Posts

Showing posts from July, 2020

८ वी इतिहास टेस्ट २

८ वी इतिहास टेस्ट 2 1.  ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात .....येथे पहिली वखार स्थापन केली . (1 point)       ◯ मुंबई       ◯ कोलकाता       ◯ अहमदाबाद       ◯ सुरत 2.  व्यापार व उद्योगधंदे यामुळे युरोपीय देशात ....... अर्थव्यवस्थेच्या उदय झाला. (1 point)       ◯ लोकशाही       ◯ हुकूमशाही       ◯ भांडवलशाही       ◯ सांगता येत नाही 3.   इ.स.१६८९ च्या ....... कायद्यामुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. (1 point)       ◯   बिल ऑफ लेप्टस्       ◯ बिल ऑफ राइट्स       ◯ बिल ऑफ किंग्स       ◯ बिल ऑफ हेड्स 4.  अमेरिकेतील मूळ रहिवाशांना ........म्हणतात.  (1 point)       ◯ इंग्रज       ◯ फ्रेंच   ...

प्रकरण - २

प्रकरण-2          माझी सर्व भावंडे रजपूतवाडी येथे लहानाची मोठी झाली होती.  रजपूतवाडी हे माझे आजोळ होते.  पण माझे खरे आजोळ वाळवा तालुक्यातील शिरगाव होय.  शिरगाव हे कृष्णा नदीच्या काठावरील गाव.  पूर्वी कृष्णा नदीला पाणी नसायचे. त्यामुळे पावसाळ्यात होणारी पिके घेतली जायची.  बाकी आमच्या गावातून बैलगाडीतून शिरगावला  धनधान्य नेले जायचे.  पूर्वी १९६० च्या दरम्यान दुष्काळ पडला होता.  शिरगावातील माझे आजोबा आणि त्यांची भावंडे आमच्या गावी आली होती. त्यावेळी रजपूतवाडी येथील किशाबापूचा बंगला बांधण्याचे काम सुरू होते.  त्या बांधकामावर माझे आजोबा आणि त्यांची भावंडे काम करायला होती. अलीकडे म्हणजे वीस वर्षापूर्वी  रजपूतवाडी येथे आज इंदिरानगर आहे , तेथे चुन्याची घाणी होती.  त्या चुन्याच्या घाणीमध्ये चुना तयार करून बंगल्याचे बांधकाम केले होते.  माझ्या आजोबाचा एक भाऊ आप्पाजी  बुधवार पेठेतील तोरस्कर चौकात  जावून राहिलेला आहे. तर एक भाऊ गुंडाप्पा  केर्लीमध्ये जावून राहिलेला आहे.  माझे आजोबा गणपती  रज...

प्रकरण -१

प्रकरण-1           पूर्वीचा काळ अतिशय धगधगीचा आणि आर्थिकदृष्ट्या  मागासलेपणाचा होता. गावात काही मोजकीच घरे श्रीमंतांची असायची. गावातील बरेचसे लोक त्यांच्या दारी सेवेला असायचे. आजच्या इतकी सुधारणा  त्याकाळी नक्कीच नव्हती.  मी जे काय सांगतोय ते ७०-८० वर्षापूर्वीचा काळ आहे. गावात नीट पक्के रस्ते नव्हते. पावसाळ्यात गावातून सारी दलदल असायची. घरातून बाहेर पाऊल टाकला की चार - चार बोटाइतका चिखल असायचा. त्यातून जाण्यासाठी लाकडी खडावा असायच्या. खडावा म्हणजे खाली चार बोटाचा लाकडाचा ठोकळा. त्या ठोकळ्याला मधोमध निम्मा कट केला जायचा आणि वरती पाय अडकण्यासाठी चामड्याच्या पट्ट्या असायच्या. किमान पाव किलो वजनाच्या खडावा उचलत चिखलातून जावं लागायचं.                त्याकाळी सारी घरं पालापाचोळा , छप्पराची असायची. त्यातील चांगली घरे म्हणजे अगदी साध्या खापरांनी शेखरलेली असायची. गावात एखाद्या श्रीमंत माणसांचे घर पक्क्या दगड विटांनी बांधलेलं असायचे. ते घर म्हणजे त्या गावातील राजवाडाच  जणू तो.           क...

