Posts

Showing posts from December, 2021

पिंपळपान काव्यसंग्रह अनिता दिलीप कुमार कांबळे

                  रविवार दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन. यानिमित्ताने माझ्या वाचनात कवयित्री अनिता दिलीपकुमार कांबळे यांचा ललित पब्लिकेशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेला काव्यसंग्रह वाचनात आला. तथागत गौतम बुद्ध, क्रांतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलेला हा काव्यसंग्रह आहे.                खरं म्हणजे मनोगतात कवयित्रीनी 'कविता करणं' ही स्वप्नवत असणारी गोष्ट आहे असे नमूद केले आहे. कारण त्या विज्ञान आणि गणित या विषयाच्या अभ्यासक आणि विषय शिक्षिका आहेत. सन २०१९ आणि २०२० ही दोन वर्षे कोरोना महामारीने पर्यायाने लॉकडाऊनच्या छायेखाली होती. अनेक दृष्टीने हा कालावधी, शाप वाटत असला, तरी मिळालेल्या संधीचा ज्यांनी फायदा करून घेतला. त्यांना हा कालावधी वरदानच ठरलेला आहे. लॉकडाऊनचा हा काळ कवयित्री अनिता दिलीपकुमार कांबळे यांनी सदुपयोग करून घेतला असे मला वाटते. या लाॅकडाऊनच्या काळात 'पिंपळपान' हा काव्यसंग्रह आकारास आला.    ...

8शाळा कथा

                               शाळा              कोल्हापूर शहरापासून नऊ-दहा कि.मी. अंतरावर आटपाट नावाचे एक गाव होते. हे गाव शहरापासून आडवळणाला होते. गावात सातवीपर्यंत शाळा होती. गावात आठवीचा वर्ग नसल्याने पुढचे शिक्षण घेण्यासाठी मुलांना कोल्हापूर शहरात जावं लागत होते. कोल्हापूर शहर आणि या गावाच्या मधून  पंचगंगा नदी वाहत होती. या नदीवर पूल होता. पण त्याची उंची अतिशय कमी होती. थोडा जरी मोठा पाऊस पडला तरी त्या पुलावर पाणी यायचे. पाणी पुलावरून वाहत होते. महिना-दोन महिने या पुलावर पाणी राहत होते. या गावाच्या उत्तरेला एक डोंगर होता. त्या डोंगराखालून पायवाटेने पंचवीस-तीस किलोमीटर पायपीट करून कोल्हापूरला शाळेसाठी मुलांना जावे लागत होते. शाळा सुटल्यानंतर घरी परत येताना तेवढेच अंतर चालत यावे लागायचे.  साऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी गावातील प्रमुख व्यक्ती तानाजीराव आडसुळे यांनी गावातील काही लोकांना एकत्र बोलावले. आपल्या मनातील गोष्ट सांगितली. गावातील लोक त्यांना मानत होत...