मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर लेखन कार्यशाळा न्यू हायस्कूल बुधवार पेठ पन्हाळा




बुधवार दि. २५ मे २०२२ व गुरूवार दि. २६ मे २०२२ रोजी न्यू हायस्कूल बुधवार पेठ, पन्हाळा येथे लेखन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे संयोजन न्यू हायस्कूल बुधवार पेठेच्या
   मुख्याध्यापिका सौ. पोवार मॅडम आणि म. बा. कु. साहित्य सभेच्या कार्याध्यक्षा सौ. नसीम जमादार मॅडम यांनी केले होते.
             बुधवार दि. २५ मे, २०२२ रोजी पहिल्या सत्रात मराठी बालकुमार साहित्य सभेचे सचिव श्री. परशराम आंबी यांनी नाट्यछटा लेखन कसे करावे हे त्यांनी आपल्या नाट्यछटा सादर करून त्याद्वारे प्रतिपादन केले. 
         पूर्वीच्या काळापासून माणसाच्या जीवनात मनोरंजन करणे याला खूप महत्त्व होते. यातूनच कथा, काव्य, नाट्य असे विविध प्रकार जन्मास आले. यातील *नाट्य* हा प्रकार मनोरंजनासाठी उत्तम प्रकार समजला जातो. नाट्य प्रकारामध्ये नाटक, पथनाट्य, एकांकिका, एकपात्री, स्वगत आणि नाट्यछटा असे विविध प्रकार दिसून येतात. नाट्यछटा हा वेगळा साहित्यप्रकार आहे. तो नाटकाचा अंश किंवा भाग नव्हे. नाट्यछटा हा इतर प्रकारापेक्षा खूपच वेगळा प्रकार आहे. नाटकात अनेक पात्रे एकमेकाशी संवाद साधत असतात. एकपात्री प्रयोगात एकच व्यक्ती अनेक पात्रांचे संवाद बोलत असेल, तर त्यास एकपात्री म्हणतात. हा प्रकार डॉ. लक्ष्मणराव देशपांडे यांनी 'वऱ्हाड निघालंय लंडनला' जगभर पोहोचवला. जर एक व्यक्ती लांबलचक संवाद स्वत:शीच बोलत असते तेव्हा त्यास स्वगत असे म्हणतात. एखादी व्यक्ती स्वतः विषयीच बोलत असते तेव्हा त्यास मनोगत असे म्हणतात. परंतु नाट्यछटेमध्ये सादरीकरण करणारी व्यक्ती एकच असली तरी त्याच्या अवतीभोवती इतर व्यक्ती वावरत असतात असा आभास निर्माण केला जातो. इतर पात्रे बोलत असतात, पण त्यांचे बोलणे प्रत्यक्ष घ्यावयाचे नाही. ते फक्त गृहीत धरून सादरीकरण केले जाते. म्हणजेच नाट्यछोटेमध्ये बोलणाऱ्याचे बोलणे तेवढेच दाखवावयाची असते. हे ज्याला जमते तोच चांगल्या नाट्यछटा लिहू शकतो. कारण हेच खरे कौशल्य आहे. असे विचार परशराम आंबी यांनी व्यक्त केले. विविध नाट्यछटा आणि लेखकांची माहिती त्यांनी दिली. नाट्यछटा हा वाड्.मय प्रकार मराठी भाषेत दिवाकर म्हणजेच शंकर काशिनाथ गर्गे यांनी रूढ केला. १९११ ते १९३१ या २१ वर्षात त्यांनी ५१ नाट्यछटा लिहिल्या. 
      नाट्यछटा लेखन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, नाट्यछटेची वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि उत्तम नाट्यछटा लेखन कसे करावे हे सांगताना त्यांनी 'आमच्या वेळेला असलं काही नव्हतं' 'पाणी' या नाट्यछटा सादर केल्या. तसेच काही प्रसंग, घटना सांगून विद्यार्थ्याकडून नाट्यछटा लेखनाचे प्रात्यक्षिक करून घेतले.
 दुसऱ्या सत्रातमराठी बालकुमार साहित्य सभेचे सचिव श्री. परशराम आंबी यांनी नाट्यछटा लेखन कसे करावे हे त्यांनी आपल्या नाट्यछटा सादर करून त्याद्वारे प्रतिपादन केले. 
 

