🔴 *माझी मराठी माझी जबाबदारी.* ====================== मराठी ही आमची मायबोली असून तिची गोडी हवी आहे. मराठीच्या समृद्धीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानदेवापासून अलीकडच्या काळातील नव साहित्यिकांच्या पर्यंत अनेक कवी, लेखकांनी आपली लेखणी झिजवलेली आहे. मराठीला ग्रांथिक आकार दिला आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी मायबोली मराठीचे सुपुत्र आणि आपला लढा उभारला. त्याचीच परिमिती म्हणून एक मे १९६० रोजी स्वतंत्र मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. संतांबरोबर पंडित कवी, शाहीर कवींनी मराठीत ग्रंथरचना करून लोकांना अध्यात्म काव्यपरिचय करून दिला. आणि पोवाड्यांची रचना करून मराठीचा झरा अखंड ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. याच काळात अनेक आक्रमणांनी इथला भाग जिंकून घेतला. भाषिक आक्रमणे ही मराठीवर झालीत. अनेक परकीय आणि परभाषीय शब्द मराठीत स्थिरावले. संत एकनाथांना तर ज्ञानेश्वरीची पाठ्यशुद्ध प्रत तयार करावी लागली. पण मूळचीच रसाळ, मधाळ असणाऱ्या मराठी भाषेने या प्रतिकूल आणि संभ्रमाच्या काळात आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे....
Kartikdabane
ReplyDeleteKartik
DeleteDabane
Kartik Dabane
ReplyDelete