मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर लेखन कार्यशाळा न्यू हायस्कूल बुधवार पेठ पन्हाळा
बुधवार दि. २५ मे २०२२ व गुरूवार दि. २६ मे २०२२ रोजी न्यू हायस्कूल बुधवार पेठ, पन्हाळा येथे लेखन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे संयोजन न्यू हायस्कूल बुधवार पेठेच्या
मुख्याध्यापिका सौ. पोवार मॅडम आणि म. बा. कु. साहित्य सभेच्या कार्याध्यक्षा सौ. नसीम जमादार मॅडम यांनी केले होते.
बुधवार दि. २५ मे, २०२२ रोजी पहिल्या सत्रात मराठी बालकुमार साहित्य सभेचे सचिव श्री. परशराम आंबी यांनी नाट्यछटा लेखन कसे करावे हे त्यांनी आपल्या नाट्यछटा सादर करून त्याद्वारे प्रतिपादन केले.
पूर्वीच्या काळापासून माणसाच्या जीवनात मनोरंजन करणे याला खूप महत्त्व होते. यातूनच कथा, काव्य, नाट्य असे विविध प्रकार जन्मास आले. यातील *नाट्य* हा प्रकार मनोरंजनासाठी उत्तम प्रकार समजला जातो. नाट्य प्रकारामध्ये नाटक, पथनाट्य, एकांकिका, एकपात्री, स्वगत आणि नाट्यछटा असे विविध प्रकार दिसून येतात. नाट्यछटा हा वेगळा साहित्यप्रकार आहे. तो नाटकाचा अंश किंवा भाग नव्हे. नाट्यछटा हा इतर प्रकारापेक्षा खूपच वेगळा प्रकार आहे. नाटकात अनेक पात्रे एकमेकाशी संवाद साधत असतात. एकपात्री प्रयोगात एकच व्यक्ती अनेक पात्रांचे संवाद बोलत असेल, तर त्यास एकपात्री म्हणतात. हा प्रकार डॉ. लक्ष्मणराव देशपांडे यांनी 'वऱ्हाड निघालंय लंडनला' जगभर पोहोचवला. जर एक व्यक्ती लांबलचक संवाद स्वत:शीच बोलत असते तेव्हा त्यास स्वगत असे म्हणतात. एखादी व्यक्ती स्वतः विषयीच बोलत असते तेव्हा त्यास मनोगत असे म्हणतात. परंतु नाट्यछटेमध्ये सादरीकरण करणारी व्यक्ती एकच असली तरी त्याच्या अवतीभोवती इतर व्यक्ती वावरत असतात असा आभास निर्माण केला जातो. इतर पात्रे बोलत असतात, पण त्यांचे बोलणे प्रत्यक्ष घ्यावयाचे नाही. ते फक्त गृहीत धरून सादरीकरण केले जाते. म्हणजेच नाट्यछोटेमध्ये बोलणाऱ्याचे बोलणे तेवढेच दाखवावयाची असते. हे ज्याला जमते तोच चांगल्या नाट्यछटा लिहू शकतो. कारण हेच खरे कौशल्य आहे. असे विचार परशराम आंबी यांनी व्यक्त केले. विविध नाट्यछटा आणि लेखकांची माहिती त्यांनी दिली. नाट्यछटा हा वाड्.मय प्रकार मराठी भाषेत दिवाकर म्हणजेच शंकर काशिनाथ गर्गे यांनी रूढ केला. १९११ ते १९३१ या २१ वर्षात त्यांनी ५१ नाट्यछटा लिहिल्या.
नाट्यछटा लेखन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, नाट्यछटेची वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि उत्तम नाट्यछटा लेखन कसे करावे हे सांगताना त्यांनी 'आमच्या वेळेला असलं काही नव्हतं' 'पाणी' या नाट्यछटा सादर केल्या. तसेच काही प्रसंग, घटना सांगून विद्यार्थ्याकडून नाट्यछटा लेखनाचे प्रात्यक्षिक करून घेतले.
दुसऱ्या सत्रातमराठी बालकुमार साहित्य सभेचे सचिव श्री. परशराम आंबी यांनी नाट्यछटा लेखन कसे करावे हे त्यांनी आपल्या नाट्यछटा सादर करून त्याद्वारे प्रतिपादन केले.
Comments
Post a Comment