Comments

Popular posts from this blog

माझी मराठी माझी जबाबदारी

सारांश लेखन

'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' डॉ. श्रीकांत पाटील डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांची कोरोना महामारीचा विषय घेऊन प्राण्यांच्या सहलीचे काल्पनिक कथानक मांडून लिहिलेली 'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' ही कादंबरी त्यांच्या उत्तुंग भरारी मारणाऱ्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची साक्ष देणारी कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकातून लेखकाच्या अंगी असणारी सूक्ष्म दृष्टी दिसून येते. सामाजिक व चिंतनशील विषय घेतला आहे. माणसाने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःवर ओढवून घेतलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून घेतला आहे. मानवी जीवनातील चित्रण शिक्षक , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करून स्वानुभवाचा आनंद देणे. हाच आनंद रुपकाच्या माध्यमातून प्राणी जगतात देण्याचा लेखकाने केलेला प्रयत्न अतुलनीय असा आहे. लेखकाच्या मनातून अवतरलेला हा आहे. विचार आहे तो मुळात शाळा. हा विषय मानवी जीवनातील वैविध्यपूर्ण आहे. तो एक शिक्षकी शाळा , दोन शिक्षकी शाळा, आदिवासी शाळा, मुलांची शाळा, मुलींची शाळा, ग्रामीण शाळा, शहरी शाळा , रात्रशाळा, साक्षरता शाळा, आश्रमशाळा, रवींद्रनाथ टागोरांची निसर्गातील शाळा. पण या लेखकांच्या मनातून अवतरलेली शाळा ही वेगळीच आहे. मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका , शिपाई यांचा परिवार आलाच . पण ही शाळा प्राण्यांची शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक आहेत - सुजय हत्तीसर. शिक्षकांच्या मध्ये आहेत बाजीराव वानर, विश्वजीत वाघ तर शिक्षिकांच्यामध्ये नलिनी चित्ते, शोभा काळे बेटे या मॅडम. शाळेचा शिपाई म्हणजे गाढव. पण या साऱ्यांनी आपापली जबाबदारी पिण्याचं आणि नियोजन करण्याचं काम अतिशय सुंदरपणे स्वीकारलेले आहे . आणि पार पाडलेला आहे. ही कादंबरी वाचताना खरोखरच खऱ्या शाळेचा परिपाठच आपण पाहतोय असे वाटते. मुलांच्या मध्ये असणारे सर्वगुण आणि अवगुणही या शाळेमध्ये आहेत. खरं म्हणजे मुलांना शाळेत जाणं आवडत नाही. इतर उचापती करण्यात त्यांना रस असतो. तसेच या शाळेतील विद्यार्थीही म्हणजे वानरसेना खऱ्या जीवनातील मुलाप्रमाणेच आहेत. त्यांना शाळेपेक्षा बाहेर फिरणे आवडते. काही दिवस वानर विद्यार्थी शाळेत न आल्यामुळे त्यांचे प्राणी- शिक्षक चौकशी करतात. तेव्हा त्यात त्यांना समजून येते की, ही मुलं शाळा सोडून त्यांच्या पालकांबरोबरच शेजारच्या गावात गेलेली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर शेजारच्या गावात कोरोनामुळे बंदिस्तपणा आला होता. त्याचाच फायदा घेऊन ही वानरसेना मौज मजा करत होती. तीच गोष्ट त्याने आपल्या शाळेत सांगितली. इतर प्राण्यांना ती पटली नाही. त्याची खातरजमा करून आतील माणसाच्या जगातील जीवन पाहण्यासाठी या प्राणी शाळेची सहल काढण्याचे नियोजन केलं जातं . खरं म्हणजे माणसाच्या सहलीच्या नियोजनाची जसे कार्य चालते तसेच या प्राणी जीवनाच्या सहलीचे नियोजन केले होते. सहल केव्हा, कुठे, कशी न्यायची याचे नियोजन करण्यात आले होते. अगदी शिस्तबद्ध सहल पार पडलेली आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हे पुस्तक वाचलेच पाहिजे. हे पुस्तक वाचताना लेखकाची कल्पकता दिसून येते. प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणाची माहिती , संस्थापक अर्थात सिंह राजाची परवानगी घेणे. शासनाची परवानगी मिळवणे, सहलीला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, सोबत घ्यावयाच्या वस्तूंच्या सूचना देणे, सहलीत पाळावयाचे नियम, पालकांची परवानगी आणि इतरांना त्रास न होता सहलीचा मुक्तपणे आनंद घेणे या साऱ्या गोष्टींचा उल्लेख लेखकाने मार्मिकपणे केला आहे . मनुष्यप्राणी कोरोणाच्या भीतीने घरामध्ये कैद झाला. लॉकडाऊनचा फायदा प्राण्यांनी आपल्या सहलीचा आनंद घेण्यामध्ये लुटला. सहल म्हणजे फक्त फिरणे नव्हे, मौजमजा करणे नव्हे , तर सहलीचा खरा अनुभव घेणे तो म्हणजे तो मनोगतातून मांडणे , निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे. योग्य पारितोषिके देणे. घटनांची सूत्रबद्धपणे मांडणी करणे होय. मुलांना चित्रांची आवड असते हे लक्षात घेऊन या कादंबरीत प्राण्यांची चित्रे रेखाटलेली आहेत. त्यामुळे बाल वर्गाला मोहित करणारी अशीच कादंबरी झालेली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि रसिक वाचकांना करमणुकीच्या बरोबरच ज्ञानाचे अमृत पाजून डोळे उघडण्याचे कामही ही कादंबरी करते. ही कादंबरी इसापनीतीच्या कथांची आणि वि. स. खांडेकर यांच्या रूपक कथांची आठवण करून देणारी आहे असे मला वाटते. ही कादंबरी वाचताना शाळेतील प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहतात. स्वतः सहलीचा घटक बनून सवारी केल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हेच तर लेखकाचे खरे यश आहे असे म्हणता येईल. हृदय प्रकाशनप्रकाशनने प्रकाशित केलेली ही कादंबरी रंगीत चित्रांनी सजलेली आहे. कादंबरीचा संपूर्ण आशय असणारे देखणे मुखपृष्ठ चित्रकार श्रीरंग मोरे यांचे आहे. तर आतील चित्रे चंद्रकांत सोनवणे आणि बाळ पोतदार यांची आहेत. वाचक रसिक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील याची मला खात्री आहे. डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांना पुढील लेखन काेर्यासाठी हार्दिक शुभेच्छा. परशराम रामा आंबी वरणगे पाडळी