Posts

Showing posts from March, 2022

भाकरचोर कथासंग्रह मनोगत नवीन

'भाकरचोर' कथासंग्रह  मनोगत.......  मनुष्य हा गोष्टी वेल्हाळ प्राणी आहे. प्रत्येक व्यक्तीला गोष्टी ऐकायला, वाचायला खूप आवडतात. अगदी प्राचीन काळापासून कथांचा उगम झालेला आपणास पहावयास मिळतो. अगदी सुरुवातीच्या काळात पद्य हा वाड़मय प्रकार होता. या पद्यामध्येही कथाबीज होते. गद्य स्वरूपातील साहित्य प्रकार महानुभाव पंथ काळापासून अस्तित्वात असलेला आपणास पहावयास मिळतो. तो चक्रधर स्वामींच्या आठवणींच्या लीळाचरित्राच्या स्वरूपात होता. प्राचीन कथा, मध्ययुगीन कथा, लघुकथा पूर्वकथा, लघुकथा, नवकथा असा कथांचा प्रवास झालेला आपणांस पाहायला मिळतो. पूर्वीच्या कथा मौखिक पद्धतीच्या होत्या. परंतु इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी मुद्रण कला भारतात आणली. ह. ना. आपटे यांनी लघुकथेचा पाया घातला असे मानले जाते. त्यानंतर दिवाकर कृष्णांनी मराठी कथेला नवे वळण दिले आहे. ना.सी.फडके वि. स. खांडेकर यांनी कथेला उच्च शिखरावर नेले आहे. य.गो.जोशी, श्री. म. माटे, चिं. वि. जोशी यांनी कथेची भाषाशैली, तंत्र, अनुभव, दृष्टीकोन याबाबत बदल  करत आपली वेगळी कथा निर्मिती केलेली दिसून येते.          ...

मनोगत भाकर चोर कथासंग्रह

               'भाकरचोर' ही माझी तिसरी साहित्यकृती आपल्यासारख्या सुज्ञ वाचकांसमोर ठेवताना मला खूप खूप आनंद होत आहे. माझी पहिली साहित्यकृती सन २००४ मध्ये हृदय प्रकाशन, कोल्हापूरमार्फत 'कर्तव्य' एकांकिका संग्रह प्रकाशित झाला होता. तो श्री नवनाथ हायस्कूल पोहाळेचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत निकाडेसर यांच्या प्रोत्साहनाने प्रकाशित झाला. 'यशस्वी नाट्यछटा' हा नाट्यछटांचा संग्रह सन २०१६ मध्ये ज्ञानसंवर्धन प्रकाशन, कोल्हापूर यांनी प्रकाशित केलेला होता. ती माझी दुसरी साहित्यकृती. यासाठी राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आणि साहित्य संस्कृती मंडळ महाराष्ट्र शासनाचा वाङमय पुरस्कार प्राप्त डॉ. श्रीकांत पाटीलसर यांच्या प्रेरणेतून प्रकाशित झालेली साहित्यकृती.              सन २०२२ मध्ये माझी तिसरी साहित्यकृती 'भाकरचोर' या नावाने कथासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित होत आहे. यातील काही कथा 'महान मराठा', 'कृषिराज', 'ज्ञानमाऊली', 'शब्दसुगंध', 'मासिक ऋग्वेद', 'बहिर्जी', 'न्यूज पेपर गंगाधर', अशा विविध दिवाळी अंकातून ...

