१. *वाट ही पुनवेची*
१. *वाट ही पुनवेची* नृसिंहवाडीत श्री दत्ताचे दर्शन घेतले आणि गावाकडे परत जाण्यासाठी निघालो. एस.टी.ला खूप गर्दी होती. कारण आज पौर्णिमा होती. तीही मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा होती. म्हणजे दत्त जयंती होती. हजारो भाविक दत्त दर्शन घेण्यासाठी नृसिंहवाडीत आले होते. सूर्य मावळतीकडे झुकला होता. गाव ओढीने लोक परत चालले होते. नृसिंहवाडीपासून जयसिंगपूरपर्यंत सारख्या गाड्या होत्या. तिथून वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या गाड्या सुटत होत्या. एक गाडी पकडून जयसिंगपुरात आलो. कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाडीची वाट पाहू लागलो. एक आराम गाडी आली. त्या गाडीत चढलो. परत खाली उतरलो. कारण त्या गाडीला तिकीट दर नेहमीपेक्षा अधिक होता. पण त्याचे काही वाटले नसते मला. पण कोल्हापूरपर्यंत उभे राहून जावे लागले असते. जनता गाडीनं जायचा विचार केला. जनता रेट खिशाला परवडणारा होता. जनता गाडी येण्यास अजून थोडा अवधी होता. म्हणून मी चहा घेण्यास कॅन्टीनमध्ये गेलो. जनता गाडी आली. ...