अाज ब्लाॅग सुरु करतोय

लाॅकडाऊन कालावधीत मी   नाट्यछटा   लिहिली आहे.

नाट्यछटा--' हाच विश्वास '
  ये आई ,
मला बाहेर जाऊ दे ना!
असं सारखं सारखं  का गं मला अडवतेस?......
काय म्हणतेस? कोण आलंय? कोरोना ?
तो आणि कुठून आला आहे गं? आणि म्हणून जगातली सगळी माणसं अशी कोंडून घेऊन बसल्यात होय?
पण आई ,
कोरोना म्हणजे काय गं?.... 'तो व्हायरस आहे...'
अगं व्हायरस म्हणजे काय गं? हं...व्हायरस म्हणजे विषाणू . या विषाणूंमुळेच अापण आजारी पडतो ना!
बर्फाचा गोळा खाल्ला की सर्दी होते.
घाणीत खेळलो की ताप येतो. मग अापल्याला डाॅक्टरमामाकडं जावं लागतं आणि इंजेक्शन टोचून घ्यावं लागतं.
काय म्हणतेस गं आजी? आजारी पाडणारे विषाणू आहेत तसेच उपयोगी पडणारेही विषाणू आहेत .
ते गं कोणते?
...हो, बरोबर दुधाचे दही बनवणारे पण विषाणू आहेत.
हे सारं आमच्या विज्ञानाच्या सरांनी सांगितलं आहे.
उपयोगी विषाणू आणि निरुपयोगी विषाणू. 
पण हा कोरोनाचा विषाणू फारच भयंकारी आहे .
याच्यावर अजून लसही उपलब्ध नाही.
अगं आजी ,
हा विषाणू मरत नाही म्हणं!
'का मरत नाही?'
असं काय गं आजी!
तो मरंलच कसा?
कारण तो निर्जीव आहे आणि तो विषाणूंचा पुंजका आहे. 
त्याच्यावर अजून औषध नाही की लसही उपलब्ध नाही.
त्याच्यापासून वाचायचे असेल तर एक आणि एकच पर्याय आहे.
'.... तो आणखी कोणता?'
आजोबा तुम्ही विचारताय असं ? अहो , एवढं सोपं तुम्हांला कसं हो समजत नाही?
अहो,  आपण एकमेकांच्या पासून दूर राहायचं. 
अहो, 
शेजारच्या काकांनी त्यांच्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलंय तसं. ...तसं नव्हं हो.
अहो,  माझे बाबा तुम्हांला कसे ठेवतील वृद्धाश्रमात.
मी कसं जाऊ देईन तुम्हांला घरातून....हं. .. ..बरं, मी काय सांगत होतो. अहो ! आपण घरातच राहायचं पण आपल्यात दोन मीटरचं अंतर ठेवून. आणि बरं का तोंडावर मास्क किंवा रूमाल बांधून. 
.....आई , पाहिलंस का तू? कशी पटाटा माणसं मरायला लागलीत ती.
आपल्या देशात नव्हं गं! इटली,  फ्रान्स , अमेरिका या देशात.
.....काय म्हणताय आजोबा?
अशी परिस्थिती आली होती या अगोदर? 
१९१९ च्या काळात?
ती आणि कशाची? 
प्लेगची . प्लेगची साथ.
काय म्हणताय? पटापट माणसं मरायची?
एकाला स्मशानात पोहोचवून आलं की दुसरं तयार.
अशी महामारी आली होती तेव्हा?
अहो आजोबा , तेव्हा उचलायला माणसं तरी यायची, पण आता या कोरोनाची साथ आली तर उचलायलाही कोण यायचं नाही. 
किंवा उचलायला कुणीही राहायचं नाही अशी परिस्थिती व्हायची. 
म्हणून म्हणतो की सुरक्षित राहा. सुरक्षित अंतर ठेवा. साबणाने सारखे सारखे हात स्वच्छ धुवा.
सुरक्षित अंतर ठेवू, कोरोनावर विजय मिळवू.
"एकच श्वास अन् एकच ध्यास कोरोनावर विजय हा विश्वास."

