Posts

Showing posts from July, 2021

पुस्तक परीक्षण- 'ज्ञानसूर्य'

*ज्ञानसूर्य*            'दलित मित्र स्वर्गीय ज्ञानोबा कदम गुरुजी कार्य आणि कर्तृत्व' हे चरित्रपर पुस्तक डॉ. श्रीकांत पाटील यांनी लिहिले आहे.       "उन्नत झाले आमुचे भाल            गुरुजी तुमच्यामुळे     तुम्ही लावल्या कल्पतरुला     आज लागली गोड फळे"         स्व. दलित मित्र कदम गुरुजी यांच्या पुतळ्याच्या फोटोखाली या ओळी लिहून चरित्र ग्रंथाची सुरुवात केली आहे.        या पुस्तकाला सचिव, समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे गौरव पत्र वसमहाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे शुभेच्छा पत्र आहे.               हा चरित्र ग्रंथ प्राचार्य डॉ. सुभाष कदम यांना सस्नेह अर्पण केलेला आहे.       महाराष्ट्र ही संतांची, क्रांतिकारकांची, विचारवंतांची आणि समाज सुधारकांची भूमी आहे. या भूमीमध्ये कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षणामध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्व...

५. 'भाकरचोर' कथा

                       ५.  *भाकरचोर*          दुपारचे दोन वाजले होते. शाळेचा गजर झाला. सहावा तास संपला होता. मुलांची जेवणाची सुट्टी झाली होती. काही मुले आपापला डबा घेऊन वर्गाबाहेर पडली होती. शाळेच्या परिसरात असलेल्या झाडाखाली मुले जेवायला बसली होती. मतदानासाठी लोक जसे बुथ टाकून बसतात; तशी सर्व मुले जेवायला बसली होती. इयत्ता सहावीच्या वर्गातून गोंधळ ऐकू येऊ लागला. म्हणून सहावीचे वर्गशिक्षक श्री. सानेसर स्टाफरूममधून उठून बाहेर येऊन वर्गाच्या दिशेने चालू लागले. वर्गात येताच त्यांनी आवाज दिला, "काय झालं गोंधळ घालायला?" हे ऐकताच सारी मुले गप्प झाली. भीतभीतच सेक्रेटरी तानाजी म्हणाला, "सर वर्गात चोरी झाली आहे." हे ऐकताच सानेसरांचा पारा चढला. आजपर्यंत शाळेत जी गोष्ट घडली नव्हती. ती गोष्ट घडली होती. तेही आपल्या वर्गात. याबद्दल त्यांना फार वाईट वाटले. त्यांनी मुलांना विचारले, "कोणी चोरी केली? त्याने उठून उभे राहा." पण कोणीही उठून उभे राहिले नाही. त्यांना आपला अपमान वाटला. त्यांनी पुन्हा विचारले, "पण चोरी कोण...

शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा

शैक्षणिक क्षेत्रामध्ये साहित्याच्या रूपात मैलाचा दगड ठरलेली पुस्तके आहेत. ती म्हणजे  माजी सहाय्यक शिक्षण संचालक संपतराव गायकवाड यांचे 'नजराणा' आणि नामदेव माळी यांचे ...........ही पुस्तके आहेत. यामध्ये गटशिक्षणाधिकारी असलेले डॉ. गणपती कमळकर यांच्या 'शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा' या पुस्तकाची भर पडलेली आहे.            खरे म्हणजे ही तिन्ही पुस्तके म्हणजे शाळा तपासणीच्या वेळी आलेले अनुभव कथन केलेले आहेत. प्रत्येक लेखकाचा एक दृष्टिकोन असतो. त्या दृष्टिकोनातून ही पुस्तके निर्माण झाली आहेत. यामधील  गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांच्या 'शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा' या २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाबाबत मी विचार मांडणार आहे. कोणतेही काम करताना ते सकारात्मक दृष्टिकोनातून केले पाहिजे. म्हणजे त्यात यश नक्की मिळते आणि ते टिकणारे ही असते.  त्यांनी आपल्या अर्पणपत्रिकेत  'सेवाभाव, निष्ठा, तळमळीने गुणवत्तापूर्ण      ज्ञानदान करून आदर्श पिढी घडवण्यासाठी समर्पित वृत्तीने कार्यरत असलेल्या सर्व शिक्षक बंधू-भगिनींना सविनय अर्पण ...

इतिहासाची साधने

८ वी इतिहास १.इतिहासाची साधने 1.   चित्रपट हे इतिहासाचे .......साधन आहे.  (1 point)       ◯ भौतिक       ◯  दृक श्राव्य        ◯ मौखिक       ◯  लिखित  2.  गटातील वेगळा शब्द ओळखा.  मूकनायक, लोकहितवादी, बहिष्कृत भारत, जनता (1 point)       ◯ मूकनायक       ◯ लोकहितवादी        ◯ बहिष्कृत भारत       ◯ जनता 3.  विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलेल्या मासिकाचे नाव.......  (1 point)       ◯ निबंध माला       ◯ प्रभाकर       ◯ बहिष्कृत भारत       ◯ केसरी 4.   गटातील वेगळा शब्द ओळखा.  पत्रव्यवहार, नियतकालिके, राजवाडा, पुस्तके (1 point)       ◯ पत्रव्यवहार       ◯ नियतकालिके ...

विशेषण

५ वी मराठी विशेषण 1.  पुढील वाक्यातील विशेषण ओळखा.  अक्षताने छान रांगोळी काढली होती.  (1 point)       ◯ अक्षता       ◯  छान       ◯  रांगोळी        ◯ होती 2.  पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. सविताला आंबट चिंच आवडते.  (1 point)       ◯ सविता       ◯ चिंच       ◯  आंबट       ◯  आवडते 3.  माझा पेन मला आवडतो.  (1 point)       ◯ माझा       ◯  पेन        ◯  मला        ◯  आवडतो  4.  पुढील वाक्यातील विशेषण ओळखा.   कविता सुंदर चित्र काढते.  (1 point)       ◯ कविता       ◯  सुंदर        ◯ चित्र    ...