परिचय
*आदर्श शिक्षक, मार्गदर्शक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता म्हणून व्यासंगी, विनम्र, शांत आणि मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणजे परशराम आंबी.* पंचगंगेच्या संगमावर वसलेले वरणगे हे त्यांचे जन्मस्थळ. त्यांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे नाव चालवणे. त्यावरूनच त्यांचे आडनाव पडले 'आंबी.' पूल नसताना वरणगे, पाडळी, निटवडे, यवलूज, पडळ या गावातील लोकांना कोल्हापूरला जाण्यासाठी नावेशिवाय पर्याय नव्हता. वाहतुकीसाठी पूर्वी याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. आता पूल झाल्याने नावेचा व्यवसाय बंद पडला. उदरनिर्वाहासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले. १९७५ मध्ये 'काकासाहेब जाधव' या शिक्षकांच्या प्रेरणेमुळे ते शाळेत जावू लागले. त्यांची बुद्धिमत्ता पाहून काकासाहेब जाधव यांनी त्यांना चौथी स्कॉलरशिप परीक्षेला बसवले. स्वतः त्यांनी लागणारी पुस्तके, वह्या परशरामला दिल्या. त्यांच्या प्रेरणेमुळे आणि परशराम यांच्या जिद्द, चिकाटीमुळे ...