पिंपळपान काव्यसंग्रह अनिता दिलीप कुमार कांबळे

                  रविवार दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन. यानिमित्ताने माझ्या वाचनात कवयित्री अनिता दिलीपकुमार कांबळे यांचा ललित पब्लिकेशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेला काव्यसंग्रह वाचनात आला. तथागत गौतम बुद्ध, क्रांतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलेला हा काव्यसंग्रह आहे. 
              खरं म्हणजे मनोगतात कवयित्रीनी 'कविता करणं' ही स्वप्नवत असणारी गोष्ट आहे असे नमूद केले आहे. कारण त्या विज्ञान आणि गणित या विषयाच्या अभ्यासक आणि विषय शिक्षिका आहेत. सन २०१९ आणि २०२० ही दोन वर्षे कोरोना महामारीने पर्यायाने लॉकडाऊनच्या छायेखाली होती. अनेक दृष्टीने हा कालावधी, शाप वाटत असला, तरी मिळालेल्या संधीचा ज्यांनी फायदा करून घेतला. त्यांना हा कालावधी वरदानच ठरलेला आहे. लॉकडाऊनचा हा काळ कवयित्री अनिता दिलीपकुमार कांबळे यांनी सदुपयोग करून घेतला असे मला वाटते. या लाॅकडाऊनच्या काळात 'पिंपळपान' हा काव्यसंग्रह आकारास आला. 
           साहित्य लेखन करत असताना तुम्ही गणित, विज्ञान, मराठी, इंग्रजी किंवा कोणत्या विषयाच्या अभ्यासक आहात हे  महत्त्वाचे ठरत नाही, तर आपण जे अनुभवलं, साहिलं, पाहिलं आणि वाचलेलं असतं. ते कुठेतरी आपल्या मनामध्ये खदखद करत असतं. मन अस्वस्थ होतं. ते शब्दांच्या माध्यमातून कागदावरती येत असतं. मुळात कवयित्रीच्या घरी याचा वसा आणि वारसा होता. तो त्यांच्या वडिलांच्या संस्कारातून. तसेच त्यांना त्याचे पती, त्यांचे नातलग यांनी प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले होते असे मला वाटते. त्यांच्या विचारांतून पुरोगामी, विज्ञानवादी आणि विवेकवादी विचारांचा प्रभाव दिसून येतो. तसेच गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा पडलेला प्रभावसुद्धा त्यांच्या कवितेतून आपणाला पाहायला मिळतो. सत्य, समता, बंधुता, समाजवाद या मूल्यांची पेरणी त्यांच्या साहित्यात आपणाला पाहायला मिळते. 
            बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसून सापडलेला विचार गौतमांनी लोकांपर्यंत पोहोचवले. तेच विचार कवयित्रीने आपल्या पिंपळपान कवितेत मांडलेले आहेत. सिद्धार्थ यांच्या पदस्पर्शाने ही धरणी पवित्र झाली असे कवयित्री म्हणते. 'महात्मा' कवितेत महात्मा फुलेंचे मोठेपण वर्णन करताना कवयित्री म्हणतात, "जे मारेकरी ज्योतिबाचा जीव घेण्यासाठी आले. त्यांनाच शिक्षणाचे दान यांनी दिलेले आहे."  कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते. अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हाच विचार त्यांनी 'राजर्षी शाहू महाराज' या कवितेत मांडून 'गाव तेथे शाळा, गाव तेथे ग्रंथालय' हा विचार या कवितेतून सांगितला आहे. छत्रपती शिवरायांनी केलेल्या कार्याचं वर्णन 'कुळवाडीभूषण' या कवितेत केलेले आहे. अशा अनेक कवितेतून सावित्रीबाई फुले, डॉ. आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या नाम शीर्षकावरून त्यांच्या कार्याची महती कवितेतून मांडलेली आहे. प्रथा, देवदासी, लोकसंस्कृतीचे उपासक, परंपरेची गुलामी यासारख्या कवितेतून जाती, धर्म, रूढी, परंपरा याच्यावर कडाडून टीका केली आहे. जात, धर्म याच्या पलीकडे मानवता हीच श्रेष्ठ आहे, हे कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 'संविधान' या कवितेत कवयित्रींनी डॉ. आंबेडकरांनी दिलेली मूलभूत कर्तव्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये, स्त्री-पुरुष समानता, उच्च नीचतेची भिंत नष्ट करण्याचा प्रयत्न केला. संविधान आणि इतिहास बदलला असे सांगितलेला आहे. पोस्टकार्ड, कागद, आई, जोडीदार, छत्री, मुसळधार पाऊस, शाळा अशा वेगळ्या विषयाच्या कविताही मोठ्या ताकतीने रेखाटण्याचा कवयित्रींचा प्रयत्न स्तुत्य आहे. 
हा काव्यसंग्रह माझे मित्र उत्तम नलवडे यांचेकडून प्राप्त झाला. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. 
                  त्यांच्या पहिल्या पिंपळपान या काव्यसंग्रहासाठी हार्दिक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा. 
परशराम आंबी 
(कोषाध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर) 
(उपाध्यक्ष,  अ. भा. शिक्षक साहित्य, कला, क्रीडा मंच, कोल्हापूर शाखा) 
वरणगे पाडळी
ता. करवीर
जि. कोल्हापूर

