परिसंवाद - 'काय आहेत मोबाईलला पर्याय'
परिसंवाद विषय *काय आहेत मोबाईलला पर्याय* मोबाईल! मोबाईल!! मोबाईल!!! या मोबाईलनं आज माणसाचं सारं आयुष्य व्यापून टाकलेलं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि काही वेळा झोपल्यानंतरही मोबाईल आणि मोबाईलचा विषय आपल्या आजूबाजूला सुरू असतो. म्हणजेच मोबाईल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. उठता बसता या मोबाईलचेच नाव आपल्या ओठावर येते. या मोबाईलचाच अति वापर झाला आहे. याला कारण कोरोनाचा काळ. या काळामध्ये शाळा बंद झाल्या होत्या. आणि ऑनलाइन शिक्षणाचा जमाना आला होता. चार वर्षात कोरोना गेला पण मोबाईल मागे ठेवून. असं म्हणतात की 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रज हा भारत देश सोडून गेले. पण इंग्रज आपली शिक्षण पद्धती आणि कायदे इथेच ठेवून गेले. त्याप्रमाणे कोरोना आला नाही गेला, पण मोबाईल मात्र आपल्या ताब्यात देऊन गेला. खरंतर आजचे शिक्षण, मनोरंजन, संपर्क आणि व्यवसायसुद्धा मोबाईलमय झाला आहे. आज असं एकही क्षेत्र नाही की जिथे मोबाईलचा वापर केला जात नाही. खरं तर या मोबाईलच्या अतिवापराने आपले वैयक्तिक आरोग्य, सामाजिक जीवन आणि मानसिक विकार यावरती विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. म्हणूनच आज...