या नाट्यछटा सादर करून त्याद्वारे प्रतिपादन केले.           पूर्वीच्या काळापासून माणसाच्या जीवनात मनोरंजन करणे याला खूप महत्त्व होते. यातूनच कथा, काव्य, नाट्य असे विविध प्रकार जन्मास आले. यातील *नाट्य* हा प्रकार मनोरंजनासाठी उत्तम प्रकार समजला जातो. नाट्य प्रकारामध्ये नाटक, पथनाट्य, एकांकिका, एकपात्री, स्वगत आणि नाट्यछटा असे विविध प्रकार दिसून येतात. नाट्यछटा हा वेगळा साहित्यप्रकार आहे. तो नाटकाचा अंश किंवा भाग नव्हे. नाट्यछटा हा इतर प्रकारापेक्षा खूपच वेगळा प्रकार आहे. नाटकात अनेक ...

राजाराम तावडे पुस्तक अभिप्राय

श्री परशुराम आंबी सर यांनी लिहिलेला 'भाकरचोर' हा कथासंग्रह तीन ते चार वाचन वेळांमध्ये वाचायचा असे ठरवून वाचायला सुरुवात केली. जसजशा कथा वाचत जात होतो, तसतशी गोडी आणि उत्कंठा वाढत होती. प्रत्येक कथा वाचनीय तर आहेच पण कथांचा ग्रामीण बाज आणि खुमासदार साज यामुळे ती एक पर्वणी वाटली आणि एकाच वाचनवेळेत हा कथासंग्रह वाचून संपवला. आपल्या अवतीभवती घडलेल्या, आपण अनुभवलेल्या प्रसंगातून लेखक लिहीत जातो पण त्या विषयांची मांडणी आणि प्रकटीकरण वाचकांच्यासमोर उभं करण्यालाही खूप मोठं कसब लागतं. याच ताकतीने हा कथासंग्रह लिहिण्यात लेखक यशस्वी झालेले आहेत हे निर्विवाद सिध्द होते. पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून ते मुद्रणापर्यंतची थाटनी आकर्षक आहे. सरांच्या लेखणीला सलाम व पुढील लेखन कार्यास शुभेच्छा.       राजाराम तावडे, शिरोली पुलाची.

नाट्यछटा *'हाच विजय'*

'हाच विजय!'          ए आई, मला बाहेर जाऊ दे ना!  असं सारखं सारखं का गं अडवत असतेस मला. ...... काय म्हणतेस? कोण आलेय? कोरोना! तो आणि कुठून आला आहे ग? आणि म्हणून जगातली सगळी माणसं अशी कोंडून घेऊन बसल्यात होय. पण  कोरोना म्हणजे काय गं? .....तो व्हायरस आहे? अगं व्हायरस म्हणजे काय ग? हं. आता समजलं बघ. व्हायरस म्हणजे विषाणू या विषाणूमुळेच आपण आजारी पडतो ना? जसा बर्फाचा गोळा खाल्ला की सर्दी होते, घाणीत जाऊन खेळलो की ताप येतो. मग आपल्याला डॉक्टर मामाकडे जावं लागतं आणि इंजेक्शन टोचून घ्यावं लागतं......काय म्हणतेस? आजारी पाडणारे विषाणू आहेत तसेच उपयोगी पडणारेही विषाणू आहेत. ते कोणते? हो. बरोबर. दुधाचे दही बनवणारे आहेत ते उपयोगी विषाणू. अहो हे सर्व आमच्या विज्ञानाच्या सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे नाण्याच्या जशा दोन बाजू आहेत - एक छापा आणि दुसरा काटा. त्याप्रमाणेच उपयोगी विषाणू आणि निरुपयोगी विषाणू असे विषाणूंचेही दोन प्रकार आहेत..... म्हणतेस ताई? हा कोरोनाचा विषाणू फारच भयंकर आहे? याच्यावर अजून लसही उपलब्ध झालेली नाही. हा विषाणू मरत नाही असं विचारतेस? हो...