Comments

Popular posts from this blog

माझी मराठी माझी जबाबदारी

सारांश लेखन

'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' डॉ. श्रीकांत पाटील डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांची कोरोना महामारीचा विषय घेऊन प्राण्यांच्या सहलीचे काल्पनिक कथानक मांडून लिहिलेली 'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' ही कादंबरी त्यांच्या उत्तुंग भरारी मारणाऱ्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची साक्ष देणारी कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकातून लेखकाच्या अंगी असणारी सूक्ष्म दृष्टी दिसून येते. सामाजिक व चिंतनशील विषय घेतला आहे. माणसाने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःवर ओढवून घेतलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून घेतला आहे. मानवी जीवनातील चित्रण शिक्षक , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करून स्वानुभवाचा आनंद देणे. हाच आनंद रुपकाच्या माध्यमातून प्राणी जगतात देण्याचा लेखकाने केलेला प्रयत्न अतुलनीय असा आहे. लेखकाच्या मनातून अवतरलेला हा आहे. विचार आहे तो मुळात शाळा. हा विषय मानवी जीवनातील वैविध्यपूर्ण आहे. तो एक शिक्षकी शाळा , दोन शिक्षकी शाळा, आदिवासी शाळा, मुलांची शाळा, मुलींची शाळा, ग्रामीण शाळा, शहरी शाळा , रात्रशाळा, साक्षरता शाळा, आश्रमशाळा, रवींद्रनाथ टागोरांची निसर्गातील शाळा. पण या लेखकांच्या मनातून अवतरलेली शाळा ही वेगळीच आहे. मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका , शिपाई यांचा परिवार आलाच . पण ही शाळा प्राण्यांची शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक आहेत - सुजय हत्तीसर. शिक्षकांच्या मध्ये आहेत बाजीराव वानर, विश्वजीत वाघ तर शिक्षिकांच्यामध्ये नलिनी चित्ते, शोभा काळे बेटे या मॅडम. शाळेचा शिपाई म्हणजे गाढव. पण या साऱ्यांनी आपापली जबाबदारी पिण्याचं आणि नियोजन करण्याचं काम अतिशय सुंदरपणे स्वीकारलेले आहे . आणि पार पाडलेला आहे. ही कादंबरी वाचताना खरोखरच खऱ्या शाळेचा परिपाठच आपण पाहतोय असे वाटते. मुलांच्या मध्ये असणारे सर्वगुण आणि अवगुणही या शाळेमध्ये आहेत. खरं म्हणजे मुलांना शाळेत जाणं आवडत नाही. इतर उचापती करण्यात त्यांना रस असतो. तसेच या शाळेतील विद्यार्थीही म्हणजे वानरसेना खऱ्या जीवनातील मुलाप्रमाणेच आहेत. त्यांना शाळेपेक्षा बाहेर फिरणे आवडते. काही दिवस वानर विद्यार्थी शाळेत न आल्यामुळे त्यांचे प्राणी- शिक्षक चौकशी करतात. तेव्हा त्यात त्यांना समजून येते की, ही मुलं शाळा सोडून त्यांच्या पालकांबरोबरच शेजारच्या गावात गेलेली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर शेजारच्या गावात कोरोनामुळे बंदिस्तपणा