८ वी मराठी ---माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

Print ८ वी मराठी टेस्ट १ 1.    ' खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे ' ही प्रार्थना लिहिणारे........ (1 point)       ◯ ग दि माडगूळकर       ◯ सेनापती बापट       ◯  मंगेश पाडगावकर       ◯ साने गुरुजी 2.    फासावर न चढलेली शहीद व्यक्ती........ (1 point)       ◯ कुर्बान हुसेन       ◯ भगतसिंग        ◯  राजगुरू       ◯ लो.टिळक 3.    ' जनगणमन ' हे राष्ट्रगीत लिहिणारे कवी........ (1 point)       ◯   रवींद्रनाथ टागोर       ◯  बंकिमचंद्र चॅटर्जी       ◯ राजेंद्र प्रसाद       ◯  स्वातंत्र्यवीर सावरकर 4.   सर्व मुले आश्चर्याने पाहतच राहिली , कारण...... (1 point)       ◯  असा प्रश्न कधीच कोणी विचारला नव्...

कथा/ कादंबरी लेखन प्रस्तावना

मी विचार करतोय कुठून सुरुवात करावी...... पन्नाशी उलटल्यावर आलेल्या अनुभवापासून , नोकरी लागल्यावर आलेल्या अनुभवापासून की लग्न झाल्यावर आलेल्या अनुभवापासून , शाळा , काॅलेज जीवनापासून सुरुवात करावी.  त्यापेक्षा अगदी बालपणापासून सुरुवात करावी. माझं मलाच कळेना झालं की  कुठून सुरुवात करावी ? अनेक लेखकांनी आपलं लेखन विशेषत: नवलेखकांनी आपल्या लेखनाची सुरुवात करून आपले विचार रसिकांसमोर ठेवलेही आहेत. मलाही अनेक मित्रांचे फोन आले की तू अजून का केली नाहीस सुरुवात तुझ्या लेखनाला? खरं म्हणजे मी तसा मोठा लेखक नाही, पण काहीतरी लिहावं असं अनेक मित्रमंडळींना वाटत होतं . तसं पाहायला गेलं तर संधीच होते अगदी मार्च २०२० शेवटचा आठवडा ते१५ जुलै २०२० असा चार ते पाच महिने कालावधी मिळालेला होता.  या कालावधीत काहीतरी माझ्या हातून लेखन होणे अपेक्षित होतं. पण मी लिहू शकलो नाही.  म्हणजे  अनेकांचा अपेक्षाभंग झालेला आहे . आपले विचार मांडण्यासाठी सरस्वती प्रसन्न  व्हावी लागते. ती प्रसन्न होणार हे काही माझ्या हातात नव्हते. पण लिहायला बसलो असतो तर नक्कीच काहीतरी लिहून झाले असते.  तसे काह...

कहूत

https://kahoot.it/challenge/03881120?challenge-id=e7d4bdbd-4009-46e9-8ecf-ad2c495f50ec_1594374483259

८ वी पाठ १ इतिहासाची साधने टेस्ट

८ वी इतिहास टेस्ट १ 1.  विज्ञान , भूगोल , आरोग्य यांसारख्या विषयांवर माहितीपट निघतात. (1 point)       ◯ बरोबर       ◯ चूक 2.  वृत्तपत्रे ही .........साधने आहेत. (1 point)       ◯ भौतिक       ◯ मौखिक       ◯ लिखित 3.  पोवाडे , स्फूर्तिगीते ही भौतिक साधने आहेत. (1 point)       ◯ बरोबर       ◯ चूक 4.   किल्ले , तुरुंग, राजवाडे , निवासस्थाने ही...... ...साधने आहेत . (1 point)       ◯ भौतिक       ◯ मौखिक       ◯  दृक - श्राव्य       ◯   लिखित 5.  1913 साली दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला. (1 point)       ◯ बरोबर       ◯ चूक 6.  चित्रपट हे............ साधन आहे. (1 point)       ◯ भौ...