आर्मीवाला दादा

         *आर्मीवाला दादा* गाव तसं चांगलं होतं. गावातली काही माणसं तालुका पातळीवर तर काही माणसं जिल्हा पातळीवर नेतृत्व करीत होती. पीकपाणी चांगलं होतं. सोबत पशुपालन हा जोडधंदा होता. हातात पैसा असल्यामुळं काहींनी आरसीसी इमारती बांधल्या होत्या. चार चाकी गाड्या दारातच उभ्या राहिलेल्या होत्या. शहराजवळील गाव असल्यामुळे काही लोकं चाकरमानी होती. कशाचीही काळजी करायचं काम नव्हतं. सारा गाव आनंदात नांदत होता. लोकं सुख-दुःखात एकमेकांना मदत करीत होती.           या गावातील लोकांना वर्षातील दोन महिने मात्र नकोसे वाटत होते. त्यातील आठ ते दहा दिवस तर त्यांना फारच नकोसे वाटतात. ते दिवस म्हणजे पावसाळ्यातील महापुराचे दिवस. एकदा, दोनदा महापूर येऊन गेला की बाकी वर्षभर कसं अलबेल असायचं. १९८९ व २००५  या दोन वर्षात महापूरानं थोडी झलक दाखवली होती. पण त्यावेळी फारसे नुकसान झालेले नव्हते. हीच मोठी सीमा झाली आहे असे सर्वांना वाटत होते. यानंतर मोठा महापूर येऊ शकणार नाही अशा गोड गैरसमजात सारी लोकं होती. त्यांचंही बरोबर होतं म्हणा ना? कारण या गावात अनेक पिढ्या ...

'ऊसकोंडी' कादंबरी डॉ.श्रीकांत पाटील

डॉ. श्रीकांत पाटीलसर  यांच्या ऊसकोंडी कादंबरीचे परीक्षण         *ऊसकोंडी* -- *डॉ. श्रीकांत पाटीलसर* सुप्रसिद्ध 'लॉकडाऊन' या यशस्वी कादंबरीनंतर डॉ. श्रीकांत पाटीलसर यांची 'ऊसकोंडी' ही दुसरी कादंबरी प्रकाशित झाली. ती नुकतीच माझ्या हाती पडली. ती एका बैठकीत वाचून काढली. त्या कादंबरीवर काहीतरी लिहिले पाहिजे असे माझ्या मनी आले, म्हणून हा लेखन-प्रपंच.                   डॉ. श्रीकांत पाटीलसर यांची कोरोना या वैश्विक महामारीवर आधारित सुप्रसिद्ध कादंबरी म्हणजे 'लॉकडाऊन' या कादंबरीचे हिंदी, इंग्रजी, कन्नड अशा सहा ते सात भाषांत अनुवाद झालेला आहे. अशा सिद्धहस्त लेखकांची 'ऊसकोंडी' ही शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. सुप्रसिद्ध असलेली म्हण म्हणजे 'साखरेचे खाणार त्याला देव देणार.' अशी ही साखर ऊसापासून निर्माण होते. पण अशा ऊस उत्पादकाला काय मिळते? अस्मानी आणि सुलतानी संकटाला तोंड देत शेतकरी ऊस शेती करतो. शेती करत असताना मजुरांची समस्या, मशागतीचे वाढलेले दर, वाढलेल्या किंमतीची खते व औषधे, सोसायटी, पाणीपुरवठा या ठिकाणी जाऊन हेलपा...

भाषण संत तुकाराम

महाराष्ट्र भूमी शूरवीरांची, संत महात्म्यांची आहे. 'ज्ञानदेवे रचिला, पाया तुका झालासे कळस' असे म्हटले जाते. अंधकाराने आंधळ्या झालेल्या समाजाचे ज्ञानरूपी काजळ काडीने डोळे स्वच्छ केलेल्या या महाराष्ट्रभूमीमध्ये वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला.           अठरापगड जाती धर्माचे संत या संप्रदायामध्ये संघटित होऊन कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा वसा घेतला. या वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम महाराजांनी फार मोठे कार्य केले आहे. महाराष्ट्रातील वेगळ्या जाती, धर्माच्या लोकांना संत तुकारामांनी  व्यवहारज्ञान शिकवले आहे. अध्यात्म आणि व्यवहार यांची जीवनात कशी सांगड घालता येईल आणि जीवन आनंदमय कसे बनवता येईल हे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगितलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात,  "आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने  शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू  शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन  शब्दे वाटू धन जनलोका  तुका म्हणे पहा शब्दचि हा देव  शब्दाची गौरव करू पूजा'  असा शब्दांचा महिमा त्यांनी आपल्या कीर्तनातून आणि ...