ई बातमी 'भाकरचोर'

*अस्सल ग्रामीण बोलीचा बाज असणारा कथासंग्रह म्हणजे भाकरचोर*   *http://newsprabhat.in/?p=60052*        *👆🏻👆🏻क्लिक करें👆🏻👆🏻* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬          ✒️🎤📰🎥🎬🎤✒️                             🔥 *www.newsprabhat.in* 🔥    *न्यूज प्रभात डिजिटल न्यूज नेटवर्क*         🌴🌳🌱 😷🌱🌳🌴

परीक्षण 'भाकरचोर' - प्रसाद जाधवसर

*'अस्सल ग्रामीण बोलीचा बाज असणारा कथासंग्रह म्हणजे भाकरचोर'*  मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरचे सचिव आणि श्री नवनाथ हायस्कूल पोहाळे येथील मराठी विषय शिक्षक परशराम आंबी यांनी लिहिलेल्या 'भाकरचोर' हा कथासंग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. ग्रामीण बोली भाषेतील, उत्तम व दर्जेदार कथांची मेजवानी असलेला हा कथासंग्रह आहे. आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनातील अनेक प्रसंगाचे, माणसांच्या स्वार्थी, संधीसाधू आणि मतलबीपणावर मार्मिकपणे भाष्य करणारा हा कथा संग्रह आहे. या कथासंग्रहामधील पात्रांचे संवाद, घटना व प्रसंग यांचे हुबेहूब चित्रण कथाकारांने कथासंग्रहात केलेले आहे. 'भाकरचोर' कथासंग्रहाविषयी मला काहीतरी लिहावे असे मनापासून वाटले.                       या कथासंग्रहातील पहिलीच कथा आहे - 'वाट ही पुनवेची.' या कथेतून मानवी जीवनामध्ये आशेचा किरण नेहमी तरळत असतो. या विषयावर आधारित लेखकाने केलेलं भाष्य मनाला खूपच भावतं. संवेदनशील भावभावनांचा उलगडा या कथेमधून दिसून येतो. सुरुवातीपासूनच ही कथा मनाची पकड घेते. आशा पल्लवित होत जाते. नर...

'भाकरचोर' परीक्षण- श्री. धनाजी माळीसर

श्री. नवनाथ हायस्कूल पोहाळे शाळेचे शिक्षक.... वाचन-चळवळ वृद्धिंगत व्हावी व मुलांच्या जडणघडणीसाठी शाळेत पुस्तक वाचन, वक्तृत्व, कथाकथन, एकांकिका अशा विविध स्पर्धा आयोजित करणारे आमचे मार्गदर्शक, बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरचे सचिव व वारणा साहित्य परिषदेचे सदस्य आदरणीय परशराम आंबी सर यांचे 'भाकरचोर' हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. लेखक परशराम आंबी सरांच्या 'भाकरचोर' या पुस्तकात एकूण सोळा कथा असून प्रत्येक कथेतून कोणती ना कोणती तरी शिकवण मिळतेच. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांना लेखकाने कथेचे रूप दिले आहे. कथेतील भाषा सोपी, ओघवती आहे. योग्य ठिकाणी संवाद आलेले आहेत. म्हणींचा वापर अगदी योग्य आणि चपखलपणे केलेला आहे. लग्न जमवताना किती अडचणी येत असतात, हे आपण कधी ना कधी अनुभवलेले असतेच. अन् मुलीचे लग्न जमवताना तर तिच्या आई-बाबांना किती चिंता सतावत असतात, याची कल्पनाच केलेली बरी. 'वाट ही पुनवेची' या कथेत आपल्या उपवर मुलीबद्दल आईला वाटणारी हुरहूर, लग्न जमणार अशी थोडीफार वाटणारी आशा आणि अपेक्षाभंग यांचं सुंदर चित्रण वाचायला मिळतं. सत्त्वपरीक्षा ही एक सुंदर सुखांतिका असणारी कथा ...