Posts

Showing posts from July, 2024

आदर्श विद्यार्थी कथा

सोनगाव नावाचे एक गाव होतं. त्या गावात चंदू नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याची सखू नावाची पत्नी होती. त्या दोघांना नंदू नावाचा एक गुणी मुलगा होता. पण तो फार आळशी होता. त्याला खूप झोप असायची. सकाळी त्याला उठवताना तो उठायचा नाही. अंथरूणात पडून राहायचा. सकाळचे सात वाजून कधी गेले हे त्याला कळायचे नाही.            आज त्याचा वाढदिवस होता. तरी तो लवकर उठला नाही. त्याच्या आई-बाबांनी त्याला उठवलं नाही. सकाळचे नऊ वाजले होते. त्याला जाग आली. तो अंथरूणातून उठला. त्याची आई म्हणाली, "बाळ नंदू, अरे आज तुझा वाढदिवस आहे ना? आजही तू लवकर उठला नाहीस. उलट खूप वेळाने उठलास."  तेव्हा नंदू म्हणाला, "आई, मला रात्री झोपताना माझ्या आठवणीत आज वाढदिवस आहे असं होतं; पण सकाळी विसरलो. आज रविवार  आहे आणि सुट्टीचा दिवस आहे एवढंच माझ्या लक्षात राहिलं. म्हणून मी उठलो नाही."  आई म्हणाली, "बरं. आता आटप लवकर. तुझ्या मित्रांना वाढदिवसाविषयी सांगितलेस का नाही अजून?"  " नाही." "मग कधी सांगणार तू?" "हे काय आई, मी आंघोळ करतो. चहा, नाश्ता घेतो. मग माझ्या मित्रांना सांगायला जा...

नंदूचा वाढदिवस

सोनगाव नावाचे एक गाव होतं. त्या गावात चंदू नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याची सखू नावाची पत्नी होती. त्या दोघांना नंदू नावाचा एक गुणी मुलगा होता. पण तो फार आळशी होता. त्याला खूप झोप असायची. सकाळी त्याला उठवताना तो उठायचा नाही. अंथरूणात पडून राहायचा. सकाळचे सात वाजून कधी गेले हे त्याला कळायचे नाही.            आज त्याचा वाढदिवस होता. तरी तो लवकर उठला नाही. त्याच्या आई-बाबांनी त्याला उठवलं नाही. सकाळचे नऊ वाजले होते. त्याला जाग आली. तो अंथरूणातून उठला. त्याची आई म्हणाली, "बाळ नंदू, अरे आज तुझा वाढदिवस आहे ना? आजही तू लवकर उठला नाहीस. उलट खूप वेळाने उठलास."  तेव्हा नंदू म्हणाला, "आई, मला रात्री झोपताना माझ्या आठवणीत आज वाढदिवस आहे असं होतं; पण सकाळी विसरलो. आज रविवार  आहे आणि सुट्टीचा दिवस आहे एवढंच माझ्या लक्षात राहिलं. म्हणून मी उठलो नाही."  आई म्हणाली, "बरं. आता आटप लवकर. तुझ्या मित्रांना वाढदिवसाविषयी सांगितलेस का नाही अजून?"  " नाही." "मग कधी सांगणार तू?" "हे काय आई, मी आंघोळ करतो. चहा, नाश्ता घेतो. मग माझ्या मित्रांना सांगायला जा...

आदर्श विद्यार्थी

*आदर्श विद्यार्थी* नंदू आमचा लयच भारी  पर्यावरणीय आवड खरी वाढदिनी वृक्षारोपण करी  मित्रांनाही तो विनंती करी आपल्या जीवनात कधी प्लॅस्टिकचा वापर ना करी वाढदिनी चॉकलेट ना वाटी  गुडदाणीची तो वाटणी करी वर्गातील केरकचरा उचलतो साफसफाईचाही मंत्र जपतो गुणांनी आपल्या शाळेचा तो आदर्शवादी विद्यार्थीच ठरतो *परशराम आंबी*

विजय

*विजय*   एक आटपाट नावाचं नगर होतं. त्या नगरात एक भलं मोठं तळं होतं. त्या तळ्यात खूप खूप वर्षापासून बेडकांची वस्ती होती. आजोबा, आजी, वडील, आई, नातू, नात असा परिवार असलेली अशी अनेक कुटुंबे समाधानाने राहत होती.                        तळ्याच्या काठावर एक मोबाईलचा टॉवर उभारला होता. सारे बेडूक त्या टॉवरकडे उत्सुकतेने पाहत होते. पण काही पिलांना माणसांनी हे नवीन काय उभे केले आहे, ते जाणून घेण्याची खूपच उत्सुकता लागली होती. मोठ्यांचा डोळा चुकवून आपण या टॉवरवर जाऊ या याबाबत चर्चा सुरू झाली होती. पण ते आपणाला जाऊ देतील का? याची भीती होती. खरंच ते ऐकून मोठे व जाणते बेडूक मात्र धास्तावलेले होते. हे तळं म्हणजे त्यांचं विश्व होतं. त्या तळ्याच्या बाहेर कुणीही गेले नव्हते. बाहेरच्या जगाचा त्यांना अनुभव नव्हता.             वीरू, राहुल, सौरभ आणि सचिन या नावाची बेडकांची पिल्लं फारच बिलंदर होती. धाडसी होती. नव्या विचारांची होती. त्यांना मोठ्यांचे विचार कधीच पटत नव्हते. ती आपल्या पालकांना नेहमी म्हणत...