Posts

Showing posts from February, 2022

जळगाव साहित्य संमेलन

Image

'कोरोना आणि महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था. '

'कोरोना आणि महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था'         'फिरत जावे कधी या गावी तर कधी त्या गावी, शिकून यावे नवीन काही.'         काही दिवसापूर्वी मीच रचलेल्या कवितेच्या या ओळी आहेत. माझ्या जीवनात भटकंती किती प्रिय आहे हे तुमच्या लक्षात आले असेल. माझा प्रवास सुरू असताना अचानक कोरोनासारखं महासंकट केवळ एका देशावर आले ; नाही तर संपूर्ण विश्वावर येऊन कोसळलं होतं. त्याला प्रतिबंधक म्हणून लॉकडाऊन हाच सर्वोत्तम पर्याय निवडला गेला. तेव्हा सतत भिरभिरणारी माझी पावले अचानक स्थिरावली . 'कोरोना आणि महाराष्ट्र शिक्षण व्यवस्था' याविषयी मी आपल्यासमोर विषय मांडत आहे.           मित्रांनो, लाॅकडाऊन नंतरची जी सकाळ उजाडली, ती अतिशय जिवंत वाटत होती. इतके दिवस अबोल झालेली घरे बोलकी झालेली दिसत होती. सकाळी जसा चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू यावा, अगदी तसाच माणसांचा गोंगाट ऐकू येत होता. न्यूज पेपरचं पहिलं पान व्यापणाऱ्या खून, बलात्कार, गाडी अपघात या बातम्या केव्हाच हद्दपार झाल्या होत्या. हे सारं एका कोपऱ्यात कायमचं साठवून ठेवण्यासारखे होतं.  ...

भाषण संत तुकाराम

         महाराष्ट्र भूमी ही शूर-वीरांची आहे. संत महात्म्यांची आहे. 'ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस|' असे म्हटले जाते. अंधकाराने आंधळ्या झालेल्या समाजाचे ज्ञानरूपी काजळकाडीने डोळे स्वच्छ करणारी महाराष्ट्रभूमी आहे. यामध्ये वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला आहे. अठरापगड जाती-धर्माचे संत या संप्रदायामध्ये संघटित होऊन गेले. कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा वसा घेतला. या वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम महाराजांनी फार मोठे कार्य केले आहे. महाराष्ट्रातील वेगळ्या जाती-धर्माच्या लोकांना संत तुकारामांनी व्यवहार ज्ञान शिकवले आहे. अध्यात्म आणि व्यवहार यांची जीवनात कशी सांगड घालता येईल आणि जीवन आनंदमय बनवता येईल हे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगितलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात ----            'आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने,               शब्दांचीच शस्त्रे, यत्ने करू||               शब्दचि आमुच्या, जीवाचे जीवन   ...

कुलदीपिका नवीन लेखन

*कुलदीपिका*           कमळा वहिनीला पुन्हा एकदा मुलगीच झाली. हौसा सुईनीनं तिची यापूर्वी चार बाळंतपणं केली होती. तिचं हे पाचवं बाळंतपण होतं. नाक मुरडत, पदर खोचत बाहेरच्या बाजूला आवाज देत हौसा म्हणाली, "बायजाक्का, नात झाली बघ तुला." असं ऐकताच देवघरात जपमाळ करत बसलेल्या बायजाक्कानं आपल्या तोंडाचा पट्टा चालू केला, "देवा, देवा, देवा. कुठल्या जन्माचं पाप भोगाय लावलंस रं बाबा तू. वळीनं चार पोरी दिल्यास, पर म्या काय म्हटलं नाही तुला. आता पोरगा देशील असं वाटलं होतं. पण पाचव्यांदापण पोरगी दिलीस. किती आशेनं पाहत होते म्या. बाजीरावाला सांगत होते की, अरं बाबा! कोल्हापुरातल्या डॉक्टरकडून तपासून घे. पण त्यांनं माझं काही ऐकलं नाही. तो म्हणायचा, "अगं आई, तपासणी करून घ्यायला बंदी आहे. डॉक्टर तयार होत नाहीत." खरं तर पोरीचं लगीन करायचं म्हटलं तर  हुंडा द्यावा लागतो. ओळीनं पाच पोरीची लग्नं करावी लागणार. त्यासाठी राब राब राबावं लागणार असं तिच्या मनात  यायचं.            असंच काही महिनं निघून गेले. परमेश्वराच्या दरबारात 'देर है लेकिन अंधेर नहीं है...

चंद्रमुखी

                          *चंद्रमुखी*            फार फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. अगदी प्राचीन काळातील म्हटली तरी चालेल. ही गोष्ट आहे कांचननगरामध्ये घडलेली. कांचननगरामध्ये छत्रपाल नावाचा एक राजा राज्य करीत होता. रूपमती ही त्याची राणी होती. नावाप्रमाणेच ती खूप रूपवान होती. जणू सौंदर्याची सिंधू होती. राजाचे तिच्यावर खूप प्रेम होते. पण राणी खूप नाराज होत. कारण तिला मूलबाळ झालेलं नव्हतं. लग्नाला-बारा वर्षे उलटून गेली होती; तरीही तिची कूस उजवली नव्हती.           कांचननगराच्या उत्तरेला घनदाट जंगल होते. जंगलाच्या पलीकडे पद्मपूर नावाचे गाव होते. त्या गावात एक साधू राहत होता. त्याच्या करामतीच्या अनेक वार्ता दूरवर पसरलेल्या होत्या. त्याची कीर्ती राजाच्या कानावर आली होती. राजा राणीसह साधूच्या भेटीला गेला.साधूने राजाचे स्वागत केले. साधूने राणीला एक फळ मंत्रून दिले. पण एक अट घातली.  पुत्र जन्मला; तर त्या पुत्राचे लग्न अगदी लहान वयात करायचे. तेही पाच वर्षापूर्वी. राजाने...

देणाऱ्याने देत जावे.......

                   *देणाऱ्याने देत जावे......*            ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांनी एक छानशी कविता लिहिली आहे. ती म्हणजे 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे| घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावेत||'  ही कविता मला आठवण्याचं कारणही तसंच आहे.                  रांजणवाडी नावाचं छोटेसं गाव होतं. त्या गावात राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्था सुरू केलेली होती. गावातील लोकांना सावकारीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी या पतसंस्थेची स्थापना झाली होती. या संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्याचे ठरविण्यात आलेले होते. यानिमित्ताने होतकरू विद्यार्थी, प्रामाणिकपणे कर्जफेड करणारे सभासद आणि या संस्थेमुळे ज्यांचे जीवन घडले, फुलले अशा थोर व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बगळेसाहेबांना आमंत्रित केले होते. तर अध्यक्ष म्हणून गावातीलच ज्येष्ठ नागरिक कावळेदादांची निव...