आला होता. त्याचाच फायदा घेऊन ही वानरसेना मौज मजा करत होती. तीच गोष्ट त्याने आपल्या शाळेत सांगितली. इतर प्राण्यांना ती पटली नाही. त्याची खातरजमा करून आतील माणसाच्या जगातील जीवन पाहण्यासाठी या प्राणी शाळेची सहल काढण्याचे नियोजन केलं जातं . खरं म्हणजे माणसाच्या सहलीच्या नियोजनाची जसे कार्य चालते तसेच या प्राणी जीवनाच्या सहलीचे नियोजन केले होते. सहल केव्हा, कुठे, कशी न्यायची याचे नियोजन करण्यात आले होते. अगदी शिस्तबद्ध सहल पार पडलेली आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हे पुस्तक वाचलेच पाहिजे. हे पुस्तक वाचताना लेखकाची कल्पकता दिसून येते. प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणाची माहिती , संस्थापक अर्थात सिंह राजाची परवानगी घेणे. शासनाची परवानगी मिळवणे, सहलीला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, सोबत घ्यावयाच्या वस्तूंच्या सूचना देणे, सहलीत पाळावयाचे नियम, पालकांची परवानगी आणि इतरांना त्रास न होता सहलीचा मुक्तपणे आनंद घेणे या साऱ्या गोष्टींचा उल्लेख लेखकाने मार्मिकपणे केला आहे . मनुष्यप्राणी कोरोणाच्या भीतीने घरामध्ये कैद झाला. लॉकडाऊनचा फायदा प्राण्यांनी आपल्या सहलीचा आनंद घेण्यामध्ये लुटला. सहल म्हणजे फक्त फिरणे नव्हे, मौजमजा करणे नव्हे , तर सहलीचा खरा अनुभव घेणे तो म्हणजे तो मनोगतातून मांडणे , निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे. योग्य पारितोषिके देणे. घटनांची सूत्रबद्धपणे मांडणी करणे होय. मुलांना चित्रांची आवड असते हे लक्षात घेऊन या कादंबरीत प्राण्यांची चित्रे रेखाटलेली आहेत. त्यामुळे बाल वर्गाला मोहित करणारी अशीच कादंबरी झालेली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि रसिक वाचकांना करमणुकीच्या बरोबरच ज्ञानाचे अमृत पाजून डोळे उघडण्याचे कामही ही कादंबरी करते. ही कादंबरी इसापनीतीच्या कथांची आणि वि. स. खांडेकर यांच्या रूपक कथांची आठवण करून देणारी आहे असे मला वाटते. ही कादंबरी वाचताना शाळेतील प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहतात. स्वतः सहलीचा घटक बनून सवारी केल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हेच तर लेखकाचे खरे यश आहे असे म्हणता येईल. हृदय प्रकाशनप्रकाशनने प्रकाशित केलेली ही कादंबरी रंगीत चित्रांनी सजलेली आहे. कादंबरीचा संपूर्ण आशय असणारे देखणे मुखपृष्ठ चित्रकार श्रीरंग मोरे यांचे आहे. तर आतील चित्रे चंद्रकांत सोनवणे आणि बाळ पोतदार यांची आहेत. वाचक रसिक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील याची मला खात्री आहे. डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांना पुढील लेखन काेर्यासाठी हार्दिक शुभेच्छा. परशराम रामा आंबी वरणगे पाडळी