परशराम आंबी

Comments

Popular posts from this blog

माझी मराठी माझी जबाबदारी

सारांश लेखन

'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' डॉ. श्रीकांत पाटील डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांची कोरोना महामारीचा विषय घेऊन प्राण्यांच्या सहलीचे काल्पनिक कथानक मांडून लिहिलेली 'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' ही कादंबरी त्यांच्या उत्तुंग भरारी मारणाऱ्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची साक्ष देणारी कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकातून लेखकाच्या अंगी असणारी सूक्ष्म दृष्टी दिसून येते. सामाजिक व चिंतनशील विषय घेतला आहे. माणसाने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःवर ओढवून घेतलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून घेतला आहे. मानवी जीवनातील चित्रण शिक्षक , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करून स्वानुभवाचा आनंद देणे. हाच आनंद रुपकाच्या माध्यमातून प्राणी जगतात देण्याचा लेखकाने केलेला प्रयत्न अतुलनीय असा आहे. लेखकाच्या मनातून अवतरलेला हा आहे. विचार आहे तो मुळात शाळा. हा विषय मानवी जीवनातील वैविध्यपूर्ण आहे. तो एक शिक्षकी शाळा , दोन शिक्षकी शाळा, आदिवासी शाळा, मुलांची शाळा, मुलींची शाळा, ग्रामीण शाळा, शहरी शाळा , रात्रशाळा, साक्षरता शाळा, आश्रमशाळा, रवींद्रनाथ टागोरांची निसर्गातील शाळा. पण या लेखकांच्या मनातून अवतरलेली शाळा ही वेगळीच आहे. मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका , शिपाई यांचा परिवार आलाच . पण ही शाळा प्राण्यांची शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक आहेत - सुजय हत्तीसर. शिक्षकांच्या मध्ये आहेत बाजीराव वानर, विश्वजीत वाघ तर शिक्षिकांच्यामध्ये नलिनी चित्ते, शोभा काळे बेटे या मॅडम. शाळेचा शिपाई म्हणजे गाढव. पण या साऱ्यांनी आपापली जबाबदारी पिण्याचं आणि नियोजन करण्याचं काम अतिशय सुंदरपणे स्वीकारलेले आहे . आणि पार पाडलेला आहे. ही कादंबरी वाचताना खरोखरच खऱ्या शाळेचा परिपाठच आपण पाहतोय असे वाटते. मुलांच्या मध्ये असणारे सर्वगुण आणि अवगुणही या शाळेमध्ये आहेत. खरं म्हणजे मुलांना शाळेत जाणं आवडत नाही. इतर उचापती करण्यात त्यांना रस असतो. तसेच या शाळेतील विद्यार्थीही म्हणजे वानरसेना खऱ्या जीवनातील मुलाप्रमाणेच आहेत. त्यांना शाळेपेक्षा बाहेर फिरणे आवडते. काही दिवस वानर विद्यार्थी शाळेत न आल्यामुळे त्यांचे प्राणी- शिक्षक चौकशी करतात. तेव्हा त्यात त्यांना समजून येते की, ही मुलं शाळा सोडून त्यांच्या पालकांबरोबरच शेजारच्या गावात गेलेली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर शेजारच्या गावात कोरोनामुळे बंदिस्तपणा आला होता. त्याचाच फायदा घेऊन ही वानरसेना मौज मजा करत होती. तीच गोष्ट त्याने आपल्या शाळेत सांगितली. इतर प्राण्यांना ती पटली नाही. त्याची खातरजमा करून आतील माणसाच्या जगातील जीवन पाहण्यासाठी या प्राणी शाळेची सहल काढण्याचे नियोजन केलं जातं . खरं म्हणजे माणसाच्या सहलीच्या नियोजनाची जसे कार्य चालते तसेच या प्राणी जीवनाच्या सहलीचे नियोजन केले होते. सहल केव्हा, कुठे, कशी न्यायची याचे नियोजन करण्यात आले होते. अगदी शिस्तबद्ध सहल पार पडलेली आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हे पुस्तक वाचलेच पाहिजे. हे पुस्तक वाचताना लेखकाची कल्पकता दिसून येते. प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणाची माहिती , संस्थापक अर्थात सिंह राजाची परवानगी घेणे. शासनाची परवानगी मिळवणे, सहलीला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, सोबत घ्यावयाच्या वस्तूंच्या सूचना देणे, सहलीत पाळावयाचे नियम, पालकांची परवानगी आणि इतरांना त्रास न होता सहलीचा मुक्तपणे आनंद घेणे या साऱ्या गोष्टींचा उल्लेख लेखकाने मार्मिकपणे केला आहे . मनुष्यप्राणी कोरोणाच्या भीतीने घरामध्ये कैद झाला. लॉकडाऊनचा फायदा प्राण्यांनी आपल्या सहलीचा आनंद घेण्यामध्ये लुटला. सहल म्हणजे फक्त फिरणे नव्हे, मौजमजा करणे नव्हे , तर सहलीचा खरा अनुभव घेणे तो म्हणजे तो मनोगतातून मांडणे , निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे. योग्य पारितोषिके देणे. घटनांची सूत्रबद्धपणे मांडणी करणे होय. मुलांना चित्रांची आवड असते हे लक्षात घेऊन या कादंबरीत प्राण्यांची चित्रे रेखाटलेली आहेत. त्यामुळे बाल वर्गाला मोहित करणारी अशीच कादंबरी झालेली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि रसिक वाचकांना करमणुकीच्या बरोबरच ज्ञानाचे अमृत पाजून डोळे उघडण्याचे कामही ही कादंबरी करते. ही कादंबरी इसापनीतीच्या कथांची आणि वि. स. खांडेकर यांच्या रूपक कथांची आठवण करून देणारी आहे असे मला वाटते. ही कादंबरी वाचताना शाळेतील प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहतात. स्वतः सहलीचा घटक बनून सवारी केल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हेच तर लेखकाचे खरे यश आहे असे म्हणता येईल. हृदय प्रकाशनप्रकाशनने प्रकाशित केलेली ही कादंबरी रंगीत चित्रांनी सजलेली आहे. कादंबरीचा संपूर्ण आशय असणारे देखणे मुखपृष्ठ चित्रकार श्रीरंग मोरे यांचे आहे. तर आतील चित्रे चंद्रकांत सोनवणे आणि बाळ पोतदार यांची आहेत. वाचक रसिक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील याची मला खात्री आहे. डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांना पुढील लेखन काेर्यासाठी हार्दिक शुभेच्छा. परशराम रामा आंबी वरणगे पाडळी