सर्वनाम

Image
व्याकरण : सर्वनाम खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. *Required 1. १. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला .........म्हणतात.  * 1 point Mark only one oval. विशेषण सर्वनाम क्रियापद सांगता येत नाही 2. २. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. तो शाळेला जातो. 1 point Mark only one oval. तो शाळेला जातो सांगता येत नाही 3. ३. पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार ........आहेत. 1 point Mark only one oval. एक दोन तीन चार 4. ४. सर्वनामाचे .........प्रकार मानतात. 1 point Mark only one oval. चार पाच सहा सात 5. ५. पुढीलपैकी .........हा सर्वनामाचा नाही. 1 point Mark only one oval. दर्शक संबंधी प्रश्नार्थक भाववाचक 6. ६. आपण, स्वत: ही ........ सर्वनामाची उदाहरणे आहेत. 1 point Mark only one oval. आत्मवाचक पुरुषवाचक प्रश्नार्थक अनिश्चित 7. ७. मी शाळेतून आत्ताच आलो . या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ......आहे. 1 point Mark only one oval. प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक तृत्तीय पुरुषवाचक सांगता येत नाही 8. ८. ' कोण, काय ' ही सर्वनामे वाक्यात आल्यानंतर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असेल तर त्यांना .........सर्वनामे म्हणतात. 1 point Ma...

वस्तू कवितेवर टेस्ट

१० वी मराठी वस्तू कवितेवर टेस्ट 1.  माणसाने वस्तूंचा .......हक्क कायम ठेवावा. (1 point)       ◯ स्वच्छतेचा       ◯ समारोप        ◯ निरोपाचा       ◯ सांगता येत नाही  2.  वस्तूंना ......ही नसेल. (1 point)       ◯ हालचाल        ◯ मन       ◯ आवड       ◯ संवेदना  3.    ' हमी देणे ' याचा अर्थ........ (1 point)       ◯ मान देणे        ◯ सन्मान देणे        ◯ हक्क देणे        ◯ आश्वासन देणे 4.  निर्जीव वस्तूंनाही ......भावना ओअसते. (1 point)       ◯ मानवी        ◯ सामाजिक        ◯ सजीव       ◯ सांगता येत नाही  5.   ' नि...

नाम व नामाचे प्रकार

https://testmoz.com/q/4243600

४. कथा--- 'नेत्रदान'

                   ४.   *नेत्रदान श्रेष्ठ दान*           आज श्रीकांत  रडत होता. पण ते दु:खाश्रू नव्हते, तर आनंदाश्रू होते. त्याच्या कुशीमध्ये त्याची मुलगी सपना होती. तीही रडत होती. त्याला कारणही तसेच घडलेले होते.  ते म्हणजे श्रीकांतने आपल्या मुलीला म्हणजेच सपनाला आपले दोन्ही डोळे दान केले होते.  म्हणून सपना आज सारे जग पाहत होती, पण श्रीकांत मात्र काहीच पाहू शकत नव्हता.  कारण त्याचे दोन्ही डोळे त्याने आपल्या मुलीला सपनाला दान दिले होते. सपनाला दृष्टी आली होती. ती सारखी सारखी न्याहाळून पाहू शकत होती , पण जेव्हा तिला कळले होते , की मी जे पाहू शकते ते माझ्या बाबांच्या डोळ्यांनी पाहू शकतेय, मात्र माझ्यामुळेच माझ्या बाबांना दृष्टिहीन व्हावे लागत आहे .  म्हणून तिला खूप खूप वाईट वाटत होते. तिचाच तिला राग येत होता. म्हणून ती हमसून हमसून रडत होती.  श्रीकांतही रडत होता. मात्र ते त्याचे दुःखाश्रू नव्हते, तर ते सुखाश्रू होते . कारण आज आपली मुलगी सपना सारे जग  पाहत होती, म्हणून...